मुंबई विद्यापीठाकडून टीवाय बीएच्या पाचव्या अणि सहाव्या सेमिस्टरचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
मुंबई- मुंबई विद्यापीठाकडून टीवाय बीएच्या पाचव्या अणि सहाव्या सेमिस्टरचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मात्र यातील तब्बल ३५० हून अधिक विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठ, एमकेसीएल व महाविद्यालयांकडून देण्यात येणा-या माहितीच्या गोंधळामुळे रखडला आहे.
निकाल हाती न पडलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे चकरा माराव्या लागत असून त्यासाठी योग्य उत्तर ना विद्यापीठ ना महाविद्यालयांकडून दिले जात नसल्याने विद्यार्थ्यांत संताप आहे.
टीवायबीए तृतीय वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरचा (सत्राचा) श्रेयांक श्रेणी पद्धतीचा निकाल १० फेब्रुवारी रोजी जाहीर झाला होता तर त्यापाठोपाठ सहाव्या सेमिस्टरचाही निकाल जाहीर झाला होता. या परीक्षेला १५ हजार ८४२ विद्यार्थी बसले होते.
या परीक्षेचा निकाल ५९.६८ टक्के इतका होता. यात ५०० विद्यार्थी हे श्रेयांक श्रेणी पद्धतीनुसार‘ओ’ श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. तर सहाव्या सेमिस्टर परीक्षेतही १४ हजारांच्या दरम्यान विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
या दोन्हीही परीक्षेला बसलेल्या ३५० हू अधिक विद्यार्थ्यांचा निकालच अद्याप जाहीर झाला नसून त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून केवळ ‘नो इन्फारर्मेशन’ असे दाखवले जात आहे. यात विद्यार्थ्यांची कोणती माहिती परीक्षा विभागाकडे पोहोचलेली नाही, याची माहिती विद्यार्थ्यांना अद्याप कळवलेली नाही.
विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी परीक्षा नियंत्रकाकडे यासंबंधी तक्रार केल्यानंतर हा भाग ‘एमकेसीएल’ने विद्यापीठाला पोहोचवलेल्या माहितीतच गोंधळ असल्याचे समोर आल्याचे ते म्हणाले.
मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काकरिता “विद्यार्थी दरबार” भरवून त्यांच्या समस्या व शंकेचे निरसन करण्याचे आश्वासन दिले. खरतर हाच प्रश्न विद्यार्थी दरबारात मांडून एखाद्या तरी विद्यार्थीने त्या दरबारातील उपस्थित मंडळीस एकच प्रश्न विचारायचा कि आमच्या जागी जर तुमचा मुलगा किंवा मुलगी किंवा नातेवाईक किंवा हितसंबंधी या परीक्षेस उपस्थित असते आणि त्यांचे निकाल जर उशिरा व गोंधळात्मक लागले असते, एखाद्या विद्यार्थ्याने जर त्यामुळे आत्महत्त्या केली असती तर याला विद्यापीठाचे कोणते प्रशासन जबाबदार असते? खरे पाहता मुंबई विद्यापीठात कर्मचारी निवडला जातो तो त्याच्यातील कलागुणात्मामुळे आणि अक्कल हुशारीमुळे. तेथील अस्थापना विभाग जेव्हा कर्मचार्याची निवड करते ती त्याची योग्यता बघूनच. खरे तर परीक्षा विभागात असे कितीतरी कर्मचारी आहेत जे डोळ्यात तेल घालून सुट्टीच्या दिवशीही अतिरिक्त पगार न घेता कामे करत आहेत, खरतर त्यांची प्रशंसाच करण्यात आली पाहिजे. नाहीतर इतर विभागात कित्येक कर्मचारी एकतर गप्पाटप्पाचा कार्यक्रम आयोजित करण्यात मग्न असतात. तर काही जण न बोलता फेसबुकवर गप्पा मारत असतात, बघणाऱ्या व्यक्तीस त्या व्यक्ती कामे करताना दिसतात. उलट तेथील कर्मचारी संघटनेतील प्रत्येक सभासद हि अशावेळेस एखाद्या विभागात अडीअडचणीचे कामकाज आले तर ज्या विभागातील कर्मचारी फक्त बसून असतील तर त्यानाही निकाल विभागातील कामे पूर्णकरून देण्यास मदतीचा हात मागतात. कर्मचारी संघटनेतील कित्येक सभासद राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू आहेत आणि मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र क्रीडांगणहि आहे, परंतु जर अत्यावश्यक काम असेल तर कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष व सरचिटणीस त्यांचे सामने हि निकालाप्रमाणे लांबणीवर ठेवतात. निकालाचे अर्धे अधिक काम जरी ‘एमकेसीएल’ कडून करून घेण्यात आले तरी जेव्हा निकालाची तारीख परीक्षा नियंत्रका कडून घोषित होते तेव्हा रात्रीचा दिवस करून खाण्या पिण्याची पर्वा न करता त्या विभागातील प्रत्येक कर्मचारी त्या निकालाच्या कामकाजात स्वताला व्यस्थ ठेवतो.