छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास लिहिणा-या बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला जातो तर त्याच इतिहासाच्या आधारावर ‘बाजीराव मस्तानी’ हा काल्पनिक चित्रपट काढणा-या संजय लीला भन्साली यांना विरोध करता, असा सवाल कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी विचारला आहे.
नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास लिहिणा-या आणि जिजाऊ आईसाहेबांची बदनामी करणा-या बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला जातो तर त्याच इतिहासाच्या आधारावर ‘बाजीराव मस्तानी’ हा काल्पनिक चित्रपट काढणा-या संजय लीला भन्साली यांना विरोध करता, असा सवाल कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी विचारला आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाला संरक्षण देऊन तो आहे, तसा प्रदर्शित करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी कणकवलीचे आमदार राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पेशव्यांच्या इतिहासावर आधारित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट निर्माते-दिग्दर्शक भन्साली यांनी तयार केला. या चित्रपटातील काशीबाई आणि मस्तानी यांच्या एकत्रित नृत्याला, तसेच इतर काही दृश्यांना पेशव्यांच्या वंशजांनी विरोध केला. शिवसेनेच्या आमदारांनीही ‘हा चित्रपट विधानसभा सदस्यांना दाखवावा आणि त्यातील जे आक्षेपार्ह दृश्य आहेत ते वगळावेत’ अशी मागणी विधानसभेत केली होती. त्याला नितेश राणे यांनी जोरदार विरोध केला आहे.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या चित्रपटाला संरक्षण देण्याची मागणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, बाजीराव मस्तानी चित्रपटात काशीबाईच्या नृत्यामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखू लागल्या आहेत, म्हणून त्याला विरोध होत आहे. त्यातील दृश्य वगळण्याची मागणी होत आहे. शिवसेनेचे आमदार चित्रपटांच्या प्रदर्शनाला विरोध करीत आहेत. त्यांना माझे सवाल आहेत की, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणा-या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देऊन गौरविताना तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता. शिवसेनेने कायम छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण केले. जेव्हा शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगणा-या, जिजाऊ आईसाहेबांची बदनामी करणा-या बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये, असे महाराष्ट्रातील बहुजन समाजातील नेते सांगत होते. मराठा संघटना त्यांना विरोध करीत होत्या तेव्हा हे शिवसेनावाले कुठे गेले होते. पुरंदरे यांनी तर आपण खरा इतिहास सांगत आहोत, असे सांगून जनतेची दिशाभूल केली आहे. इथे तर संजय लीला भन्साली यांनी आपण चित्रपट काल्पनिक कथांवर आधारित चित्रित केला आहे, असे स्पष्ट सांगितले.
मग आता तुमचा स्वाभिमान इतका का जागा झाला? मुख्यमंत्रीही हा विषय तपासून पहायला लगेच तयार झाले. मग ज्यावेळेला पुरंदरेंना पुरस्कार देताना विरोध केला जात होता, तेव्हा तपासून पहाण्याची त्यांना का गरज वाटली नाही, असा सवालही राणे यांनी विचारला आहे.
बाजीरावच्या आयुष्यात मस्तानी-बाजीराव प्रेमप्रकरण हे एकमेव सत्य आहे. लढवय्या मराठ्यांचा द्वेष करणाऱ्या ब्राह्मण रियासतकार, इतिहासकार आणि लेखकांनी बाजीराव महान योद्धा होता असा खोटा इतिहास लिहिला आहे. एका मादुकरी चीतपावन ब्राह्मणाचा मुलगा / नातू लढवय्या मराठ्यांचा सारखा लढायचा हे सगळ्यात मोठे ऐतिहासिक असत्य आहे. बाजीरावला योद्धा म्हणणे म्हणजे मोठा विनोद आहे. शिंदे, पवार, घोरपडे, गायकवाड, कदम-बांडे, भोसले, दाभाडे अश्या मोठ्या मराठा सरदार आणि इतर अनेक मराठा सरदारांचे / सैनिकांचे कर्तुत्व आणि पराक्रम हे बाजीरावचे आणि पेशवेचे होते असे खोटे लिखाण ब्राह्मण इतिहासकारांनी अनेकदा केले आहे लोकांची फसवणूक केली आहे. बाजीराव मस्तानीला घेऊन मराठ्यांच्या सेने बरोबर फिरत असल्याने मराठा सरादांचे कर्तुत्व आणि पराक्रम चोरून ते बाजीरावाच्या नावाने सांगितले गेले. हजरजबाबीपणा आणि वाक्चातुर्य ह्यामुळे शाहू महाराजंच्या कृपेने मिळालेले पेशवेपद आणि दान मिळालेली शनिवारवाड्याची वास्तू मुळे बाजीरावला महान राजकारणी म्हणता येईल. संभाजीराजेंच्या अधिपत्याखाली रणझुंजार सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांच्या तालमीत तयार झालेल्या मराठ्यांच्या सेनेने कधीही पराजय बघितला नाही. ह्या विजयी सेनेचे नेतृत्व पुढे शिंदे, पवार, गायकवाड, कदम, दाभाडे, भोसले, घोरपडे आणि इतर महान मराठा सरदारांनी केले आणि पुढे मराठा साम्राज्य उत्तर भारतात वाढविले. काहीही कर्तुत्व नसताना खोट्या लिखाणामुळे फुकटची प्रसिद्धी मिळाली ह्याच्या करता बाजीरावच्या वंशजांनी भन्साळीचे आभार मानले पाहिजे.