एखादा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो, एखाद्या ठिकाणाला दोन-तीनहून अधिक वेळा तुम्ही भेट देता.. का? अच्छा लगता है, छान वाटतं, असंच ना? अच्छा लगता है, असं कशामुळे वाटतं? काय असतं ते? त्याकरता माणसं कशी वागतात, हे पाहू या.
आपण जे काही खातो, जे पाहतो, जे वस्त्र परिधान करतो, त्या सर्वातून एक मोजणी सुरू असते. आपल्याला कृतीतून शरीरात, मेंदूत अनेक रासायनिक बदल होत असतात. तुमच्या नकळत जणू मेंदूला ‘आपल्याला कसं वाटत आहे’, याचं मोजमाप करण्याचे आदेश असतात. ज्यामुळे चांगलं वाटतं, ते अधिकाधिक करायचं असा मनाचा कल असतो. अगदी सकाळी उठल्यावर कोणती टुथपेस्ट वापरायची,कोणत्या ब्रँडचा चहा? की कॉफी घ्यायची, अशी निवड आपण आपल्याला कसं वाटतंय त्यातून करत असतो. दिवस पुढं जातो तशी ही यादी वाढत जाते. ज्यानं चांगलं वाटतं ते करायचं, ते स्वीकारायचं आणि ज्यामुळे वाईट वाटतं, दु:ख होतं ते नाकारायचं असा सोपा हिशोब असतो.
वर्गात शिक्षा करणा-या बाई किती जणांना आवडतात? टीका करणारे मित्र किती हवेसे वाटतात? नावं ठेवणारे नातेवाईक घरी यावे, असं किती जणांना वाटतं? अर्थातच, फार कमी जणांना! त्याउलट आपल्याला प्रोत्साहन देणारे, आपलं कौतुक करणारे, स्तुती करणारे सर्व जण आपल्याला हवे असतात. ती खोटी स्तुती आहे, त्यात त्या व्यक्तीचा स्वार्थ आहे, असं जरी माहिती असलं तरी ती स्तुतीची भावना मनाला आनंद देते. म्हणूनच स्पष्ट टीका करणा-या व्यक्तीपेक्षा आपल्याला आपली खोटी स्तुती करणारा एकतरी मित्र हवा असतो, ही वस्तुस्थिती आहे. व्यावहारिकदृष्टय़ा याकडे बघायचे तर कालांतराने माझा जीव घेतला तरी चालेल; पण सध्या कौतुक करतो आहे, तोवर मी या मित्राला,मैत्रिणीला जवळ ठेवेन अशी निवड असते! थोडक्यात, माणसे या ‘फिल गुड’करता जीवाचं रान करतात.
या ‘फिल गुड’चं महत्त्व काय आहे, माहिती आहे? आपल्या मेंदूत जागृत होणारं हे ‘छान वाटतं’चं फििलग आहे. ते आपल्या वागणुकीत अनेक बदल करण्यास समर्थ आहे. त्यामुळे आपल्याला चालना मिळते, अनेक चांगले निर्णय आपण घेऊ शकतो, आत्मविश्वासानं वावरू शकतो,असं शास्रीयदृष्टय़ा सिद्ध झालं आहे. आपल्याला आनंद व्हावा, आपल्याला बरं वाटावं, आपल्या प्रिय व्यक्तीला आनंद व्हावा,असा आपला आग्रह असतो. हा आनंद म्हणजेच सुखी आहोत, असंही काही जणांना वाटतं.
सिनेमात, कथा-कादंब-यांत एकमेकांची वाट बघण्याचे अनेक किस्से असतात. त्यात असलेला रोमान्स बाजूला ठेवला आणि व्यवहार पाहिला तर चित्र त्रासदायक आहे. ‘फिल गुड’करता सुरू असलेली ही एक धडपड असते. एखाद्या मुलीला वा मुलाला भेटण्याकरता शहराच्या एका टोकापासून थेट दुस-या टोकापर्यंत, तेही ठरावीक वेळेस येणं, हीसुद्धा आता साधी गोष्ट राहिली नाही. असे अनेक जण प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांना भेटता येईल, नुसतं पाहायला मिळेल म्हणून जीवाचा आटापिटा करतात. लोकांचं असं वागणं काही फक्त एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीकरता असतं असं नाही. ती व्यक्ती बोलेल, बघून हसेल एवढीही शक्यता नसतानासुद्धा माणसे ताटकळतात, तळमळतात, एखाद्या विशिष्ट स्थळी येतात. एकदा नाही अनेकदा! ते पाहिल्यावर मनात प्रश्न उमटतो की, माणसे का व्यवहारी विचार करत नाहीत? का बरं एवढे कष्ट घ्यायचे? काय मिळतं नुसतं पाहून?
तसं केल्यावर आनंद होतो, उत्साही वाटतं, सगळा दिवस प्रसन्न जातो अशी उत्तरं आपलं मन देत असतं. ती फक्त एक सुरुवात असते. अनेकदा थेट उत्तरं द्यायची टाळाटाळही करतो. अगदी हिंमत करून आपण ती आपली आवड आहे,असं मान्य करतो.
पण अशी उत्तरं आणि अशी एखादी कृती आपण करतो आहोत म्हणजे समजायचं की, ही गोष्ट महत्त्वाची आहे. मी जेव्हा अशी उदाहरणं देते तेव्हा त्यात आर्थिक वा व्यवहारिक फायदा असतो, हे गृहीत नाही. तर ही उदाहरणं अशी आहेत की, ज्यामध्ये कोणताही फायदा नाही. नफा होण्याची शक्यता नाही. तरीही एरवी शहाण्यासारखं वागणारं तुमचं मन वेडेपणा करतं! म्हणजे मन त्यात गुंतलं आहे. ती स्त्री, पुरुष जे काही आहे ते ‘दिल के पास’ प्रकरण आहे. नावीन्य म्हणून एखादी गोष्ट करणं वेगळं. त्यातली उत्सुकता संपलेली असते. त्यानंतर तीच गोष्ट अनेकदा करणं वेगळं. एखादी गोष्ट वारंवार केली जाते म्हणजे ती आवडते!
‘अच्छा लगता है’ ही एखाद्या गोष्टीवर, व्यक्तीवर विशेष स्नेह आहे, याची पहिली पायरी! ती विचार करून, काळजीपूर्वक स्वीकारायची आहे. एखादी गोष्ट केल्यावर चांगलं वाटतं म्हणून किती वेळा करणं योग्य आहे, याचा निर्णय जबाबदारीनं घ्यायचा आहे. हे ‘अच्छा लगता है’चं फििलग बिघडून त्यातून नकारार्थी भावना मनात रूजायला वेळ लागत नाही. नकार पचवून त्यातून स्फूर्ती घेणारे कमी. उलट हीच नराश्याची वा िहसक वाट चालण्याची सुरुवात ठरू शकते म्हणून या स्थितीला, फेजला अधिक महत्त्व. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते. तिला तुम्ही आवडत नाही ही शक्यता असते. तिला तुम्ही आवडत नाही, हे स्पष्ट असतं. अशा वेळी थांबा, हे ‘अच्छा लगता है’चं फििलग मनात ठेवा. त्याबद्दल आभार माना. त्या व्यक्तीला ‘अच्छा लगता है’ असं वाटायला हवं, म्हणून तुम्ही वेगळी वाट निवडा.
हा लेख मस्त जमलाय. वेगळा विचार स्पष्टपणे मांडलाय.