परभणी – चंद्रकांत पाटलांसारखे कित्येक मंत्री-संत्री आले-गेले, मी ४ मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष केलाय, त्यामुळे मला काहीच फरक पडत नाही, अशी जोरदार टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटलांवर केली. मुंबईला दुधाचा एक थेंबही पुरवठा होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजू शेट्टी रविवारी परभणीत होते.
यावेळी त्यांनी मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पीक विमा आंदोलकांची भेट घेऊन हा विषय दिल्लीत अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगत दूध आंदोलनावरून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका केली.
खा. शेट्टी म्हणाले, चंद्रकांत पाटलांच्या ज्ञानात भर टाकतो. ११ वर्षांपूर्वी जुलै २००७ रोजी माझ्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात दूध बंद आंदोलन झाले होते आणि ते यशस्वी झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख अमेरिकेच्या दौ-यावर होते.
त्यावेळी त्यांनी अमेरिकेतून फोन करून मला आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. आता चंद्रकांत पाटील हे आता आताच राजकारणात आले आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास कच्चा आहे, त्यांच्या सारखे अनेक मंत्री मी पचवले आहे असा टोला राजू शेट्टींनी लगावला.
मुंबई चे दुध बंद करून काय उपयोग? त्या पेक्षा दुध संघाचे दुध बंद का करत नाही ?