पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताबरोबर व्दिपक्षीय चर्चा सुरु ठेवणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले.
इस्लामाबाद – भारत-पाकिस्तान सीमेवर असणा-या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताबरोबर व्दिपक्षीय चर्चा सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी पहाटे भारतीय हद्दीत घुसून, गस्तीवर असणा-या भारतीय जवांनावर गोळीबार केला होता. यात पाच भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर भारतात पाकिस्तान विरुध्द संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी परराष्ट्र मंत्रालयातील पाकिस्तानी अधिका-यांची तातडीची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी सीमेवर घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. सीमारेषेवर शस्त्रसंधीसाठी दोन्ही देशांनी प्रभावी पावले उचलली पाहिजेत असे शरीफ यांनी म्हटले आहे. भारतीय जवानांवर झालेल्या या हल्ल्यानंतर विरोधपक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले होते. भारतात अनेक ठिकाणी पाकिस्तान विरुध्द निदर्शने झाली होती.
या घटनेनंतर भारताने पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारची चर्चा करु नये, यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विरोधीपक्षांचा दबाव आहे. पुढील महिन्यात अमेरिकेत होणा-या संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ भेटणार आहेत.
Hi, I am currently working on a research paper on Prahar. I would like to get some basic information About Prahar. It would be great if you could mail me that.