पाकिस्तानातील पेशावर येथील सैनिकी शाळेवर मंगळवारी तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई – पाकिस्तानातील पेशावर येथील सैनिकी शाळेवर मंगळवारी तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, प्रमुख शैक्षणिक संस्था व महत्त्वाच्या इमारतींच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हल्ल्यानंतर शहरात सर्व पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, सुरक्षेत वाढ करण्याच्या उद्देशाने योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश सर्व पोलिसांना देण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली. पाकिस्तानातील हल्ल्यानंतर मुंबई विद्यापीठ, महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था, महाविद्यालये व महत्त्वाच्या इमारतींच्या सुरक्षेतही वाढ करण्याबाबत विशेष रणनीती आखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रतिबंधात्मक कोरवाई म्हणून स्थानिक पोलिसांना सूचना करण्यात आल्या असून संवेदनशील ठिकोणांवरही विशेष लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अफ वांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकोंचीही विशेष तपासणी सुरू करण्यात आली. तसेच रेल्वे स्थानकोंवर सतर्क राहण्यासाठी प्रवाशांना आवाहन क रण्यात येत होते. पाकिस्तानमधील हल्ल्यानंतर मुंबईत पडसाद उमटू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आली आहे.
हॉटेल्ससह इतर निवासी ठिकाणांवरही पोलिसांनी लक्ष दिले असून, त्यांची विशेष तपासणी सुरू करण्यात आली आहे. समुद्र किना-यावरील सुरक्षेबाबतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, तटरक्षक दल व इतर सुरक्षा यंत्रणांनी सागरी गस्तीत वाढ केली आहे.
मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवण्याकरिता आधी जे कानाकोपऱ्यात तडीपार लोक लपून बसले आहेत त्यांना जेलबंद केले पाहिजे. त्यामुळे मुंबई पोलिसांची वाट मोकळी होईल. बाहेरून आलेली व्यक्ती का आणि कोणत्या कारणास्तव आली याची शहानिशा करावी. ती व्यक्ती संशयित आढळल्यास ताबडतोब त्या व्यक्तीवर कारवाई करावी. तडीपार लोक राहण्याचे अड्डे म्हणजे झोपडपट्टी, चाळ आणि अशी ठिकाणे जेथे कधीच कोणाला संशय येणार नाही असे विभाग. तरीही सर्च वौरंट काढून पोलिसांनी तेथे चौकशी करावी, जसे मंदिर, मंत्र्यांचे बंगले या ठिकाणी सुद्धा ते आतंकवादी दराडा घालून बसलेले असतात.