देशाच्या एकूण लोकसंख्येनुसार ६० कोटी जनता मोबाईलचा वापर करत असून यातील ७५ टक्के तरुण पिढी दिवसाचे बावीस तास मोबाईलच्या संपर्कात असल्याची धक्कादायक बाब एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
मुंबई- शहरापासून खेडेगावापर्यंत सर्वांच्याच हातात आता मोबाईल फोन दिसत आहे. पूर्वी मोबाईल ही गरजेची वस्तू होती. मात्र, बदलत्या काळानुसार हीच आज प्रत्येक माणसाची हौस नाही तर गरज बनली आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येनुसार ६० कोटी जनता मोबाईलचा वापर करत असून यातील ७५ टक्के तरुण पिढी दिवसाचे बावीस तास मोबाईलच्या संपर्कात असल्याची धक्कादायक बाब एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार एकेकाळी गरज बनलेला मोबाईल आज माणसासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: दोन तासाच्या वर मोबाईल वापर केल्यास कान व मणक्याचे विकार वाढत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
डॉक्टरांच्या मते, मोबाईल, स्मार्ट फोन व टॅबच्या अतिरिक्त वापरामुळे पाठीच्या मणक्याचा त्रास होऊ शकतो. अशावेळी, स्नायूंवर अति भार पडला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळही व्यक्तीवर ओढावू शकते. म्हणूनच टॅब किंवा स्मार्ट फोन वापरताना मान शक्यतो ताठ ठेवावी. कारण मोबाईलवर बोलताना मान ६० डिग्री खाली जाते. त्यामुळे अधूनमधून मान वर-खाली करणे व मागे फिरवणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरून मानेवरील ताण कमी होईल. विशेषत: फोन वापरण्याच्या नादात मान किती खाली जाते याचे भान राहत नाही. म्हणूनच जाणीवपूर्वक डोळ्याच्या रेषेतच मान ठेवावी. मोबाईल धरणे ही सुद्धा एक कला आहे. मात्र, मोबाईल वापरताना योग्य ती काळजी घेतली नाहीतर मोबाईलच्या अतिरिक्त आणि सततच्या वापराने पाठीचा कणा मोडण्याचीही दाट शक्यता असते.
किरणोत्सार किंवा रेडिएशन अणूंनी बाहेर फेकलेली ऊर्जा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. कधीकधी ती अणूचे भाग असलेल्या कणांच्या स्वरूपात बाहेर फेकली जाते. प्रकाश, उष्णता व रेडिओ लहरी ही काही किरणोत्सावाची उदाहरणे आहेत. परंतु, अशाप्रकारचा किरणोत्सार मानवाच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा आघात करत नाही. किरणोत्साराचे ‘आयोनायझिंग’ आणि ‘नॉन-आयोनायझिंग’ असे दोन प्रकार आहेत. आयोनायझिंग किरणोत्साराचा मारा मानवी पेशींवर मोठय़ा प्रमाणात झाल्यास शरीरातील पेशी मरतात. मोबाईलमधून आयोनायझिंगचा किरणोत्सार होत असतो. सध्या मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात वाढल्याने २४ तासांपैकी १२ तास व्यक्ती सतत मोबाईलच्या संपर्कात येते. या कालावधीत व्यक्तीने एक तास मोबाईलवर संभाषण केल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही. मात्र, दोन किंवा तीन तासांच्या वर सतत मोबाईलवर बोलत राहिल्यास त्यातून निघणा-या किरणोत्सारामुळे कानाच्या पेशी मरतात. त्यामुळे, बहिरेपणासारखा आजार बळावतो. डोकेदुखी, चक्कर येणे, कामात मन न लागणे, मळमळ वाटणे अशा मोबाईलमधून निघणा-या किरणोत्सारांचा परिणाम होतो, असे मत कान-नाक-घसा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
पण लक्षांत कोण घेतो ??????