एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण केल्यामुळे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली विमानप्रवास बंदी अखेर मागे घेण्यात आली आहे.
मुंबई- एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण केल्यामुळे शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घातलेली विमानप्रवास बंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. शिवसेनेच्या दबावानंतर भाजपला नमती भूमिका घ्यावी लागली.
उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी पुणे-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला होता. बिझनेस क्लासचं तिकीट असताना इकोनॉमी क्लासमध्ये बसवण्यावरुन झालेल्या वादात रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिका-याला सँडलने मारहाण केली होती.
या घटनेनंतर एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान प्रवास बंदी घातली होती. लोकसभेत शिवसेनेच्या वतीने गायकवाड यांच्यावर बंदी उठविण्यासाठी जोरदार दबाव वाढविण्यात आला. यावेळी गायकवाड यांनी लोकसभेत आपली बाजू मांडली. माझ्यावर लावलेला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा. माझ्यावरची विमान प्रवास बंदीही हटवावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्यांच्या मागणीनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली. रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेतली नाही तर १० एप्रिल रोजी एनडीएच्या होणा-या बैठकीत आम्ही जाणार नाही, अशी भूमिका सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली होती. भरात भर म्हणजे सेनेचे मंत्री अनंत गीते यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजूंची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व घडामोडीनंतर गायकवाड यांच्यावरील बंदी मागे घेण्यात आली आहे.
ये शो है तीन घंटोन्का,! ( मेरा नाम जोकर ) स्व .राजकपूर .!!!