महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील निंबोडीच्या सभेत आपला तोल सोडला.
इंदापूर – महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर तालुक्यातील निंबोडीच्या सभेत आपला तोल सोडला. वीज आणि पाण्यासारख्या गंभीर प्रश्नांवर जनतेला दिलासा देण्याऐवजी त्यांनी कंबरेखालील अश्लिल वक्तव्य करुन या प्रश्नांची खिल्ली उडवली. एवढेच नाही तर, उजनी धरणातून सोलापूरला पाणी देण्यासंदर्भातही प्रभाकर देशमुख यांनी केलेल्या उपोषणावरही त्यांनी हीन शब्दांत टीका केली. त्यांच्या या टगेगिरीमुळे उपस्थितांचे मनोरंजन झाले असले तरीही त्यांचे हे अश्लिल भाषण त्यांच्याच अंगलट येऊ शकते.
राज यांच्या टीकेचा नेहमी खरपूस समाचार घेणा-या उपमुख्यमंत्र्यांना राज्यात दुष्काळ असताना असे खालच्या स्तराला जाऊन केलेले वक्तव्य न शोभणारे आहे. अजित पवारांच्या या वक्तव्याचे पडसाद आता राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या गोटातून याबाबत मौन पाळण्यात आले आहे.
sattechaa maaj chaDhalaa kee asech hote. Joparyant mahaaraaShTraavar nusatee Congress chee satta hoti toparyaNt sagle changle hote. RaaShTravadishee yutee karun Congressne chUk keli aahe.