महात्मा गांधीजी यांच्या स्वातंत्र्यलढयातील योगदानाबद्दल बोलण्यापूर्वी त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे या स्वातंत्र्यलढयात काय योगदान आहे?
मुंबई- भारताच्या स्वातंत्र्यलढयातील महात्मा गांधी यांच्या योगदानाबद्दल काही नेते शंका व्यक्त करत आहेत, मला त्यांना सांगायचे आहे की, महात्मा गांधीजी यांच्या स्वातंत्र्यलढयातील योगदानाबद्दल बोलण्यापूर्वी त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे या स्वातंत्र्यलढयात काय योगदान आहे? भारतातील जनतेच्या विकासासाठी त्यांचे काय योगदान आहे याचा विचार करावा, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी लगावला.
‘पुण्यनगरी’ या वर्तमानपत्राच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मुंबईत शुक्रवारी भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते केवळ एकटया महात्मा गांधींमुळे नाही, असे वक्तव्य केले होते. त्यांचे नाव न घेता नारायण राणे म्हणाले की, आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन सोमवारी आहे.
आपल्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. अशा वेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
परंतु सध्या काही राजकीय व्यक्ती स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्यावर टीका करत आहेत. मला त्यांना एवढाच प्रश्न करायचा आहे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात काय योगदान आहे, असे भाष्य करण्यास आपण पात्र आहोत, काय याचा विचार त्यांनी करावा.
स्वातंत्र्यलढयात आपले किंवा आपल्या पक्षाचे काय योगदान होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातील जनतेच्या विकासासाठी आपले योगदान काय आहे, याचा विचार करावा. स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या त्याग व बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले याचा विसर कोणीही पडू देऊ नये. या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू या, असे आवाहन राणे यांनी केले.
मराठी वृत्तपत्र चालविणे सध्या अवघड बनले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बाळशास्त्री जांभेकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वृत्तपत्र सुरू केले, त्या वृत्तपत्राचे व त्या पत्रकारितेचे पावित्र्य जपले जाते का असा सवालही त्यांनी केला.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘पुण्यनगरी’समूहाच्या मुख्य संपादिका राही भिडे यांनी प्रास्ताविक केले.
संघाला जोरदार चपराक
what is your contribution moron? Dance bars and goondagiri in Maharashtra!! keep your trap shut