महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. तथा आबा पाटील हे राणा भीमदेवी वक्तव्याबद्दल चांगलेच ओळखले जातात. ते गृहमंत्री असताना महाराष्ट्रात एखादा मोठा तसेच सामाजिक परिणाम घडवणारा गुन्हा घडला की, पत्रकार त्यांना गाठायचे आणि प्रतिक्रिया विचारायचे. तेव्हा आबा गर्जना करायचे, ‘या अपराधाबद्दल या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा केली जाईल.’ खरे म्हणजे कोणत्याही आरोपीला कठोर शिक्षा करावी की, सौम्य शिक्षा करावी, हे काही गृहमंत्री ठरवत नसतात. तो निर्णय न्यायालयाचा असतो; परंतु आपण फार कठोर प्रशासक आहोत, असा भास निर्माण करण्यासाठी आबा अशी वक्तव्ये करायचे. शेतक-यांची लूट करणा-या सावकारांना ‘कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढू’ असे त्यांनी विधान केले होते. डोळे काढणे, कडेलोट करणे, हात कलम करणे, पाय कलम करणे आणि सर्वात वाईट म्हणजे डोके उडवणे अशा शिक्षा मध्ययुगात काळात होत्या. पण कोपरापासून ढोपरापर्यंत शरीराची चामडी सोलण्याची शिक्षा काही ऐकण्यात नव्हती. कदाचित आबांच्या इतिहासामध्ये अशा शिक्षेची नोंद असेल. खासगी सावकार कितीही वाईट झाले तरी त्यांना अशी शिक्षा सुनावण्याचा अधिकार आबांना नाही. मात्र तशी त्यांनी घोषणा करून टाकली होती. खरे म्हणजे गृहखात्याचे काम शिक्षा करण्याचे नसून चांगला तपास करण्याचे आहे. मात्र आबांच्या कार्यकाळात या खात्याने तपासाच्या बाबतीत कधीही तत्परता दाखवली नाही. आबा मात्र शिक्षा ‘सुनावत’ गेले. त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यातल्या एकाही सावकारावर खटला भरला गेला नाही. मुंबईवरील हल्ल्यात तर आबांनी ‘बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी घटनाऐ होती रहती है’ असे म्हणून स्वत:चे गृहमंत्रीपदही गमावले होते. आता आबांची जीभ प्रचारावेळी त्यांच्या मतदारसंघातील कवठेएकंद या गावी झालेल्या सभेत बोलताना पुन्हा घसरली. त्यांच्या मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या विषयी बोलताना ‘अरे बलात्कारच करायचा होता तर निवडणुकीनंतर करायचा’, असे आबा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने वादळ उठले आहे. आता आबा आपण हे उपरोधकपणे म्हणालो होतो, असे खुलासे देत फिरत आहेत. सुसंस्कृत नेते अशी आबांची ओळख आहे, असेही म्हटले जाते. पण त्यांचा सुसंस्कृतपणा कधीही जाहीर भाषणात दिसला नाही. दिसले ते त्यांचे असे घसरून पडणे. त्यांच्यावर आता सर्व स्तरांतून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या वक्तव्याचा निषेध करत हा विषय संपवण्याचे आवाहन केले. बलात्कारासारख्या विकृत कृत्यामुळे पीडित महिलेचे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होत असते. त्यामुळे उपरोधिक टीकेमध्येही त्याचा उल्लेख करणे, हे कोणत्या सुसंस्कृत पुरुषाचे लक्षण हे आबा यांनी दाखवून द्यावे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
असले ” घाटी ” मंत्री पदाचे खुर्ची वर बसल्यावर त्यांचे कडून चांगल्या वक्तव्याची अपेक्षा ती काय करणार ? मुंबई वरच्या हल्यंत
१६८ ,निरपराधी मारले गेलेंत ,परंतु या मंत्री महोदायाच्या खुर्चीत्ला एक साधा ” ढेकुण ” सुद्धा मेला नाही , फक्त उपदेशाचे ढोस देत
होता,