पोलिसांचे पारंपारिक रूपडे बदलणार असून आता अधिक सूटसूटीत आणि सुबक गणेश पोलिसांना मिळणार आहे.
मुंबई- खाकी पॅण्ट आणि खाकीचाच शर्ट अशा आवतारातील पोलिसांचे पारंपारिक रूपडे बदलणार असून आता अधिक सूटसूटीत आणि सुबक गणेश पोलिसांना मिळणार आहे. त्यासाठी अहमदाबादमधील ‘नॅशनल टन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईन’ कंपनी कामाला लागली आहे. आकर्षक, सुटसुटीत आणि सर्व ऋतूमध्ये वापरता येईल, अशा गणवेशाची तयारी सुरू आहे. त्याचे डिझाइन मंजूर झाले की ते पोलिसांसाठी लागू करण्यात येईल.
पोलिसांच्या गणवेशात काही कालावधी नंतर बदल होत आला आहे. इंग्रजांच्या काळात निळा-डगला आणि नीळीच आर्धी पॅण्ट पोलिसांसाठी होती. पुढे त्यात बदल होऊन खाकी शर्ट आणि खाकीच आर्धी पॅण्ट आली. तर पुढे आध्र्या पॅण्टीची पूर्ण पॅण्ट झाली. मात्र त्याचा रंग खाकीच राहिला. आता पुन्हा त्यात बदल करून पोलिसांचा गणवेश अधिक स्मार्ट करण्याचा सरकारचा विचार आहे. आता पोलिसांना सर्व हवामानात आरामदायी ठरणारा गणवेश दिला जाणार आहे. अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेकडे हे काम सोपवण्यात आले आहे. ही संस्था सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशातील पोलिस आणि निमलष्करी दलासाठी नवा गणवेश बनवणार आहे.
ब्युरो ऑफ रिसर्च अँड डिव्हलपमेंटच्या सहकार्याने पोलीस गणवेशाचे ९ नमूने तयार करण्यात आले आहेत. यात शर्ट, पॅण्ट, पट्टा, टोपी आणि जॅकेटचा समावेश आहे. याशिवाय रेनकोट आणि हेडगिअरचे डिझाईनही बनवले आहे. हे डिझाईन सर्व राज्यांच्या पोलिसांना शेअर केले आहेत, जेणेकरुन ते आपल्या पसंतीने गणवेश निवडू शकतात. नऊ राज्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार, सध्याच्या वर्दीमध्ये अनेक अडचणी आहेत. पहिली बाब म्हणजे देशातील पोलिसांच्या वर्दीत समानता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांच्या गणवेशाचे कापड फारच जाड असल्याने उन्हाळ्यात त्रास होता. याशिवाय वर्दीत जास्तीत जास्त गोष्टी ठेवण्याची पयार्यी जागा नाही.
पोलिसांची टोपी लोकराची असल्याने उन्हाळ्यात डोकेदुखीचे कारण ठरते. तर हेल्मेट एवढे जड आहेत की आपत्कालीन परिस्थितीत ते घालणे अडचणीचे ठरते. पट्टाही फार जड असल्याने तो घालून वाकता येत नाही. जगभरातील इतर देशांमधील पोलिसांच्या पट्टय़ात फोन ठेवण्याची जागा आणि स्मार्ट कीज असते, तशीच सोय देशातील पोलिसांच्या गणवेशात असावी.
पोलिसांना चामडय़ाची बुटं जास्त वेळ घालणे सोपे नसते. या खाकी रंग प्रायव्हेट एजन्सी आणि इतर विभागातील लोकही वापरतात. आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर म्हणाल्या की, खाकी वर्दीवर फारच टीका होते. यात बदल होणे आवश्यक आहे. सध्याची वर्दी पोलिसांसाठी सर्व प्रकारच्या हवामानात परिधान करण्यासाठी योग्य नाही. याला पर्याय आणणे गरजेचे आहे, असेही बोरवणकर म्हणाल्या.
[EPSB]
[/EPSB]
If policeman dies on duty his family should be given 1crore Rs .His family should be given a house free of cost from chief minister kota Our cricket players are getting more than crore Rs for playing for India,So policeman,s family should get minimum 1crore.