रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षणाच्या मूलभूत सुविधांपैकी रस्ते हे विकासाचा मार्ग ठरतात. झपाटय़ाने विकास होण्यासाठी चांगले रस्ते असणे आवश्यक आहे.
पोलादपूर – रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षणाच्या मूलभूत सुविधांपैकी रस्ते हे विकासाचा मार्ग ठरतात. झपाटय़ाने विकास होण्यासाठी चांगले रस्ते असणे आवश्यक आहे.
मात्र, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पोलादपूर तालुक्यातील अंतर्गत गाव-वाडय़ा-वस्त्यांपर्यंत जाणा-या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. रस्त्यांची इतकी दुरवस्था झाली आहे की, रस्ते खड्डय़ांत आहेत की खड्डय़ांत रस्ते अशी स्थिती आहे.
तालुक्यातील ८७ गावे व २१२ गाव-वाडय़ा-वस्त्यांवर काही दुर्गम भागातील वाडय़ा-वस्त्यांचा अपवाद वगळता रस्त्यांचे जाळे विणले गेले असल्याने गावांच्या विकासाला चालना मिळण्याचे चित्र दिसून येत आहे.
मात्र, क्षेत्रफळ ते धनगरवाडी-कुडपणखुर्द-बुद्रुक, रेवेवाडी, साखर ते खांडस, गोवेळे, तळ्याची वाडी, शिवाजी चौक ते तुर्भेखोंडा, चरई पूल ते वडाचा कोंड, उमरठ ते खोपड-चांदके-ढवळे, पितळवाडी ते केवनाळे, बागवाडी ते फणसकोंड-महाळगूर-आड-तामसडे, मोरेवाडी, देवळे आदी, वाशीवाडी ते वडुळसे, बोरजघाट ते देवळे-करंजे, कोतवाल हायस्कूल ते कोतवाल गाव, कुंभळवणे विहीर ते सानेवाडी, धामणदेवी ते कातळी या अंतर्गत गाव-वाडय़ा-वस्त्यांना जोडणारा रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.
रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून ये-जा करणा-या वाहनांचे एक्सल तुटणे, टायर फुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत. ग्रामस्थांना आपले घर गाठण्यासाठी तीन ते सात किमी पायपीट करावी लागत आहे. या रस्त्यांवर पावसामुळे वारंवार ओसरे (छोटय़ा दरडी) येत आहेत.
त्यामुळे या गाव-वाडय़ा वस्त्यांचा तालुक्याशी संपर्क तुटतो. त्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होतात. जोरदार पाऊस झाला तर खराब रस्त्यांवरील एसटी बसेसच्या फे-या रद्द कराव्या लागतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचा रोजगार बुडतो. विद्यार्थ्यांची शाळेत गैरहजेरी होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्तेदुरुस्तीबाबत वारंवार तक्रारी करूनही तालुक्यातील रस्त्यांची दयनीय स्थिती कायम आहे.
खांडस-गोवेले-तळ्याची वाडी, उमरठ येथील माध्यमिक विद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांना रस्ते दुरुस्ती नसल्याने ढवळी नदीच्या साकववरून जावे लागते. हा पूलही खिळखिळा झाला आहे. पुलाचा पृष्ठभाग जागोजागी तुटला आहे. अशा या कोसळण्याची शक्यता असलेल्या साकववरून सुमारे तीस विद्यार्थी दररोज उमरठच्या शाळेत जातात. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.
गाव क्षेत्रपाल ते क्षेत्रपाल आमलेवाडी हा रस्ता दीड किलो मिटर आहे
हा रस्ता एक किलो मिटरचे डंबरीकर झाले आहे ,आनी आर्धा किलो मीटर रस्ता डंबरीकरन बाकि आहे , आनी पूल व मोरीचे काम बाकि आहे , हे काम लवकर करून दयावे
ही नम्र विंनति