देशातील जनतेमध्ये आपल्या पक्षाविरोधात मोठया प्रमाणात नाराजी होती आणि जनतेची ही नाराजी ओळखण्यामध्ये आपण कमी पडलो, अशी कबुली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी दिली.
नवी दिल्ली- देशातील जनतेमध्ये आपल्या पक्षाविरोधात मोठया प्रमाणात नाराजी होती आणि जनतेची ही नाराजी ओळखण्यामध्ये आपण कमी पडलो, अशी कबुली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी दिली. काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची शनिवारी फेरनिवड झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. काँग्रेस पक्षाच्या या अभूतपूर्व पराभवातून आपण सर्वानीच वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी स्वीकारून योग्य तो धडा घेतलाच पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
१९९८ पासून सलग पाचव्यांदा सोनिया गांधी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. पक्षाला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. सार्वजनिक टीका करण्यापेक्षा कार्यकर्त्यांना असलेली माहिती, त्यांचा अनुभव आणि पक्षाच्या सामर्थ्यांचे मूल्यमापन या बाबींचा उपयोग पक्षाच्या पुनर्उभारणीमध्ये होणार आहे, असे त्या म्हणाल्या. या वेळी संसदीय पक्षाने एक ठराव संमत केला. सर्व प्रगतिशील व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून काम करावे, असे आवाहन या ठरावात करण्यात आले. त्याच प्रकारे सर्व समविचारी पक्षांना काँग्रेस सहकार्य करेल, असे आश्वासन या ठरावात देण्यात आले.
हि तर चोरांची आळंदी ,,!!!
जनतेची नाडी जास्त आवळून धरल्या मुळे पराभव पदरांतपडला कोन्ग्रेस वसिओ !!!!
घोटाळे कार्नाय्पलीकडे काय केलेय….!!!