बांबू लागवड ही कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी शेती आहे. कोकणातील हवामान आणि जमीन बांबू लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
कणकवली – बांबू लागवड ही कमी मेहनतीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी शेती आहे. कोकणातील हवामान आणि जमीन बांबू लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे येथे बांबूचे व्यावसायिक उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येऊ शकते. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांत बांबू लागवडीपासून चांगले उत्पन्न मिळवता येईल. कोकणातील शेतक-यांना नगदी पिकाचा चांगला पर्याय समोर येत असून कृषी विभाग, बँका व वनविभाग यांनी पाठबळ मिळाल्यास शेतक-यांची आर्थिक उन्नती वेगाने होण्यास मदत होईल. बांबूपासून एकरी एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न सहज मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हस्तकला, शेती, फर्निचर, खाद्य, बांधकाम, विविध वस्तू, वाद्यनिर्मिती, कागद उद्योग यांच्यासाठी बांबूचा उपयोग होतो. अलीकडे बांबूचा उपयोग वीजनिर्मितीसाठीही केला जात आहे. सध्या विजेचा तुटवडा जाणवत आहे. जर बांबूचा उपयोग वीजनिर्मितीसाठी होत असेल तर शेतक-यांनी बांबू लागवड करून देशाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. वर्षानुवर्षे दुर्लक्षित जमिनीवर बांबू लागवड होऊ शकते. शिवाय बांबूसाठी खतपाणी घालावे लागत नाही व निगा राखावी लागत नाही. तरीही बांबू वर्षाकाठी आपल्याला ६० हजारांपर्यंत उत्पन्न मिळवून देते. कोकणात मोठ्या प्रमाणात पडिक जमिनी आहेत. कारण कोकणातील बहुतेक जमीनमालक हे मुंबईत राहतात. या पडिक जमिनीमध्ये बांबू लागवड केल्यास आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करता येते. शिवाय कोकणात जास्त पाऊस पडतो व जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. ही धूप थांबवण्यासाठी बांबू महत्त्वाची भूमिका बजावते. नदीकाठी जर बांबूची लागवड असेल तर त्या नदीकाठच्या जमिनीची धूप होत नाही.
सिंधुदुर्गात बांबू लागवड करण्यासाठी एकनाथ गावडे गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत आहेत. बांबू ही जलद गतीने वाढणारी, हवामान बदलाला अनुरूप, रोग व किडीला बळी न पडणारी वनस्पती असल्याचे गावडे यांनी सांगितले. बांबू ही वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे इतर वनस्पतींच्या तुलनेत चारपट जास्त प्रमाणात शोषण करते व मोठय़ा प्रमाणात जैवभार निर्माण करते. शेतकऱ्यांना रोजगार योजनेशी निगडित खाजगी, पडिक जमिनीवर वृक्षलागवड व वैरण विकास योजनेंतर्गत अनुदान दिले जाते.
शेतक-यांचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतींना इको व्हिलेजनिर्मितीसाठी सुधारित बांबूची रोपे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बचत गटामार्फत बांबूपासून विविध वस्तू निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्यात यावेत, अशी मागणी एकनाथ गावडे यांनी केली आहे.
बांधकाम, फर्निचर, कागदनिर्मितीबरोबरच बांबूचा वापर वीजनिर्मितीसाठी होत आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप व आफ्रिकेमध्ये भारतीय बांबूची निर्यात होते. बांबूपासून तयार होणारा जैवभार इंधन स्वरूपात वीजनिर्मितीसाठी होत आहे. उसाप्रमाणे बांबूला जमीन व हवामानाची गरज आहे. मात्र कोकणच्या हवामानाचा विचार केल्यास कोकणात बांबू लागवड चांगल्या प्रकारे होऊ शकते. बांबू हा नाशवंत माल नसून त्याची तोडणी केव्हाही करता येते. उसाप्रमाणे बांबू लागवडीसाठी मजुरांची आवश्यकता नाही. शिवाय उसाप्रमाणे बांबूची पुनर्लागवडीची गरज नाही. फक्त एकदाच लागवड करायची व आयुष्यभर उत्पन्न घ्यायचे अशी ही बांबू लागवड आहे. बांबू लागवडीसाठी खत व पाणी याचा वापर केल्यास दरवर्षी ४० ते ६० टन बांबू काठीचे उत्पादन मिळते. बांबूची तोडणी एक वर्षापासून दोन वर्षापर्यंत केव्हाही करता येते. ज्या जमिनीत ऊस येत नाही त्या ठिकाणी बांबू लागवड चांगल्या प्रकारे होते. उसाच्या सहा एकर लागवडीतून मिळणारा जैवभाव हा बांबू एक एकर लागवडीतून मिळवता येतो. बांबू लागवडीपासून जमीन सकस, कसदार व अधिक पिकावू तयार होते. बांबूमध्ये पहिल्या वर्षानंतर तण उगवत नाही. तणाचे नैसर्गिक नियंत्रण होते.
बांबु कसा व कुठे विकावा? मार्गदर्शन
नमस्ते
बांबू खेती केलीये सभी प्रकारकी जानकारी चाहीये।
बांबू प्लांटशन से लेकर अनुदान और यह मार्केट बिक्रि तक।
बार्शी जिला सोलापूर महाराष्ट्र यहां करना चाहता हूं।
बांबू खेती करणी है. उसकी सभी जाणकारी चाहता हू. प्लांटेशन और बिक्री कैसे करे ये बातैयेगा.
आर्वी, तळेगाव, dist वर्धा.