ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापन केल्यानंतर भाजपने त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये येण्याचे आमंत्रण दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
मुंबई- ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन राजकीय पक्षाची स्थापन केल्यानंतर भाजपने त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मध्ये येण्याचे आमंत्रण दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. भाजपच्या या निमंत्रणामुळे राणेंचा राज्याच्या मंत्रिमंडळात परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जाते.
नारायण राणे यांनी रविवारी या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांना एनडीएत सहभागी होण्याचे आमंत्रण भाजपने दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, एनडीएतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला न विचारताच भाजपने राणेंना एनडीएत सहभागी होण्याचे आमंत्रण दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राणेंना एनडीएत सहभागी करण्याच्या निर्णयास शिवसेना विरोध करण्याची शक्यता असल्याचेही बोलले जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी नारायण राणे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. तेव्हा राणेंना पक्षात प्रवेश देण्याऐवजी नवीन पक्ष काढण्याचा सल्ला शहा यांनी दिला होता. नवा पक्ष काढल्यानंतर एनडीएत घेऊ, असे शहा यांनी त्यांना सांगितले होते. त्यानुसार राणेंना एनडीएत येण्याचे आमंत्रण मिळाल्याचे सांगण्यात येते.
[EPSB]
[/EPSB]
BJP यांचा खेळ खल्लास करणार हे निश्चित आहे.