विनोदी अभिनयाने सर्वांना हसवणारे अभिनेते परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले.
मुंबई- विनोदी अभिनयाने सर्वांना हसवणारे अभिनेते परेश रावल यांनी लेखिका आणि समाजसेवी कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले. त्यामुळे ते वादाच्या भोव-यात अडकण्याची शक्यता आहे.
काश्मीरमध्ये दगडफेकीपासून वाचण्यासाठी लष्कराने एका आंदोलकाला जीपला बांधून फिरवले होते. ‘त्या जीपला अरूंधती रॉय यांना बांधायला पाहिजे होते,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
काश्मीरमध्ये दगडफेकीपासून वाचण्यासाठी लष्कराने एका आंदोलकाला जीपला बांधले. जमावापासून वाचण्यासाठी त्याने या आंदोलकाचा वापर करून घेतला. लष्कराच्या या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्याच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले होते. गेल्या महिन्यात हे प्रकरण घडले होते.
परेश रावल यांनी महिन्याभरापूर्वीच्या या घटनेवर आता ट्विटरवर भाष्य केले आहे. परेश रावल यांचे हे ट्विट आतापर्यंत २, ६७१ जणांनी रिट्विट केले आहे. तर पाच हजाराहून अधिक जणांनी लाइक केले.
परेश रावल हे अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अरुंधती रॉय या लेखिका असण्याबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही त्यांची ओळख आहे.
Instead of tying stone pelter on the army jeep tie Arundhati Roy !
— Paresh Rawal (@SirPareshRawal)
अरुंधती रॉय याना ४ दिवस काश्मीर मध्ये राहायला सांगा आणि मग मानवाधिकाराच्या गप्पा मारायला सांगा .
खरेच ‘त्या जीपला अरूंधती रॉय यांना बांधायला पाहिजे होते’ .
कारण त्या जास्त जवळच्या आहेत त्या दगडफेक करणाऱ्यानच्या…………