कोकण विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र कार्यरत असलेले आणि कोकणच्या भूमीवर, तिथल्या माणसांवर जीवापाड प्रेम करणारे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी, त्यांच्या राजकीय वाटचालीतील पहिल्या पराभवाची वेळ कोकणी माणसांनीच आणल्याबद्दल त्यांच्या मनातील दु:ख आणि सल सोमवारी ‘हार आणि प्रहार’मधून व्यक्त केली. त्यांच्या या प्रांजळ मनोगताचे पडसाद फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल साइट्सवरूनही उमटले आणि प्रमुख वृत्तवाहिन्यांनीही राणे यांनी व्यक्त केलेल्या या मनोगताला ठळकपणे प्रसिद्धी दिली. सोशल साइट्सवरून आणि ‘प्रहार’च्या संकेतस्थळावरून हे मनोगत शेअर केले गेले आणि राणे यांच्या भावनांना प्रतिसाद देणा-या अनेक प्रतिक्रियाही सर्व माध्यमांतून ‘प्रहार’ला कळवण्यात आल्या. त्यापैकी या काही निवडक प्रतिक्रिया
दादा सॉरी, कोकणातील लोकांनी स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला. दादा विद्यमान खासदारांचे मुंबईतील काम काय आहे ते मांडा. तुमच्याविरुद्ध बोगस मतदानसुद्धा झाले असेल. कारण मुंबईत असे मतदान सेनेच्या बाजूने झाले आहे.
– साईराज परब
दादा तुम्ही भावी मुख्यमंत्री आहात. श्रीदेव रामेश्वर आपल्या पाठीशी आहे. तुम्ही फणस आहात. मनाने प्रेमळ दादा मतदारांना कळले नाहीत हे दुर्दैव!
– सचिन सावंत
आदरणीय राणेसाहेब, या पराभवामुळे आपण निराश होऊ नका. आम्ही आपल्या सोबत आहोत. मी स्वत: लहानपणापासून कोकणातील आपले काम पाहतोय. तुम्हीच कोकणातील सर्वोच्च नेते आहात. आता जरी आपला पराभव झाला असला तरी भविष्यात आपल्याला मोठी संधी मिळेल. कोकणातील अनेक प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आपली गरज आहे. तुम्ही पुन्हा नव्याने प्रयत्न करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत
– शैलेश लाड
राणे साहेब, धीर सोडू नका. तुम्ही नाहीत तर हे कोकणद्वेषी लोक माझ्या कोकणाला विकतील. कोकणाला कोणी वालीच राहणार नाही. राणे असेपर्यंत कोकणाकडे कोणी वाईट नजरेने बघण्याची यांची हिंमत होत नव्हती म्हणून कोकणाचा द्वेष करणाऱ्यांनी त्यांचा डाव साधला. कोकणात गरिबाच्या घरी दोन वेळ काय शिजते हे यांना माहीत नाही. हे लोक कोकणाचा विकास काय करणार. कोकण समजायला कोकणात जन्म घ्यावा लागतो, तरच कोकण समजू शकतो. तुम्ही कालही कोकणाचा आधारस्तंभ होता आणि आजही आहात. कोकणद्वेषी लोकांना हे माहीत नाही की, राणे सत्तेमध्ये असोत अथवा नसोत कोकणच्या रक्षणाकरता सदैव समर्थ आहेत.
– लक्ष्मण माने
कोकणवासीयांनी कोकणचे सुपुत्र नारायण राणेसाहेब यांच्याविरुद्ध कौल दिला. हा राणेंचा पराजय नाही तर कोकणाची तळमळ असणा-या एका सच्च्या कार्यकर्त्यांचा पराजय आहे. ज्याने कोकणाचा सर्वार्थाने विकास घडवला, ज्या कोकणाला महाराष्ट्राच्या नकाशावर ओळख दिली त्या कोकणाच्या सुपुत्रालाच आज या कोकणी जनतेने पराभूत केले. कोकणच्या सर्वागीण विकासाचे स्वप्न नव्हे ध्यास घेऊन राजकारणातही समाजकारणाचा मंत्र जपणारे नारायणराव राणेसाहेब म्हणजे कोकणाला लाभलेले झुंजार व्यक्तिमत्त्व आहे. असा नेता सध्या अन्य कोणीही नाही आणि पुढेही होणार नाही. कोकणच नव्हे तर राज्याच्या सर्वागीण विकासासाठी त्यांची तळमळ, जिद्द व दूरदृष्टी वारंवार दिसते. मिळालेल्या प्रत्येक
पदाचा वापर जनहितासाठी करणारा असा हा लोकनेता आहे.
– विकास पवार
श्री. राणे यांनी आपल्या परीने कोकणात बरेच काही केले आहे, परंतु हा पराभव त्यांच्याच दलातील काही लोकांच्या वागणुकीमुळे झालेला आहे.
– सतीश ठोसर
लोकांचे विठ्ठलप्रेम आजही ओसरले नाहीय, परंतु आजूबाजूच्या बडव्यांनी पंढरी घाण केलीय. आणि विठ्ठलच चंद्रभागेत बुडवला.
– प्रथमेश श्रीकांत देसाई
राणेसाहेब कणखर नेते आहेत. ते पुन्हा नक्कीच उभारी घेतील, यात तिळमात्र शंका नाही.
– गणेश जाधव पाटील
ही राणे यांची हार नव्हे तर ही कोकणची हार आहे.
– सलीम खातीब
या निकालातून कोकणी माणसाची खेकडयाची प्रवृत्ती दिसून आली. दादांचा पराभव करणारा कोकण भविष्यात पश्चातापाचे अश्रू ढाळल्याशिवाय राहणार नाही.
– कुणाल मांजरेकर
दादा हा तुमचा पराभव नाही, आमचा आहे. तुमच्या पाठी नाही तुमच्याबरोबर आम्ही सदैव आहोत. आता आपण येणा-या निवडणुकांमध्ये दाखवून देऊ की येथे फक्त आणि फक्त राणेंचे वादळ चालते. कोणाच्या चुका झाल्या असतील त्या बाजूला ठेवून असा विजय संपादन करू की फिनिक्स पक्ष्यालासुद्धा लाज वाटेल.
– उमेश सहदेव राणे
नेता हा पदासाठी नाही जनतेच्या कल्याणासाठी भांडतो.. दादा आपण नेता होता, आहात, आणि राहणार.
– अमोल बोरुडे
झाले ते अतिशय वाईट झाले. कोकणी माणसासाठी एवढे काम करूनही, बाहेरच्या माणसांच्या खोटय़ा प्रचाराला बळी पडून आणि काही आपल्याच माणसांच्या करटेपणाला बळी पडून कोकणी माणसाने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. राणे साहेबांनी नेहमी कोकणी माणसाच्या भल्यासाठीच काम केले. जे काही प्रकल्प आले आणि येणार होते ते कोकणी माणसाच्या भल्यासाठीच होते. पण विरोधाला विरोध म्हणून विरोधकांनी त्याला विरोध केला आणि कोकणी माणूस त्यांच्या अपप्रचाराला बळी पडला आहे. राणे साहेबांमध्ये जी काम करण्याची धमक आहे ती इतर कोणामध्ये आहे का?, आपला कोकण काय होता आणि कोकणचा विकास कोणी केला हेसुद्धा कोकणी माणूस विसरला. अणु उर्जा प्रकल्प आल्यावर कोणाचा फायदा झाला असता, आपलाच फायदा झाला असता. सी वर्ल्ड, चिपी विमानतळ आणि इतर जे प्रकल्प होते त्याने पर्यटन वाढल असते. कोकणाकडे कोणी अगोदर लक्ष तरी देत होते काय. आम्हा लोकांना वाटत होतं कोकण असाच मागास राहणार. रस्ते, वीज असेच मागसलेपण राहणार. पण राणे साहेब आल्यावर सर्व बदलले. बाहेरचे आले आणि विरोधात बोलून गेलं. त्यांचं काही नुकसान होणार नाही आहे. नुकसान कोकणी माणसाचं होणार आहे. येणारा काळच ठरवेल. घरच्याला जेवढी आपुलकी असते तेवढी बाहेरची नसते. फक्त राणे साहेबांना खाली खेचणं हेच विरोधकांचे काम होते. त्यांना कोकणच्या विकासाशी काही देणे घेणे नाही. निलेश राणे साहेबांच्या पराभवामुळे काही कोकणी माणसं खूश असतील पण घरच्या मोठय़ा माणसाचे खच्चीकरण करणे हे पूर्ण घरही खच्चीकरण करणारे असते. इतर मोठय़ा नेत्यांची नावे घोटाळ्यात येत असताना राणे साहेब मात्र सर्वापासून लांब राहिले. फक्त विरोधकच काही अपप्रचार करीत राहिले. ज्याला कसला आधार नव्हता. देव आमच्या कोकणी माणसाला सद्बुद्धी देवो आणि त्यांचे रक्षण करो.
– संदेश हडकर
नारायण राणे यांच्यामध्ये जेवढी हिम्मत आहे तेवढी आहे का महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांत? फक्त मोदींसाठी मत देणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की कोकणचा विकास हा फक्त राणे साहेबांमुळे झाला आहे. जे लोक म्हणतात मुंबई गुजरातची त्यांनाच आपण निवडून दिले आहे, त्याचे परिणाम दिसतीलच लवकर.
– सायली सावंत
कोकणी माणसा जागा हो. जेव्हा कोकणवर संकटे येतात तेव्हा कोकणवासीयांच्या मदतीला उद्धव ठाकरे नाही तर राणे साहेब धाऊन येतात.
– मनोज जाधव
या वेळी लोकांनी उमेदवार बघून नाही तर सरकार बदलण्यासाठी मतदान केले. पण राणे साहेबांचा पराभव मनाला चटका लावून गेला. राणे साहेबांमुळेच कोकणचा विकास झाला आहे.
– प्रतीक्षा बागवे
निलेश राणे यांनी ५ वर्षात दिवस-रात्र एक करून काम केले. पण निलेश राणे यांनी काय केले असे विचारणाऱ्यांनी सेनेचे ४-४ वेळा खासदार झालेल्या सुरेश प्रभू आणि अनंत गीते यांनी कोणते ठोस काम केले ते सांगावे.
– समीर दळवी
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यानी कोकणला ओळख दिली. कोकणी माणसाचे अस्तित्व निर्माण केले, दिल्लापर्यंत कोकणचा आवाज घुमवला त्या राणे साहेबांच्या पाठीशीच आम्ही कायम राहणार.
– राजेश सावंत
राणे साहेबांनी राजीनामा देऊ नये
– परेश मुणगेकर
कम बॅक नक्कीच करू. जे गमावले ते विधानसभेला मिळवून दाखवू.
– तुषार गावडे
लढता लढता हरलो जरी
त्याची मला खंत नाही
लढा माझा कोकणसाठी
लढाईला माझ्या अंत नाही
पुन्हा उठेन पुन्हा लढेन
शांत बसायला मी काही संत नाही
– अनुप वेंगुर्लेकर
या वेळी लोकांनी उमेदवार बघून नाही तर सरकार बदलण्यासाठी मतदान केले. पण राणे साहेबांचा पराभव मनाला चटका लावून गेला. राणे साहेबांमुळेच कोकणचा विकास झाला आहे.श्री. राणे यांनी आपल्या परीने कोकणात बरेच काही केले आहे,या निकालातून कोकणी माणसाची खेकडयाची प्रवृत्ती दिसून आली. परंतु हा पराभव त्यांच्याच दलाल लोकांच्या वागणुकीमुळे झालेला आहे.विरोधाला विरोध म्हणून विरोधकांनी त्याला विरोध केला आणि कोकणी माणूस त्यांच्या अपप्रचाराला बळी पडला आहे. राणे साहेबांमध्ये जी काम करण्याची धमक आहे ती इतर कोणामध्ये आहे का?,कोकणच्या सर्वागीण विकासाचे स्वप्न नव्हे ध्यास घेऊन राजकारणातही समाजकारणाचा मंत्र जपणारे नारायणराव राणेसाहेब म्हणजे कोकणाला लाभलेले झुंजार व्यक्तिमत्त्व आहे. असा नेता सध्या अन्य कोणीही नाही आणि पुढेही होणार नाही. कोकणच नव्हे तर राज्याच्या सर्वागीण विकासासाठी त्यांची तळमळ, जिद्द व दूरदृष्टी वारंवार दिसते. लोकांचे विठ्ठलप्रेम आजही ओसरले नाहीय, परंतु आजूबाजूच्या बडव्यांनी पंढरी घाण केलीय.मोठय़ा नेत्यांची नावे घोटाळ्यात येत असताना राणे साहेब मात्र सर्वापासून लांब राहिले. फक्त विरोधकच काही अपप्रचार करीत राहिले. ज्याला कसला आधार नव्हता. देव आमच्या कोकणी माणसाला सद्बुद्धी देवो आणि त्यांचे रक्षण करो.
दादा, आम्ही तुमच्यासोबतच…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………