माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील हजारों कर्मचा-यांच्या नोक-या धोक्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी केंद्र सरकारने मात्र या शक्यतेचा इन्कार केला आहे.
नवी दिल्ली – माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील हजारों कर्मचा-यांच्या नोक-या धोक्यात येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी केंद्र सरकारने मात्र या शक्यतेचा इन्कार केला आहे. आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचा-यांची कपात केली जाणार नाही असे आयटी सचिव अरुणा सुंदरराजन यांनी स्पष्ट केले आहे. तसा विश्वास आयटी उद्योगांतील कंपन्यांनी केंद्र सरकारला दिला आहे असेही त्या म्हणाल्या. ब्रॉडबँड इंडिया फोरमच्या कार्यक्रमात बोलताना सुंदरराजन यांनी ही माहिती दिली आहे.
सध्या आयटी क्षेत्राचा विकासदर ८ ते ९ टक्के इतका आहे. अशा स्थितीत कपातीचा प्रश्नच उद्भवत नाही असेही सुंदराजन म्हणाल्या. कर्मचा-यांच्या कपातीबाबत सरकारने कंपन्याकडे नोक-यांमधील श्रेणीच्या आधारे स्पष्टीकरण मागवले होते. त्यावर दिलेल्या स्पष्टीकरणानुसार मोठ्या प्रमाणात नोकर कपात होणार नसल्याचे सुंदरराजन म्हणाल्या. कंपन्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार ज्या कर्मचा-यांना नोकरीवरून कमी केले गेले ते कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर काम करत होते. अशा कर्मचा-यांचे नियमित वार्षिक मूल्यांकन (अप्रेझल) होत असताना त्यांच्या सेवेचे नुतनीकरण करण्यात आले नाही अशी माहिती सुंदरराजन यांनी दिली.
fake