कोपर्डी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तातडीने फाशी द्या, ही प्रमुख मागणी घेऊन सकल मराठा समाज शुक्रवारी उस्मानाबादच्या रस्त्यावर उतरला.
उस्मानाबाद- कोपर्डी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तातडीने फाशी द्या, ही प्रमुख मागणी घेऊन सकल मराठा समाज शुक्रवारी उस्मानाबादच्या रस्त्यावर उतरला. काळे आणि भगवे झेंडे एका हातात तर दुस-या हातात मराठा म्हणजे उत्तर असा फलक घेऊन जवळपास दोन ते अडीच लाख मराठा समाजाने एकत्र येत मराठा एकजुटीची ताकद दाखवली.
जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटरच्या या विराट नव्हे; महाविराट मोर्चात जवळपास दोन ते अडीच लाख मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते. उस्मानाबादच्या इतिहासात प्रथमच मराठा क्रांतीचा एल्गार उस्मानाबादकरांना पाहायला मिळाला. या मोचार्मुळे कधी नव्हे ते पोलीस आणि प्रशासन हादरून गेले.
पाच वर्षापासून ऐंशी वर्षाच्या वृद्ध व्यक्तीबरोबर विद्यार्थिनी, तरुणी, महिला, विद्यार्थी, तरुण आणि प्रौढ व्यक्ती या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजातील तरुणी आणि महिला प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. जवळपास २० ते २५ हजार महिला, १५ ते २० हजार तरुणी आणि तितक्याच संख्येने विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या होत्या.
शहरातील जिजाऊ चौकातून दुपारी १२च्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. पहिले टोक ताजमहल टॉकीजजवळ असताना शेवटचे टोक जिजाऊ चौकात होते. जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटरचा हा मोर्चा उस्मानाबादच्या इतिहासात क्रांती ठरला. मोर्चा अत्यंत शांत ,शिस्तीत पार पडला. कुठेही गोंधळ नाही, गडबड नाही किंवा शिस्तीचा भंग नाही. जसा ठरला तसाच मोर्चा निघाला.
या सर्वाबरोबर न्यायालयात न्याय मिळवून देणारे वकीलही मोठय़ा संख्यने सहभागी झाले होते. वकिलांनी शुक्रवारी न्यायालयीन कामकाजात भाग न घेता, काळा कोट घालून हातात फलक घेत मोर्चात सहभाग नोंदवला. त्याचबरोबर शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, उद्योजक, व्यापारी, शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जिजाऊ चौकातून दुपारी १२च्या सुमारास जिजाऊ वंदनाने मोर्चास प्रारंभ झाला.
औरंगाबादेत ९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाने क्रांती दाखवल्यानंतर उस्मानाबादेत २६ ऑगस्ट रोजी महाक्रांती घडवून आणली. या वेळी अहमदनगर जिलतील कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणा-या आरोपींविरोधात तातडीने दोषारोपपत्र दाखल करून आरोपींना फासावर लटकवावे, दहा वर्षात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या मराठा समाजातील झाल्या असून, आत्महत्या केलेल्या मराठा समाजातील शेतक-यांच्या पाल्यांना नोकरीत समावून घ्यावे, ईबीसीची सवलत मर्यादा सहा लाखापर्यंत वाढवावी यासह इतर विविध मागण्या करण्यात आल्या.
लग्नघटिका बाजूला सारली, अन् त्यांनी थेट मोर्चाची वाट धरली!
उस्मानाबाद- लग्न म्हटले की, नवरा-नवरीच्या मनात हुरहूर, आनंद अन् गोड-गुलाबी स्वप्ने असतात. लग्नघटिका जवळ येते तसा हा आनंद द्विगुणित होतो; उस्मानाबादमधील एका नवदाम्पत्यांना शुक्रवारी लग्नघटिका बाजूला सारत थेट मोर्चाची वाट धरली. ‘कोपर्डी’ घटनेचा निषेध करण्यासाठी उस्मानाबादमध्ये मराठा समाजाच्या विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
याच वेळी एक जोडपे लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी थेट मोर्चात सहभागी झाले. मोर्चात आपला निषेध नोंदवल्यानंतर हे जोडपे लग्नस्थळी पोहोचले. मोर्चात सहभागी होऊन या जोडप्याने केवळ निषेधच व्यक्त केला नाही. तर आपल्या लग्नाचा खर्च वाचवून त्यातील काही रक्कम कोपर्डीतील पीडित मुलीच्या कुंटंबीयांना दिली. दरम्यान, नववधूही मोर्चात सामील झाली होती.
बास झाल कि आता, काय फक्त मराठ्यांच्याच आयाबहिणीला इज्जती असतात काय?बाकी सगळे वाऱ्यावर हा जातीचा दुरुपयोग आणि झुंडशाही आहे,आरोपींनाहि पकडले आहे, तुमच्या पवारच्या सारखे हे सरकार बकवास नाही,कामधंदा नसेल तर दुसरी चांगली कामे करा,फालतुगिरी नुसती,कित्येक वर्ष मराठा राज्य करत आहेत तरी ते त्यांचेच प्रश्न सोडवू शकले नाहीत,व्हा का नाही असे मोर्चे काढले, पवारने का नाही मराठा आरक्षण केले,15 वर्ष होती त्याला आणि आता तुम्ही पवार पवार,मराठा करत आहात 21व्या शतकात,आणि पवार BJPला जातीयवादी म्हणतो खरे तुम्ही जातीयवादी,