दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्षाने निर्णयांचा धडाका लावला असला तरी, दुस-या बाजूला पक्षातील अंतर्गत धुसफूसही वाढू लागली आहे.
नवी दिल्ली – दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर आम आदमी पक्षाने निर्णयांचा धडाका लावला असला तरी, दुस-या बाजूला पक्षातील अंतर्गत धुसफूसही वाढू लागली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेले लक्ष्मीनगरमधील आपचे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी पुन्हा एकदा बंडाचे संकेत दिले आहेत.
आपच्या बोलण्यामध्ये आणि कृती करण्यामध्ये भरपूर फरक असून, आपला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडू लागला आहे. आपची ज्या मुद्यावर स्थापना झाली होती त्यापासून आप दूर जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन विनोदकुमार बिन्नी आपण भूमिका मांडणार आहेत.
मंत्रीपद न मिळाल्याने तु्म्ही नाराज आहात ? या प्रश्नावर बिन्नी म्हणाले की, मंत्रिमंडळात माझ्याही नावाचा समावेश होता. मात्र मी स्वत:हून मंत्रीपद नाकारले. यापूर्वी बिन्नी यांची नाराजी दूर करण्यात आली होती.
मात्र बिन्नी यांनी पून्हा एकदा बंडाचे संकेत दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी बिन्नी यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नसल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. मनातील खदखद व्यक्त करताना आपमध्ये बंद दरवाजाआड निर्णय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
very nice……………………………