‘संपूर्ण काश्मीर मी पाकिस्तानात सामावून घेईन’ या पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तोच्या वक्तव्यावर भारताने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली- ‘संपूर्ण काश्मीर मी पाकिस्तानात सामावून घेईन’ या पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तोच्या वक्तव्यावर भारताने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भुत्तो यांनी अवास्तव स्वप्ने पाहू नयेत, असा इशारा भारताने दिला.
भारत हा उदारमतवादी भूमिका घेत आहे. याचा अर्थ आमच्या सीमांमध्ये कोणतीही ढवळाढवळ सहन करणार नाही. भारताच्या एकात्मतेशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले.
पाकिस्तान पीपल्स पार्टीची सत्ता आल्यास संपूण काश्मीर आम्ही भारताकडून घेऊ, अशी दर्पोक्ती बिलावल भुत्तो झरदारी याने केली. ‘मी पूर्ण काश्मीर पाकिस्तानात परत घेईन. मी एक इंचही जमीन सोडणार नाही’, अशी मुक्ताफळे भुत्तोने मुलतान येथे कार्यकर्त्यांसमोर उधळली होती.
आता पाकिस्तानचा ” पप्पू ” सुद्धा बोलायला शिकला ,