रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मासिक पास काढताना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने दिले होते.
मुंबई – रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मासिक पास काढताना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने दिले होते.
त्यानंतर मासिक पास काढताना प्रतिज्ञापत्रात प्रवाशांकडून देण्यात येणारी माहिती योग्य आहे की नाही, हे तपासण्याची जबाबदारी रेल्वे बोर्डाकडून लोहमार्ग पोलीस किंवा रेल्वे पोलीस (आरपीएफ) यांच्याकडे देण्यात आली आहे. मासिक पास काढताना प्रवाशांकडून खोटी माहिती दिल्यास पास रद्द करण्याचे आदेश रेल्वे बोर्डातर्फे नोव्हेंबर २०१४ रोजी देण्यात आले होते. मात्र चार महिन्यांनंतरही पश्चिम रेल्वेकडून या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे जारी पत्रकात पासधारकांनी पुरवलेले माहितीचे सर्व अधिकार हे आरपीएफ आणि जीआरपीकडे देण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. रेल्वे प्रशासनाकडून पासधारकांची माहिती घेत असताना प्रतिज्ञापत्रात निवासी पत्ता किंवा खोटी कागदपत्रे सादर केल्यास त्याचा पास रद्द करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
तर पुन्हा योग्य माहिती दिल्यास नवीन पासही दिला जाईल. शिवाय प्रवाशांनी यापूर्वीच पास काढताना प्रतिज्ञापत्र दिले असल्यास नूतनीकरणावेळी नव्याने प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नसल्याचे रेल्वे बोर्डाने पत्रकात म्हटले होते. मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा असल्याने रेल्वे प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले होते.
रेल्वे प्रवाशांच्या पुराव्याकरिता रेल्वे बोर्डाने वास्तव्याचा दाखला दाखवून नंतरच त्या प्रवाशास मासिक पास किंवा तिकीट देण्यात यावी हा फतवा काढला होता. माझ्या माहितीनुसार “आधार कार्ड” हा एकमेव पुरावा जरी प्रवाशाने मासिक पास किंवा तिकीटीच्या वेळेस सादर केला तरी त्याच्या हाताच्या किंवा पायांच्या ठश्या पासून त्याच्या राहत्या घराच्या पुराव्या सकट सर्वमाहिती रेल्वे बोर्डास मिळेल. पास काढून पाकीटमार, खिसे कापू किंवा मुंबईत आतंक पसरवण्यास आलेल्या व्यक्ती गर्दीच्या आणि गर्दी नसताना पूर्ण मुंबईची पाहणी करून आपला हेतू “Plan” आखतात. यावर कोणतातरी तोडगा रेल्वे बोर्डाने काढला पाहिजे. जसे चर्चगेट हे मुख्य रेल्वे स्थानक येथील चारी बाजूस जरी सुरक्षा नसली तरी प्रवेश करते वेळी तेथील व्यक्तींना मुख्य द्वार जेथून कोणतीही संशयित व्यक्ती नुकसानदायक वस्तू घेऊन जात असली तर “कंट्रोल रूम”ला त्वरित संपर्क साधता येतो, त्यामुळे मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्थानकाला अशा प्रकारचे द्वार बसवण्यात यावे. मासिक पास खाजगी करणात ज्या प्रकारे मेट्रोकरिता “Access” देऊन “Entry” देण्यात येते त्या प्रकारात देण्यात यावा.