मुंबई विद्यापीठातील विद्यमान सिनेटचा कार्यकाल येत्या ऑगस्टमध्ये संपणार आहे.
मुंबई – मुंबई विद्यापीठातील विद्यमान सिनेटचा कार्यकाल येत्या ऑगस्टमध्ये संपणार आहे. नवीन सिनेटसाठी विविध पक्ष, संघटना, प्राध्यापक संघटना, प्राचार्य आणि व्यवस्थापन सदस्य पदासाठी कोण रिंगणात येईल, याबाबत विद्यापीठात चर्चा सुरू आहे. जानेवारीत या निवडणुकीचा कार्यक्रम ठरवला जाणार आहे.
सध्या असलेल्या १०५हून अधिक सदस्यांना मार्च महिन्यात विद्यापीठाच्या शेवटच्या सिनेटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यानंतर पुढील सिनेट अस्तित्वात येईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, छात्रभारती, युवा सेना, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आदी विद्यार्थी संघटना निवडणुकीसाठी तयारीला लागल्या आहेत.
सिनेटच्या १०५ सदस्यांपैकी दहाहून अधिक सदस्यांचे पद ही रिक्त आहे. काही विधानसभेत आमदार तर काही विविध महाविद्यालय आणि संस्थांच्या कामात व्यस्त असल्याने ते सिनेटच्या अनेक अधिवेशनालाही उपस्थित राहू शकत नाहीत. जे उपस्थित असतात त्यातीलही अनेक मौनी असल्याने विद्यापीठाच्या कोणत्याही चर्चेत सहभागी होत नाहीत. मागील काही सिनेट अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या संदर्भातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर या राजकीय सदस्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने त्याचा फटका येत्या निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा सदस्यांना येत्या सिनेटमध्ये डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीनंतर सिनेट सदस्यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. जसे विद्यापीठाचे संकेत स्थळ आहे परंतु त्यावर सर्व माहिती अर्धी आणि अधुरी आहे. दूरस्थ आणि मुक्त शिक्षण येथून कित्येक विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करीत आहे, तेव्हा त्यांचे “Lectures” त्यांचे “Time Table & Place” याची सुद्धा माहिती संकेत स्थळावर उपलब्ध करून द्यावी. कित्येक विद्यार्थ्यांचे निकालाचे काम, गुण पडताळणीस (Revaluation) होणारा उशीर, त्याचे मूळ कारण तेथील विभाग प्रमुखास विचारून त्याचा तोडगा काढणे. गुणपत्रिका मिळण्यास उशीर होत होता पण त्यांच्या संकेत स्थळावर त्यांनी गुणपत्रिका मिळण्याचे आश्वासन दिले आहे, तेव्हा त्याची “Trial” घेऊन बघितली का ? याबद्दल तेथील विभाग प्रमुखास विचारपूस करत राहणे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निरसन करण्यास एक वेळ देऊन त्या वेळेत त्यांच्या तक्रारी मिटवल्या पाहिजे, विद्यार्थ्यांच्या गरज कुठे अपुऱ्या पडत आहे, त्याची चौकशी प्रत्येक विभागात जाऊन केली पाहिजे, जसे “Transference Certificate”, Migration Certificate” वेळेवर कसे विद्यर्थ्यांकडे पोचले जातील.