न्यायालयाने दिलेला निकाल पायदळी तुडवला जात असून, याविरोधात कामगार नेते शरद राव यांनी ११ नोव्हेंबर रोजी मुंबई बंद करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई- सर्वोच्य न्यायालयाने फेरीवाल्यांना कायदेशीर परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही मुंबईत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेला निकाल पायदळी तुडवला जात असून, याविरोधात कामगार नेते शरद राव यांनी ११ नोव्हेंबर रोजी मुंबई बंद करण्याचा इशारा दिला आहे.
[poll id=”444″]
या आंदोलनात राज्यातील हजारो फेरीवाले मोर्च्याने आझाद मैदानात येणार आहेत. त्यामुळे या दिवशी मुंबईत फेरीवाल्यांकडून कोणत्याही प्रकारची विक्री करण्यात येणार नसल्याची माहिती राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
sharad raola kay kam nai ut sut band band