मालवण-कुडाळ मतदारसंघातून नारायण राणे यांनी कुडाळ येथे, तर कणकवली-वैभववाडी-देवगड मतदारसंघाचे उमेदवार नितेश राणे यांनी कणकवली येथे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
कणकवली – तिरंगी झेंडे, ढोलताशांचा गजर, काँग्रेस पार्टी जिंदाबादच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त जल्लोष अशा उत्साही वातावरणात मालवण-कुडाळ मतदारसंघातून नारायण राणे यांनी कुडाळ येथे, तर कणकवली-वैभववाडी-देवगड मतदारसंघाचे उमेदवार नितेश राणे यांनी कणकवली येथे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
‘‘कार्यकर्त्यांच्या या उत्साहानेच काँग्रेसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. तुमच्या या उत्साहाच्या बळावरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागांवर काँग्रेसच विजयी होईल,’’ असा विश्वास काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी व्यक्त केला. एकशेवीस वर्षाची परंपरा असणा-या काँग्रेसचीच सत्ता पुन्हा महाराष्ट्रात येईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नितेश राणे यांनी सकाळी आपला अर्ज कणकवली येथील तहसील कार्यालयात भरला. अर्ज भरायला जाण्यापूर्वी त्यांची भव्य मिरवणूक गांगो मंदिरापासून निघालेली होती. संपूर्ण मतदारसंघातून उत्स्फूर्तपणे कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
तिरंगी झेंडय़ांनी संपूर्ण वातावरण काँग्रेसमय झाले होते. तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मराठा नाटय़ मंदिरमध्ये भव्य सभा झाली. नारायण राणे यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भावनिक साद घातली. आपल्या उत्साहानेच नितेश राणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र तरीही गाफील राहू नका, लोकसभेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी दक्ष राहा, अशा सूचना राणे यांनी केल्या.
नितेश राणे म्हणाले की, माझे वडील नारायण राणे हेच माझे आदर्श आहेत. समाजसेवा कशी करावी, कार्यकर्त्यांशी कसे वागावे, लोकांचे प्रश्न कसे सोडवावेत याचे संस्कार त्यांनी माझ्यावर केले आहेत. आता काम करून लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन.
मालवण-कुडाळ मतदारसंघातून उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी नक्षत्र टॉवरपासून त्यांची भव्य मिरवणूक निघाली होती. संपूर्ण मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे, युवा नेते नितेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक राणे यांना शुभेच्छा देत होते. कुडाळ तहसील कार्यालयात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे त्यांची भव्य सभा झाली. या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना अत्यंत आपुलकीच्या शब्दांत साद घातली. ते म्हणाले, गेली पंचवीस वर्षे मी या विभागातून निवडणूक लढवीत आहे. आपण माझ्यावर विश्वास दाखवलात, प्रेम दिले आणि मीही त्या प्रेमाला उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्हाला अभिमान वाटावा, असे काम केले आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि पुन्हा मंत्री अशी सर्व पदे भूषवली आहेत. हे तुमच्या प्रेमामुळेच करू शकलो. आपल्या सर्वाचे ऋण मी फेडू शकणार नाही. माझ्यावर प्रेम करणा-या कार्यकर्त्यांचे, मतदारांचे आभार मानण्यासाठी आलो आहे. हे प्रेम असेच राहू द्या आणि जिल्ह्यातील तिन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील, यासाठी दक्षतेने कामाला लागा, असे आवाहन राणे यांनी केले.
thank you very much
मराठी
काय कमावल , काय गमावलं
निवडणुका झाल्या , निकाल लागला आणि आता भाजपाने आपला विधिमंडळ नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घोषित केले .
हे सर्व चालू असताना राज्यात अनेक घडामोडी घडल्या . कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही . त्यात कॉंग्रेस पक्षाने आपला सुसंस्कृतपणा दाखवत विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली . शरद पवारांना अजूनही सत्तेचा सारीपाट सोडवेना म्हणून ते बिनशर्त पाठींबा , बाहेरून पाठींबा , बहुमतास गैरहजेरी वगेरे आपले राजकारणातील सर्कशीचे खेळ करत आहेत . या निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळवता आल नाही त्यामुळे त्यांच्या सरकारला अजूनही टेकूची गरज आहेच . आणि त्यांची त्यासाठी हरतऱ्हेची चाचपणी सुरु आहे .
परंतु तमाम मराठी माणसाचं लक्ष लागल आहे ते शिवसेनेच्या भूमिकेकडे . बाळासाहेब असतानाची शिवसेना हि ताठर होती , आपल्या विचारांशी ठाम राहणारी होती . आणि त्यामुळे इतर पक्षातही बाळासाहेबांचा आदर करणारी अनेक लोक होती . बाळासाहेबांच्या निधनानंतर हाच वारसा उद्धव ठाकरे पुढे नेतील हि अपेक्षा तमाम शिवसैनिक करत होते .
युतीमधून काडीमोड घेतल्यानंतर उद्धवनीसुद्धा भाजपचे वाभाडे काढायला सुरुवात केली . अगदी शिवाजी महाराजांच्या मुद्द्यापासून ते अफजल खान वगेरे पर्यंत भाजपवर आसूड ओढले . पण त्यांनी आणलेलं हे उसन बळ औटघटकी होत हे कळायला फार वेळ लागला नाही .निकालानंतर तर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा अपमान करायची एकही संधी सोडली नाही . आज दिल्ली दरबारी सुभाष देसाई ,अनिल देसाई यांसारखे खंदे गडी लोटांगण घालताहेत . सत्तेच गजर दाखवून सेनेवर शालजोडीतले फटके हाणले जात आहेत . आज तर एका केंद्रीय नेत्याने उद्धव ठाकरे यांनी अमित हा आणि नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागावी त्यानंतरच चर्चा करू अशी भाजपची भूमिका असल्याच सांगितलय. एकीकडे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केलेला असताना इकडे शिवसेनेला चर्चेच्या नावाखाली भाजपने चांगलेच झुलवत ठेवलय . आणि एवढ सगळ करून जर भाजपने अपक्ष आणि फुटीर आमदारांना घेऊन सत्ता स्थापन केली तर मात्र शिवसेनेची अवस्था ना घर का ना घाट का अशी होणार .
याचा दूरगामी परिणाम महानगरपालिका आणि येणाऱ्या इतर निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित . परंतु यामध्ये शिवसेनेवर विश्वास ठेवलेल्या सामान्य माणसाचा झालेला अपेक्षाभंग दुर्दैवी आहे .
– मंदार गावडे, वेंगुर्ला