आघाडीतील सर्व पक्षांनी परस्परातील छोटेमोठे मतभेद विसरून आघाडीच्या सर्व उमेदवारांमागे एकदिलाने उभे राहणे, ही रास्त अपेक्षा आहे. पण या मोक्याच्या क्षणी राजकीय स्वार्थासाठी व व्यक्तिगत असुयेपोटी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांच्यासारखी मंडळी आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीत खंजीर खुपसून दगा करण्याचे धोरण स्वीकारतात.
लोकसभेची यावेळची निवडणूक अत्यंत महत्त्वाची, देशाला विकास व प्रगतीकडे वेगाने नेण्यासाठी व देशाची घटना आणि धर्मनिरपेक्ष स्वरूप अधिक मजबूत करण्यासाठी लोकांना सुवर्णसंधी देणारी आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने देशाचे विभाजन करण्याचे, विविध धर्माच्या लोकांमध्ये फूट पाडून देशाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप निकालात आणण्याचे व देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचे मनसुबे बाळगणा-या शक्ती या देशाचा ताबा घेऊ पाहत आहेत. या शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्ष यांची आघाडी जीवाचे रान करीत आहे व आपले सर्वस्व पणाला लावत आहे. महाराष्ट्र पुरोगामी व प्रगतीशील राज्य आहे. काँग्रेसचे सर्वाना बरोबर घेऊन विकासाचे कार्य करण्याची व सर्वधर्मसमभावाने वाटचाल करण्याची परंपरा या राज्याला लाभली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडीही देशातील प्रतिगामी व अत्यंत धोकादायक शक्तींचा मुकाबला करून या शक्तींना उखडून टाकण्याच्या निर्धाराने निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. देशाला प्रतिगामी शक्तींपासून निर्माण झालेल्या धोक्याची तिला जाणीव आहे. अशा वेळी आघाडीतील सर्व पक्षांनी परस्परातील छोटेमोठे मतभेद विसरून आघाडीच्या सर्व उमेदवारांमागे एकदिलाने उभे राहणे, ही रास्त अपेक्षा आहे. पण या मोक्याच्या क्षणी राजकीय स्वार्थासाठी व व्यक्तिगत असुयेपोटी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर यांच्यासारखी मंडळी आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीत खंजीर खुपसून दगा करण्याचे धोरण स्वीकारतात. केसरकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांना दगा देण्याचे धोरण स्वीकारले; पण, या मंडळींची कारस्थाने उघडकीला आल्याने अखेर ही मंडळी आता साफ तोंडघशी पडली आहेत आणि त्यांची आता राष्ट्रवादी पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे नावापुरते असलेले राजकीय अस्तित्व संपलेले आहे, हे निश्चित. सावंतवाडीत झालेल्या जाहीर सभेत भाषण करताना शरद पवार यांनी दीपक केसरकर यांची चांगलीच हजेरी घेतली व बंडखोरी करणा-यांना वेळीच जागा दाखवून देऊ, असा इशाराही दिला. ‘घरात भांडयाला भांडे लागतेच; पण, भांडणे बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे असते. पण आमच्या काही कार्यकर्त्यांना ऐनवेळी अवदसा आठवली. पण पक्षापेक्षा कुणी मोठा नाही,’ असेही पवार यांनी बजावले. दीपक केसरकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असला तरी तो असा तडकाफडकी स्वीकारता येणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. असा राजीनामा देऊन केसरकर यांना कारवाई टाळता येणार नाही. केसरकरांच्या हालचाली पाहता त्यांचा प्रवास कुठे चालला आहे, याची कल्पना सर्वाना आलीच आहे. पक्षविरोधी भूमिका घेणारे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे व अन्य पदाधिका-यांची पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक केसरकर हे कोकणचे नेते, उद्योगमंत्री व कोकणचे पालकमंत्री नारायण राणे यांचे पहिल्यापासूनच विरोधी. कोकणच्या विकासाचा ध्यास घेतलेले, कोकणच्या विकासासाठी गेली काही वष्रे अहोरात्र काम करणारे व सिंधुदुर्गासह कोकणात अनेक मोठे प्रकल्प आणणारे नारायण राणे यांचा त्यांच्या कार्यामुळे मत्सर करणारी अनेक मंडळी कोकणात आहेत. राणे यांच्या कामामुळे व त्यांनी घडवून आणलेल्या सिंधुदुर्गच्या विकासामुळे राणे हेच कोकणचे प्रमुख नेते मानले जातात. कोकणची शेती, बागायती, मच्छीमारी, विविध उद्योग यांचा झपाटय़ाने होत असलेला विकास आणि कोकणात येत असलेले अनेक लहानमोठे प्रकल्प यांचे श्रेय कोकणी माणूस राणे यांनाच देत आहे. असा विकास घडवण्याची क्षमता आज तरी कोकणच्या कोणत्याही नेत्यामध्ये नाही, हे निर्विवाद आहे. विद्यमान खासदार व लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश राणे हे तर नारायण राणे यांचे सुपुत्र व कोकणचे धडाडीचे तरुण नेते. गेल्या पाच वर्षात त्यांनी कोकणसाठी १०० टक्के खासदार निधी खर्च केला व कोकणचे अनेक प्रश्न त्यांनी लोकसभेत उपस्थित केले. कोकण रेल्वेशी संबंधित अनेक प्रश्न, महामार्गाचे चौपदरीकरण, कोकणवासीयांच्या मुळावर येणारा पश्चिम घाटविषयक अहवाल अशा अनेक विषयांचा त्यांनी पाठपुरावा केला. डॉ. निलेश राणे यांचे कार्य व ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या दीपक केसरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. राणे यांच्यासाठी काम करणे अपेक्षित होते. पण राणे पितापुत्रांच्या मत्सरापोटी केसरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना डॉ. राणे यांच्या प्रचारापासून दूर राहण्याचा आदेश दिला. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्याविषयी खोटयानाटया तक्रारी करून आपण निलेश राणे यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले. या संबंधात नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे काही गरसमज असतील तर ते दूर करण्यास आपण तयार आहोत, असे सांगितले. पण केसरकर आपला हेका सोडायला तयार नव्हते. त्यांनी प्रथम अशी भूमिका घेतली की, आपले कार्यकत्रे राणे यांचा प्रचार करणार नाहीत; पण, त्यांच्या विरोधातही काम करणार नाहीत. पण ही त्यांची भूमिका फसवी व विश्वासघातकी होती, हे सोमवारी त्यांनी सावंतवाडीतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या सभेत केलेल्या ‘राणेंचा पराभव करा’ घोषणेने सिद्ध झाले. आपले कार्यकत्रे निलेश राणे यांचा प्रचार करणार नाहीत, असे सांगणा-या केसरकर यांनी राणे यांचा पराभव करा, असा पुकारा या सभेत केला. याचा सरळ सरळ अर्थ असा की, ‘शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करा’ म्हणजे केसरकर यांचा ओढा कुठे होता, हे कळून येते. गेले काही दिवस त्यांच्या शिवसेनेच्या नेत्यांशी गाठीभेटी सुरू होत्या व ते शिवसेनेत जाणार, अशा बातम्या होत्या. केसरकर यांच्या कार्यकर्त्यांच्या राणे यांच्या प्रचाराबाबतच्या निष्क्रियतेमागील उलगडा या बातम्यांवरून व आता झालेल्या घोषणेवरून होतो. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेश झुगारून देऊन बंडखोरी करण्यापर्यंत केसरकरांची मजल जाते, याचा अर्थ त्यांचा ‘बोलविता धनी’ कुणी वेगळाच आहे व तो कोण आहे, हे सहज ध्यानी येते. केसरकर यांना वाटते की, आपण ‘राणेंचा पराभव करा’ असे सांगितल्याने लोक आपला आदेश मानतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठया संख्येने असलेल्या वैश्यवाणी समाजावर भिस्त ठेवून केसरकर यांनी हा आदेश दिला असेल तर ते भ्रमात आहेत असेच म्हणावे लागेल. कोकण परिसराचा विकास नारायण राणे यांनीच केला आहे व त्यांचे योगदान काय आहे, हे सर्वानाच माहीत आहे. शिवाय वैश्यवाणी समाजाला ‘ओबीसी’मध्ये पुन्हा आरक्षण मिळवून देण्याची कामगिरी कुणी बजावली, हेही हा समाज चांगलेच जाणतो. त्यामुळे आपली गद्दारी फळेल, या भ्रमात केसरकर यांनी राहू नये, उलट या निवडणुकीनंतर त्यांचे राजकीय भवितव्यच संपुष्टात आल्याचे त्यांना कळून येईल. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. ‘तैलं संपुष्टे दीपक प्रकाशमान भवती’ म्हणजे ज्या दीपकातील, दिव्यातील तेल संपायला आले आहे, तो विझण्यापूर्वी जास्त फडफड करतो. केसरकरांच्या दीपकचा पण असाच असा. त्याका बुद्धीच नाय, मग त्याका सद्बुद्धी दे, असा कसा म्हणू महाराजा..!
[EPSB]
नक्षलवादाचे आव्हान कायम
देशात लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया उत्साहात व जोरात सुरू असताना काश्मीरसह देशभरात निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्यासाठी दहशतवादी संघटना पुन्हा कार्यरत झाल्या असून सुरक्षादलांनीही त्यांच्याविरुद्ध जोरदारपणे मोर्चेबांधणी केली आहे.
[/EPSB]
नियत कोणालाही सोडत नाही मग तो देव असो वा मानव.