कोकणचा विचार करत असताना गेल्या २७ वर्षातील कोकणातील जनतेने माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले आहे. आ.राणे कोकणच्या विकासाचा विचार करूनच कोणताही निर्णय घेतात, याचे भान आणि जाणीव कोकणातील जनतेला आहे. एकीकडे आजच्या घडीला राजकारणातील सर्व चर्चा होत असताना कोकणातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची भूमिकाही अशीच आहे. ‘साहेब’ जो निर्णय घेतील तो योग्यच असेल. कोकणातील जनता त्यांच्या पाठीशी असेल, असे विशेषत: ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात.
गेले महिनाभर महाराष्ट्राचे राजकारण एका वलयांकित नावाभोवती चर्चेच्या रूपाने फिरत आहे. राजकारणामध्ये एवढे गर्दीचे आणि सतत चर्चेत राहण्याचे भाग्य फार थोडय़ांच्या नशीबी असते. गर्दीतला नेता होण्याचे भाग्य तर राजकारणामध्ये पाच-दहा टक्केच नेत्यांच्या नशीबी असते. माजी मुख्यमंत्री आ. नारायण राणे हे यातलेच एक गर्दीतला नेता असलेले नाव आहे. सत्ता असली की आपोआपच काही अंशी गर्दीही जमा होते. त्यात एखादा नेता कर्तृत्ववान असेल, लोकाभिमुख कामाचा त्याचा उरक असेल तर ही गर्दी सतत वाढत जाते. माजी मुख्यमंत्री आ. नारायण राणे यांचा कोकणातील राजकारणात प्रवेश १९९० साली झाला. गेल्या २७ वर्षात राजकारणातील अनेक पदे त्यांनी भूषविली. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक पदापासून स्वायत्त संस्थांमधील त्यांच्या कार्याला प्रारंभ झाला. नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पुन्हा मंत्री, विधानपरिषदेतील आमदार हा सारा राजकीय प्रवास नेहमीच कोकणच्या विकासासाठी आणि कोकणच्या हितासाठी होत राहिला.
कोकणातील विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाचे चित्र बदलले गेले यामागे माजी मुख्यमंत्री आ. नारायण राणे यांच्या दूरदृष्टीचे राजकारण आणि समाजकारण कारणीभूत आहे. उर्वरित महाराष्ट्रातील नेत्यांचे राजकारण हे नेहमीच विकासाचे राजकारण राहिले आहे. आपल्या भागाचा सर्वागीण विकास व्हावा त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सतत होत असतात. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात गेल्या ४० वर्षातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राकडे दृष्टीक्षेप टाकला तर राजकारणातून प्राप्त झालेली सत्ता आणि सहकारातून उभे झालेले काम यातून विकासाचे एक वेगळे गणित या भागात मांडले गेले. ते यशस्वीही झाले. विशेष म्हणजे उर्वरित महाराष्ट्रातील जनता विकासप्रक्रियेला अधिक महत्त्व देत आपआपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत राहिली. त्या-त्या भागातील नेत्यांनी त्या-त्या परिस्थितीत घेतलेले निर्णय तिथल्या जनतेने अंगीकारले. मिटल्या डोळ्यांनी त्या जनतेने नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. एखाद्या भागाचा विकासाचा विचार करताना आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात. किंवा क्षणभर आपल्याला त्या भागातील नेतेपणाचे कौतुक वाटते. परंतु, यासाठी जनतेचे पाठबळ ही आवश्यक बाब ठरते. महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या बाबतीत त्यांनी त्या-त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचा विचार करता त्या भागातील जनतेने आपल्या नेत्याने निर्णय कोणताही घेवो, परंतु आपण त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे, अशी भूमिका घेऊन उर्वरित महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना विविध क्षेत्रामध्ये काम करता आले.
कोकणचा विचार करत असताना गेल्या २७ वर्षातील कोकणातील जनतेने माजी मुख्यमंत्री आ. नारायण राणे यांच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले आहे. आ. नारायण राणे कोकणच्या विकासाचा विचार करूनच कोणताही निर्णय घेतात, याचे भान आणि जाणीव कोकणातील जनतेला आहे. एकीकडे आजच्या घडीला राजकारणातील सर्व चर्चा होत असताना कोकणातील बहुसंख्य सर्वसामान्य जनतेची भूमिकाही अशीच आहे. ‘साहेब’ जो निर्णय घेतील तो योग्यच असेल. कोकणातील जनता त्यांच्या पाठीशी असेल, असे विशेषत: ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्या शब्दाला वजन आहे. यापूर्वीच्या कॉँग्रेसी सत्ताकाळातही राज्यात मंत्री मंडळाच्या बैठकीत एखाद्या विकासाच्या मुद्दय़ांवर चर्चा व्हायची आणि जेव्हा उर्वरित महाराष्ट्रातील मंत्री आपल्या भागातील शेतक-यांसाठी किंवा विकास प्रकल्पासाठी आग्रही राहायचे त्याचवेळी आ. नारायण राणे यांची भूमिका ही स्पष्ट असायची. उर्वरित महाराष्ट्रातील विकासप्रक्रियेसाठी आवश्यक निधी घ्याच परंतु, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करत असताना कोकणातील विकास प्रकल्पांचाही विचार व्हायला हवा, आणि त्यासाठीचा आग्रहपूर्वक निधी उपलब्ध करून घ्यायचा. ही राजकीय ताकद अभ्यासूपणाने सहकारी आमदार नेत्यांवर असणारा अनामिक दबाव या सर्वामुळेच आ. नारायण राणे यांचे विकासाचे बेरजेचे राजकारण नेहमीच यशस्वी होत राहिले.
इंजिनिअरींग, कृषी कॉलेज आणि आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले मेडिकल कॉलेज यामुळे आजवर कोकणातील विद्यार्थी ज्या क्षेत्रांचा कधी विचारही करत नव्हते त्या क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत वावरताना दिसतात. शैक्षणिक क्षेत्रातील या निर्णयाने सर्वच बाजूने आर्थिक सक्षमता कशी निर्माण होते, हे देखील आपण पाहत आलो आहोत. जेव्हा एखाद्या महाविद्यालयामध्ये हजार, दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात. तेव्हा त्या विद्यार्थ्यांंमुळे त्या-त्या भागातील अर्थचक्रालाही आपोआपच गती प्राप्त होते. दूरदृष्टीने निर्णय क्षमता असलेल्या आ. नारायण राणे यांच्या महाराष्ट्रातील द्रष्टेपणाच्या नेतृत्वगुणाने म्हणूनच राज्यभरातून फार मोठय़ा अपेक्षाही व्यक्त होत असतात. १९९० पासून कोकणातील ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते आ. नारायण राणे यांच्याशी जोडले गेलेले आहेत. यातील अनेक कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची पदाची अपेक्षा न करता सतत काम करत राहणे आणि आ. नारायण राणे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांच्या सोबत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पद, सत्ता, पैसा यातल्या कुठल्याही गोष्टींचा दूरान्वयेही संबंध नसणारे असंख्य राणे समर्थक गावोगावी पाहायला मिळतात. कोकणचा विकास हा केवळ ‘दादा’च करू शकतात. ही भावना ग्रामीण भागातील जनतेची आहे. कोणत्याही अडचणीच्या काळात आपलेपणाने आणि कौटुंबीक नात्याने फक्त ‘राणेसाहेब’च मदतीला येऊ शकतात, ही अंतर्मनातील भावना सामान्य जनतेमध्ये आहे. कोकणच्या विकासाचा विचार करून माजी मुख्यमंत्री आ. नारायण राणे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कोकणातील सर्वसामान्य जनता जेव्हा घेते तेव्हा केवळ आ. राणेंमुळे ज्यांची राजकीय कारकीर्द उभी राहीली, विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली अशा सर्वाची जबाबदारीही वाढली आहे. या सर्वानी आ. नारायण राणे यांच्यासारख्या नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायलाच हवे.
दादांकडे, कोकणच् नाही Social Media च्या या जमान्यात आंतरराष्ट्रीय निरीक्षक ही डोळे लावून असतात. ही तर राणे साहेबांच्या कामाच्या अवाक्याची पोच पाववतीच आहे. देशातील जनतेनेही डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. अफवांच्या बाजारापासून स्वतःला दूर ठेवून विवेक राखण्याची प्रचंड आवश्यकता आहे.