कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील सुलकेरी गावात बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी तीन दिवसांपासून सुरू असलेली बचाव मोहीम सुरूच आहे.
बागलकोट (कर्नाटक)- कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील सुलकेरी गावात बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी तीन दिवसांपासून सुरू असलेली बचाव मोहीम सुरूच आहे. या मुलाला बाहेर काढण्यासाठी सरकारी यंत्रणातर्फे मोठी मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, या मुलाच्या वडिलांनी ही मोहीम थांबवण्याची मागणी केली आहे.
थिमन्ना हट्टी हा मुलगा बोअरवेलमध्ये अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी दुसरा समांतर खड्डा खणला जात आहे. गेल्या तीन दिवसांत ७० ते ७५ फूट खणण्याचे काम सुरू झाले आहे. या मुलाच्या बाजूला चिखल पसरला असून तो काढण्यासाठी बागलकोट महापालिकेकडून व्हॅक्यूम पंप मागवला आहे.
दरम्यान, या मुलाचे वडील हनुमंत हट्टी यांनी ही बचाव मोहीम थांबवण्याची मागणी केली आहे. या मोहिमेनंतरही माझा मुलगा परत मिळेल याची खात्री नाही. माझी जमीन चांगली राहिल्यास माझ्या दोन मुलींना चांगला शिकवेन, असे त्यांनी सांगितले. हट्टी यांच्या शेतात बचाव कार्यात जवळपास तीन लाख मीटर चिखल झाला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेती झाली नाही तर माझ्यावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिल. हा निर्णय घेताना मला दु:ख होत आहे. मात्र, माझा नाईलाज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बागलकोटचे पालकमंत्री एस. आर. पाटील म्हणाले की, या मुलाच्या वडिलांना मोठे दु:ख आहे. आपल्या मुलाला वाचवू शकणार नाही, निदान शेती वाचवावी अशी त्यांची भावना आहे.
असा कसा हा ” बिनडोक “बाप ???