काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर यांच्या टीकेला भाजपकडून प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. काश्मीरमधील समस्यांना संपूर्णपणे नेहरु आणि गांधी घराणे जबाबदार आहे, असे प्रत्यूत्तर भाजपकडून राहुल गांधींना देण्यात आले आहे.
नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर यांच्या टीकेला भाजपकडून प्रत्यूत्तर देण्यात आले आहे. काश्मीरमधील समस्यांना संपूर्णपणे नेहरु आणि गांधी घराणे जबाबदार आहे, असे प्रत्यूत्तर भाजपकडून राहुल गांधींना देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावण्यास वाव मिळाला, अशी गंभीर टीका राहुल गांधी बुधवारी केली होती.
काश्मीरमधील आव्हाने नेहरु आणि गांधी घराण्यामुळे निर्माण झाली आहेत, अशी टीका करत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी प्रत्यूत्तर दिले आहे. काश्मीरमधील समस्या गांधी, नेहरू कुटुंबामुळे निर्माण झाल्या हे संपूर्ण देशाला माहित आहे, असेदेखील इराणी यांनी म्हटले. सुट्टीवरुन परत आलेले राहुल गांधी दहशतवाद्यांबद्दल बोलण्याऐवजी पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य करत आहेत. ज्यावेळी काँग्रेस नेते मनीशंकर अय्यर मोदी सरकार पाडण्यासाठी पाकिस्तानची मदत घेत होते, त्यामागे राहुल गांधींचा काही स्वार्थ होता का?, हा प्रश्न त्यांना विचारायला हवा, असे इराणी यांनी म्हटले.
काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी लष्कर प्रमुखांना गुंड म्हटले होते. त्यामागे राहुल गांधी यांचा काही राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थ होता का? असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. राहुल गांधींनी स्वत:च्या कुटुंबाचा इतिहास वाचल्यास, त्यांचेच कुटुंब काश्मीरमधील समस्यांना जबाबदार असल्याचे राहुल गांधी यांना समजेल, अशी टीका मिनाक्षी लेखी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणा-या राहुल गांधी यांना उत्तर देताना लेखी यांनी १९८४ मधील शिख समुदायाच्या शिरकाणाचा संदर्भ दिला. स्वत:च्या स्वाथार्साठी शिरकाण घडवणा-याना निष्पापाच्या रक्तात फायदा दिसू शकतो, असे जोरदार प्रत्युत्तर लेखी यांच्याकडून देण्यात आले.
राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका अतिशय अपरिपक्व असल्याचे मिनाक्षी लेखी यांनी म्हटले. काश्मीरमधील समस्यांना, अडचणींना देशाचे पहिले पंतप्रधान राहिलेले जवाहरलाल नेहरु सर्वस्वी जबाबदार आहेत. याबद्दलची माहिती योग्य सल्लागारांकडून घेतल्यास, ही गोष्ट राहुल गांधी यांच्या लक्षात येईल, असेही लेखी यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी स्वत:च्या तात्पुरत्या फायद्यासाठी देशाचे दीर्घकाळाचे नुकसान करत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.
Yes, U r right……