Friday, May 3, 2024
Google search engine
Homeकोलाजभन्नाट

भन्नाट

नामदेव ढसाळ कवी होते.. लेखक होते..विचारवंत होते..बरेच काही होते. पण मला मात्र ते प्रख्यात चित्रकार पाब्लो पिकासोसारखे वाटले. बिनधास्त भन्नाटपणे ते जगले. कुणाची तमा त्यांनी बाळगली नाही. मनसोक्त जगले. असं जगणं फार क्वचित कुणाच्या वाटयाला येतं. या महान माणसाच्या जगण्याशी मी थोडा फार का होईना साक्षीदार होतो.

१९९०चं साल असावं ते.. माझा जवळचा मित्र अनिकेतचा फोन आला. म्हणाला, ‘उद्या दुपारी दोन वाजता भेट. एक काम आहे.’ मी म्हटलं, ‘ठीक आहे.’ त्या वेळी फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करत होतो. मी दुस-या दिवशी अनिकेतला भेटायला दादरला शारदा टॉकीजशेजारी साळगावकरांच्या प्रेसजवळ गेलो. अनिकेत म्हणाला, ‘‘मी साळगावकराचं ‘सत्यता’ साप्ताहिक पाहायचो, ते आता नामदेव ढसाळांनी घेतलंय. सुरुवातीचे तीन-चार अंक आपल्याला त्यांना मदत करायचीय. तू तयार राहा’’ मी ‘हो’ म्हटलं. मी ढसाळाचं फक्त नाव ऐकलं होतं. भेट झाली नव्हती. दुस-या दिवशी सकाळी त्यांच्या सातरस्त्यावरच्या घरी भेटण्याचं ठरलं.

मी लोअर परळला राहत होतो. मला ढसाळांचं घर एकदम जवळ होतं. मी पत्ता विचारत त्यांच्या घराजवळ पोहोचलो. दाराबाहेरच दहा-बारा जण उभे. आत पंधरा-वीस जण. मी आत डोकावतो आणि मला धक्का बसतो. ढसाळ आत एका टेबलावर उघडेबंब बसलेले. रांगडया भाषेत ते आतल्या लोकांशी बोलत होते. त्यांची भाषा ऐकून नवल वाटलं. या भाषेची मला सवय नव्हती. एक प्रकारची बेफिकिरी त्यांच्या भाषेत दिसत होती. एव्हाना अनिकेत आला होता. आमची ओळखपाळख झाली. अनिकेतचं नि त्यांचं ‘सत्यता’मधील विषयासंदर्भात बोलणं झालं. उद्या संध्याकाळी त्यांचा मजकूर तयार होणार होता. मी म्हटलं, ‘मी जॉब करतो. संध्याकाळी जमणार नाही. परवा सकाळी येतो.’ ढसाळ म्हणाले, ‘‘नको, उद्या अंक छापून तयार हवा. तू आज रात्री ये. तुझं काम झाल्यावर. तुला कुठे उचलायचं ते या सलीमला सांग.’’ सलीम त्यांचा ड्रायव्हर. ढसाळांच्या कायम जवळचा माणूस. चोवीस तास त्यांच्यासोबत त्या वेळी असायचा. तो रात्री ऑफिसखाली बारा वाजता आला. मी निघालो. अध्र्या तासात आम्ही सातरस्त्याला ढसाळांच्या घरी आलो. बाहेरच्या खोलीत मी बसलो. सलीम आत गेला आणि ढसाळांना घेऊन आला. पुन्हा तेच. उघडेबंब. नुसती एक पांढरी लुंगी. त्यांनी एका बॉक्समधून ‘सत्यता’चा सगळा मजकूर बाहेर काढला. त्या वेळी कॉम्प्युटरवर पानं लावली जात नसत. मजकुराच्या ब्रोमाइड पिट्रस् मिळत. त्या कापून कागदावर चिकटवून पानं तयार केली जात. वर्तमानपत्राचं काम केल्यामुळे माझी कात्रीवर कमांड होती. माझी कापाकापी पाहून ढसाळ दचकायचे. मध्येच म्हणायचे, ‘अरेरे मजकूर फुकट गेला वाटतं.’ पण तसं होतं नव्हतं. मग त्यांनाही माझा अंदाज आला नि मलाही त्यांचा. रात्रभर मी माझ्या एका मित्राला सोबतीला घेऊन दोन-अडीच तासांत त्यांचं साप्ताहिकाचं काम पूर्ण करायचो. बाहेर सगळी शांतता. अधेमधे एखाद्या कुत्र्याचा काय तो आवाज. बाहेर पूर्ण काळोख.

आतासारखे रोडवर दिवेसुद्धा नीट नव्हते. ढसाळांची गल्ली म्हणजे पूर्ण सामसूम. मी मात्र त्यांच्या घरात दोन टेबल-लॅम्पच्या उजेडात काम करत असे. मला विषय सांगून ढसाळ आत जाऊन झोपायचे. मी मग काम पूर्ण झाल्यावर त्यांना उठवायचो. बाहेर येत ते म्हणायचे. ‘खपलं सगळं? सगळा मजकूर वापरला ना?’ मग ती सगळी पानं ते एका बॉक्समध्ये ठेवायचे. ढसाळ कपडे करायचे. दाराबाहेरच त्यांची टोयोटा कार. आम्ही कारमध्ये बसायचो. मग वरळीच्या नाक्यावरच्या कॅफे सिटी हॉटेलात जायचो. हे हॉटेल पहाटे तीन-चार वाजता उघडायचं. ढसाळांना इथले शीगकबाब फार आवडायचे. गरमागरम कबाब ते खायचे. मी शाकाहारी असल्यामुळे पानीकम चायवर भागवायचो. ‘पानीकम’ हा शब्द मला त्या वेळी पहिल्यांदा कळला. बाहेर एखाद्-दुसरी गाडी जाताना दिसे. सर्वत्र फक्त पिवळे दिवे तेवढे उठून दिसत. एखाद्या जुन्या फोटोतली मुंबई वाटायची ती.ढसाळांची केमिस्ट्री जुळल्यावर मग मात्र मजा यायला लागली. त्यांच्या बेधडक शब्दांपाठोपाठ हातातली कात्री मजकुरावरून सपासप चालायची. त्यांच्या शब्दांसारखीच धार माझ्या कामाला होती. त्यांच्या टेबलावरचा तो मंद प्रकाश. फक्त खाली कागदावर पसरलेला ‘सत्यता’चा मजकूर. वेगवेगळी हेडिंग्ज कापून ठेवलेली. अन् त्या उजेडाबाहेर भयाण शांतता. कात्री टेबलावर ठेवतानाचा नि कागद कापतानाचा तो विशिष्ट आवाज आजही डोक्यात तसाच घुमतोय. एकदा असाच मी काम करत बसलो होतो. सगळी सामसूम.. ढसाळ आत झोपलेले. मी माझ्या कामात. अन् त्याच वेळी बाहेर दोन-तीन गाडया थांबल्याचा आवाज आला. कागदावर लक्ष असल्यानं वाटलं, तो भासच असावा. मग दरवाजा वाजल्याचाही किंचितसा आवाज आला, तरीही मी माझ्या कामात. अन् मग एक जाडसर, काळसर माणूस माझ्याशेजारी उभा राहिला. मला नवल वाटलं, न विचारता हा माणूस आत आलाच कसा? तोसुद्धा रात्री दोन वाजता. ढसाळांना भेटायला कोण किती वाजता येईल याचा नेम नव्हता. ढसाळांकडे भन्नाट माणसं यायची. कधी दिवसा त्यांना भेटायला गेलो की दर्शन व्हायचं. कोणी उग्र वाटायचं, कोणी गंभीर, कोणी सणकी, एकाच्या तर टोकेरी, लांबलचक मिशा पाहून त्याचं स्केच काढायचा फार मोह झाला. मन्या ओक नावाचा ढसाळांचा मित्र कधी कधी दाराबाहेर झोळी घेऊन उभा असायचा. एकदम पांढराशुभ्र म्हातारा. त्याचे हिरवेनिळे डोळे तेवढे हलत राहायचे. नंतर कळलं, हा मोठा कवी होता. बंडखोर कवी. मला मात्र त्याचे हिरवेनिळे डोळेच खूप बंडखोर वाटले.

सहा डिसेंबरला ढसाळ बाबासाहेब आंबेडकरांवर एक मोठी कविता करत. मग तिचं पोस्टर करून मुंबईभर लावत. त्या वेळी या कवितेची कॅलिग्राफी मी करायचो. जबरदस्त कविता असायची. ‘सत्यता’चं काम नेहमीच आम्ही रात्रीचे बारा-एक नंतर करत होतो. सगळं जग झोपलंय नि मी कापतोय कात्रीने कागद. हे काम करताना कधीकधी भडकाभडकी व्हायची. ढसाळांशी दोस्ती झाल्याने, मी त्यांच्यावर कधी कधी उशीर झाला की वैतागायचो. अर्थात हे सगळं प्रेमाखातर होतं. एकदा त्यांचा मजकूर वेळेवर आला नाही. त्यामुळे मला फ्री प्रेसमध्ये जाता आलं नाही. मी भडकलो त्यांच्यावर. म्हटलं, ‘तुमच्यामुळे मला दांडी मारावी लागली. कारण फार क्वचित, वर्षातून एखादी मी सुट्टी घ्यायचो. त्यामुळे त्या दिवशी ऑफिसला दांडी झाली. वैतागून, धुसफुसत मी रात्री त्यांचं काम आटोपलं. ढसाळ म्हणाले, ‘चल, बस गाडीत.’ बसलो. आमचा नेहमीचा रस्ता नव्हता. मी जरा चक्रावलो. म्हटलं, ‘आपण चाललोय तरी कुठे?’ ढसाळ म्हणाले, ‘तुझी सुट्टी वाया जाणार नाही.’ त्या रात्री त्यांनी कुठे कुठे गाडी नेली हे देवालासुद्धा सांगता येणार नाही. फिरतोय आम्ही रात्रभर. ही रात्र काही औरच होती. ढसाळांशी बोलताना ‘जयभीम’ हा शब्द वारंवार यायचा. मी त्यांना कधी फोन केला की, ते पलीकडून म्हणायचे ‘जय भीम प्रदीप..’ मग मी त्यांना डिवचण्यासाठी गमतीने मुद्दाम म्हणायचो ‘जय महाराष्ट्र’! मग पलीकडून त्यांचा भारदस्त दणदणीत आवाज यायचा ‘जय भारत’! मग माझा आवाज बंद झालेला असायचा. एकदा माझ्या बॅगेमुळे ढसाळांच्या सातरस्ता ऑफिसात गोंधळ उडाला होता. एकदा दुपारी मी त्यांना तिथे भेटायला गेलो होतो.?बरीच माणसं जमली होती.?ढसाळ म्हणाले, तू जरा दहा मिनिटं थांब. मी जरा या लोकांचं आटपून घेतो. मी म्हटलं ठीक आहे, मग दहा मिनिटांत मी जरा बाहेर जाऊन येतो. मी बॅग तिथंच त्यांच्या टेबलासमोर ठेवून बाहेर पडतो. ढसाळांना त्या वेळी तिथं भेटायला एक इन्स्पेक्टर आला होता. त्याने सहज चौकशी केली ही बॅग कोणाची आहे. सगळ्यांनी नाही सांगितलं आणि मी त्या वेळी तिथे नव्हतो. त्यामुळे त्यांना बॅगेचा संशय आला. तिकडे एकदम घबराट पसरली. बरेच जण घाबरून उठून बाहेर गेले. पण ढसाळ काही हलले नाहीत. म्हणाले, ‘मी उठणार नाही, काय व्हायचे ते होऊ देत.’ त्याचवेळी मी तिथे पोहोचलो. इन्स्पेक्टरला म्हटलं माफ करा बॅग माझी आहे. मग कुठे तिकडे वातावरण शांत झालं.?पण तो इन्स्पेक्टर मात्र वारंवार माझ्याकडे पाहत होता आणि मी ढसाळांकडे.?मला नवल वाटलं, ढसाळ हा काय माणूस आहे. जरा पण डगमगला नाही. त्यानंतर मात्र माझ्या बॅगेची भीती मलाच वाटू लागली.

रमझानचे दिवस होते. त्या रात्री ढसाळांबरोबर मी भेंडीबाजारातून कुठेतरी चाललो होतो. कुठे ते आठवत नाही. आठवतं ते इतकंच की, बाहेर सगळा दिव्यांचा लखलखाट होता. रमझानमुळे बाहेर रोडवर तुफान गर्दी होती. ढसाळांची गाडी हळूहळू पुढे सरकत होती. नुसती जत्रा भरली होती बाहेर. पदार्थाचे स्टॉल खचाखच भरले होते. रोडवर चालायला जागा नव्हती. तिथे आमची गाडी काय सरकणार. ढसाळ हळूहळू गर्दीतून कशीबशी वाट काढत होते. बाहेर भिका-यांचीही गर्दी होती. इतक्यात एक हात काचेवर आला. सोळा वर्षाची एक मुलगी पैशांसाठी हात पुढे करत होती. इतकी सुंदर मुलगी भीक मागताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. ढसाळांशेजारी त्याचा एक मित्र बसला होता. त्याला अचानक काय झालं कुणास ठाऊक! तो गाडीची काच खाली करत, त्या पोरीला म्हणाला, ‘‘अगं ए, भीक काय मागतेस. आत ये चल, फिरायला जाऊया!’’ तिचा चेहरा हा असा मोठा झाला. झालं. माझी खात्री झाली. संपलो आपण. आता ही बोंबबोंब करणार नि आपली धुलाई होणार. मी ढसाळांना म्हटलंही, ‘आपण मेलो. आता पळवा गाडी नाहीतर अवतार आटोपलाच.’’ हजारो लोक तिथं होते. पोरीनं तोंड उघडायचा अवकाश, बस्स! आमची खांडोळी झालीच! ढसाळ जराही डगमगले नाहीत. म्हणाले, ‘‘च्यायला! आपल्यावर हात टाकणारा जन्माला यायचाय.’ आता त्यांनी गाडीचा वेगही वाढवला होता. गर्दीतून त्यांनी सपासप गाडी पुढे नेली. तिथून बाहेर पडल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘‘सुटलो बुवा.’’ ती लखलखती रात्र जणू माझ्यावर वीजच ओकणार होती.

एव्हाना ढसाळांबरोबरच रात्रीचं फिरणं वाढलं होतं. त्यांचं जगणं एकदम रॉयल होतं. बोलणं, चालणं, वागणं सगळं काही बिनधास्त. एकदा त्यांना काय वाटलं, कुणास ठाऊक! म्हणाले, ‘चला, जाऊन आइस्क्रीम खाऊया. ड्रायव्हर सलीमला सगळी ठिकाणं माहीत होती. रात्री आम्ही बसलो टोयोटात. बहुतेक पेडर रोड असावा. एक मोठं आइस्क्रीम पार्लर होतं. ढसाळांकडे त्या वेळी एक कुत्रा आणि एक कुत्री होती. त्यांची नावेही मजेशीर होती. ठमी आणि ठोम्ब्या! तर त्या वेळी आमच्यासोबत ठमी होती. पांढरीशुभ्र केसाळ ठमी. नेहमी पायाशी घुटमळत राहायची. एका मोठया आइस्क्रीम पार्लरसमोर राजे उतरले. पाठोपाठ ती ठमी.. मग आम्ही आत शिरलो. ढसाळांनी मोठयाने हाक मारून वेटरला बोलावलं. म्हणाले, ‘‘क्या है तेरे पास?’’ तो जरा गोंधळला. त्याने मेन्यूकार्ड पुढे सारले. ढसाळांनी ते बाजूला सारले. म्हणाले, ‘‘क्या है?’’ आता तिथले लोकही आमच्याकडे बघायला लागले. मग ढसाळांनी स्ट्रॉबेरी आइस्क्रीम मागवलं. तो पोरगा प्लेटमधून घेऊन आला. आमच्या टेबलावर ठेवून जात होता. ढसाळांनी त्याला थांबवलं. म्हणाले, ‘ये प्लेट नीचे उधर रखो.’ पोरगा गोंधळला अन् मीही. त्याला काही कळेना. ढसाळ पुन्हा गरजले- ‘‘बोला ना, जमीनपर उधर ये प्लेट रखो.’’ त्याने ठेवली ती तिथे. मग ढसाळांनी ठमीला हाक मारली. म्हणाले, ‘‘खा आइस्क्रीम खा..’’ ठमी धावतच प्लेटकडे गेली. हॉटेलातले सगळे चक्रावून हे दृश्य पाहत होते. ठमीनं जरा चाटल्यासारखा केलं नि परत आली. ढसाळ म्हणाले, ‘बिल लाव.’ तिथले सगळे हायफाय लोक.. त्या दिवशी त्यांचे चेहरे मला कुत्र्यासारखे वाटले. सगळ्यांचे डोळे आइस्क्रीमसारखे थंडगार पडले होते.

‘सत्यता’चं काम करतानाच्या त्या रात्री काही वेगळ्याच होत्या. भन्नाट होत्या. एकएक आयटम लोक ढसाळांना भेटायला यायचे. अजब अजब लोक असायचे. ढसाळांशी जवळीक साधायला त्यांच्यात चढाओढ लागायची. एकदा तर माझ्या बाजूला गायक आनंद शिंदे आणि त्याचा भाऊ बसला होता. हा आनंद शिंदे म्हणजे नंतर ते त्याचं गाणं- ‘जवा नवीन पोपट हा लागला विठू विठू बोलायला’ हे गाणं गाणारा. या गाण्याने विक्रम केला. तो एकदा माझ्या बाजूला बसला होता. मी त्याला ओळखलं नाही. ढसाळांनी त्याला एक गाणं गायला सांगितलं. तेव्हा त्याने आंबेडकरांवरचं एक गाणं गाऊन अंगावर काटा आणला. त्याचा काळीज पिळवटणारा आवाज आजही माझ्या कानांत घुमतोय. एके रात्री मी त्यांचं काम करत होतो तेव्हा त्यांना म्हटलं, ‘‘आज जाम भूक लागलीय. पण आता वाजलेत मध्यरात्रीचे दोन. कुठे मिळणार खायला? बाहेर सगळं बंद.’’ ढसाळ म्हणाले, ‘‘चल, बस गाडीत.’’ आम्ही बसलो. बाहेर सगळा शुकशुकाट. ब-याच वेळानं टोयोटा एका गल्लीत घुसली. अन् मी गांगरलो. आत गल्लीत चक्क दिवाळी होती-दिवाळी! दिव्यांचा लखलखाट, पावभाजीसारख्या दोनचार गाडया लागलेल्या. गि-हाइकांची गर्दी. सगळे खाण्यात मग्न. मला नवल वाटलं! साला बाहेर रोडवर सगळा अंधार. अन् ही कुठली नवी गल्ली. जिथं सगळे चरतायत. ढसाळांना बघून तिथला गाडीवरचा एक शेठ पोरगा चटकन धावत पुढे आला. ढसाळांना नमस्कार केला. फटाफट त्याने ऑर्डर दिली. बसायचा एक मस्तपैकी बाकडा तिथे अचानक आला. आम्ही आरामात बसलो. ढसाळ मला म्हणाले, ‘‘बोल, तू काय खाणार?’’ पण इथे तर सगळे मांसाहारी पदार्थ दिसत होते. मी पडलो शाकाहारी. मी चाचरत ढसाळांना म्हटलं, ‘‘मी हे खात नाही. मी शाकाहारी आहे.’’ ढसाळ म्हणाले, ‘‘आता काय करायचं?’’ त्याने त्या शेठ पोराला सांगितलं, ‘हा तर शाकाहारी आहे. काय करायचं?’ तो शेठ पोरगा म्हणाला, ‘ठीक आहे. बाहेरून मागवतो.’ मी मनात म्हटलं, आम्ही बाहेरून तर आलो. सगळं बंद. काळोख आहे. काय कप्पाळ मिळणार बाहेर! त्या पोरानं एका पोराला ऑर्डर दिली. ‘एक व्हेज आयटम लेके आव! किसीभी हालतमें खाली हाथ नही आना. उनको बोलो. मैने बोला है.’ अन् पंधरा मिनिटांत गरमागरम व्हेज पदार्थ माझ्या पुढयात तयार. मी उडालो ना! याला कुठे मिळालं हे? त्या लखलखत्या खाऊ गल्लीत पुन्हा जाण्याचा मोह ब-याचदा झाला. पण नंतर कधीच तशी ‘व्हेज रात्र’ आली नाही.

१९९२ दंगलीनंतरचा आठवडा. सगळी मुंबई वेदनेने कळवळत होती. छिन्नविच्छिन्न झाली होती. भयग्रस्त झाली होती. दिवसा कुजबुज, अफवा नि रात्री भयकंप. सगळंच अंगावर काटा आणणारं होतं. या दंगलीच्या चार दिवसांनी मी पुन्हा फ्री प्रेसला जायला लागलो. रात्रीची शेवटची ट्रेन पकडून परतताना जाम टरकायचो. चर्चगेटला रात्री शेवटच्या लोकलमध्ये बसायचो. डब्यात चिटपाखरू सुद्धा नसायचं. घाबरतच मी ऑफिसातून निघायचो. एखादा सहकारी बरोबर असायचा. स्टेशन आलं की आम्ही घाबरून बाहेर बघायचो. हल्लाबिल्ला करायला कुणी घुसलाच तर.. तर दंगलीच्या चौथ्या दिवशी मी लोअर परेल स्टेशनवर रात्री दीड वाजता उतरलो. दंगलीमुळे रस्त्यावरचे दिवेसुद्धा भेदरलेले. बंद पडलेले. रस्त्यावरचा काळोख उगाचच जास्तच गडद वाटायचा. कधी एकदा घरात पोहोचतो असं झालं होतं. त्या दिवशी रात्री सव्वा वाजता सनमिल गल्लीतून घाबरत पुढे पुढे सरकत होतो. उगाचच वाटायचं की, एखाद्या गल्लीतून कुणीतर भसकन येऊन सुरा भोसकायचा. माझ्याच नेहमीच्या गल्लीला मी घाबरलो होतो. थरथरत मी पुढे पुढे सरकत होतो. लोकांनी आपल्या खिडक्याही बंद करून घेतलेल्या होत्या. एकदा का ही सनमिल लेन पार केली की सुटलो. अखेर या गल्लीच्या टोकाला आलो. समोर मुख्य रस्ता होता. म्हटलं, सुटलो! गल्लीत काही लफडं झालं नाही अन्.. अन्.. अचानक माझ्यासमोर एक टॅक्सी गच्कन थांबली. मी दचकून समोर पाहिले. अन् आतले एकदम ओरडले.. ‘हा बघा. हा बघा.. सापडला!’ मी भेदरलो. लटपटलो. अन् पटकन मागे वळलो. धावत सुटलो. पुन्हा त्या गल्लीत पळलो. टॅक्सीतले बाहेर पडून माझ्या मागे धावत सुटले. मी आता पूर्ण घाबरून जीवानिशी वेगाने पुढे पुन्हा स्टेशनकडे पळतोय, धावतोय. माझ्या मागचे आरडाओरड करत धावतायत. त्या भयाण गल्लीत मी पुढे, माझ्या मागे ते. अचानक त्यातला एक जण ओरडला.. ‘‘साहेब.. थांबा.. थांबा..’ मला नवल वाटलं. साहेब? ही काय भानगड? मी थोडे मागे वळून पहिलं. त्यातला एक जण पुढे आला. ‘साहेब, थांबा. आम्ही ढसाळ साहेबांकडून आलोय. तुम्हाला त्यांच्याकडे न्यायला आलोय.’’ मग मागून घामाने काळानिळा पडलेला ढसाळांचा ड्रायव्हर सलीम पुढे आला, म्हणाला ‘‘काय साहेब, आम्हाला. वळखलं नाय?’’ मी अवाक् झालो. आयला मी उगाचच पळत होतो! आता मी सलीमवर वैतागलो. ‘‘ही कुठली तुमची पद्धत? हा बघा.. हा बघा.. म्हणायची? मी घाबरलो ना! सध्याचे दिवस दंगलीचे. तुला कळत नाही.’’ सलीम म्हणाला, ‘‘साहेब, आम्ही तुमच्या ऑफिसात गेलो होतो. पण तुम्ही नुकतेच गेला होता. म्हटलं, रस्त्यात तुम्हाला शोधून ढसाळांकडे घेऊन जाऊ. दादांना अंक आज रात्रीच संपवायचा आहे. तुम्हाला न घेता गेलो तर ते आमच्यावर खवळायचे.’’ मी पुन्हा सलीमवर वैतागलो. ‘‘आयला! तुम्ही मलाच आज संपवणारच होता. नशीब माझं. चला, बसू या टॅक्सीत.’’ आम्ही सगळे घामाने चिंब झालेले. टॅक्सीत बसलो. निघालो सातरस्त्याला, ढसाळाचं काम करायला. त्या अख्ख्या रात्री माझ्या हृदयाचे ठोके दोनशे फुटांवर असलेल्यांना ऐकू आले असते. ती काळोखी सनमिल लेन.. आणि मी धावतोय.. हे दृश्य मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. ढसाळांचा सलीम त्यामुळे कायमचा माझ्या लक्षात राहिला. असा तो ढसाळांचा रात्रीचा कारभार होता. रात्र धमाल होती. रात्र कमाल होती. रात्र थरकाप उडवणारी होती. रात्र दिवाळी होती. ढसाळांचा संपर्क मग तुटला. माझं ऑफिससुद्धा बदललं होतं. त्यांनीही ‘सत्यता’चे अंक कमी केले होते. अधनंमधनं छापत. मधल्या काळात एखाद्या पोस्टरसाठी किंवा जाहिरातीसाठी ते आवर्जून मला फोन करत.  मधला काळ विरळ भेटीगाठींत गेला आणि तारीख आली २६ डिसेंबर २०१३.!

सकाळी ८.२० ला मी बॉम्बे हॉस्पिटलात पोहोचतो. रूम नं. ९०९..! या रूमचा दरवाजा उघडाच आहे. मी आत डोकावतो. रूमच्या मध्यभागी एक रिकामा भलामोठा बेड. त्याला लागूनच सलाइनचा स्टॅण्ड. समोरच दोन खिडक्या. अन् डावीकडे एका सोप्यावर ढसाळांच्या पत्नी मल्लिका मॅडम बसल्यात. मी आत शिरतो. म्हणतो नमस्कार.. मॅडम मोबाइलवर एकाशी बोलतात. त्यांचा नातेवाईक सुरेश देठे खाली ढसाळांकडे असतो. त्या त्याला म्हणतात, नामदेवला सांग प्रदीप आलाय.. प्रदीप म्हापसेकर.. तू बाहेर ये नि त्याला आत घेऊन जा. दरम्यान, मी कविता पाहत बसतो. दोन-चार मिनिटांत खालून फोन येतो. मॅडम म्हणतात जा खाली. सुरेश बाहेर आलाय. नवव्या मजल्यावरून खाली तिस-या मजल्यावर येतो. तिथे सुरेश देठे तोंडाला मास्क लावून उभे असतात. दरवाजाबाहेर मला बूट काढायला सांगतात. मग मी आत अतिदक्षता विभागात शिरतो. लांबलचक तो पॅसेज. दोन्ही बाजूला छोटया छोटया रूम्स.. आणि त्यात रूममधल्या बेडवर अस्ताव्यस्त पडलेली माणसे. मध्ये मध्ये कुणी नवं वर्षाचे ख्रिसमसचे केलेले डेकोरेशन लक्ष वेधून घेत. लुकलुक करणारे तारे.. दिव्यांच्या चमकणा-या माळा.. मध्येच सुरेश थांबतात. तिथल्या एका लाकडी कप्प्यातून ते माझ्यासाठी एक कापडी मास्क बाहेर काढतात. मी म्हणतो तुम्हीच बांधा तो माझ्या चेह-यावर, मागून गाठ नाही मारता येणार मला. ते हसतात. म्हणतात बांधतो गाठ मी.. आम्ही आता एक एक रूम ओलांडत चाललोय. इथले सगळेच पेशन्ट सिरीयस असतात. पुढे पुढे जाताना मी एकेकाच्या चेह-यावर नजर टाकतो. सगळेच चेहरे मलून निस्तेज. निष्प्राण डोळे.. मग आम्ही उजवीकडे वळतो. दोन-चार रूम्स ओलांडल्यावर ढसाळांची रूम असते. दरवाजाबाहेर एका छोटयाशा टेबलावर दोन नर्स बसल्यात. काचेचं दार लोटून आम्ही आत शिरतो. समोरच बेडवर ढसाळ. बाजूला एक टेबल. त्यावर काही कागद पडलेले. ढसाळ कसरत करत त्यावर काही लिहिता येतंय का पाहतायत. पण बहुधा जमत नसावं. आत शिरताच सुरेश तिथल्या एका बाटलीतलं लोशन माझ्या हातावर शिंपडतात. मला हात चोळायला सांगतात. ढसाळ म्हणतात त्यांना, ‘अजून टाक ते त्याच्या हातावर.’ मी वैतागल्यासारखं नाटक करत म्हणतो, ‘आजारी कोण आहे? तुम्ही की मी?’ मग विचारतो, ‘कसं वाटतंय आता?’ म्हणतात, ‘आज जरा बरं आहे.’ चौकशी आटोपताच ते म्हणतात, ‘तुझं अक्षर कसं आहे रे?’ मी म्हणतो, ‘रोज काही लिहीत नाही. पण तुम्हाला काही लिहून हवं असल्यास सांगा. लिहून देतो.’ मग ते लिहिण्याचं टेबल सुरेश माझ्याकडे सरकवतात. तिथले एक पेन घेऊन मी त्या टेबलावरच्या कागदावर लिहायला घेतो. म्हणतो ‘सांगा..’ मग ढसाळ बोलू लागतात.

‘देशाला स्वातंत्र्य मिळून आज ६४ वर्ष झालीत..’ पुढे त्यांचं बोलणं चालू असतं. मी अडीच पानं त्यांना लिहून देतो. त्यांच्या कुठल्या तरी लेखाचा हा शेवट असावा. या लेखात मराठी माणसाशिवाय पर्याय नाही वगैरे वगैरे उल्लेख असतो. लिहून झालेले कागद ते तपासून पाहतात. मोठयाने वाचू लागतात. मध्येमध्ये अडखळतात. मी म्हणतो.. ‘ते घाईघाईत लिहिलंय.’ ते पुढे वाचू लागतात. दरम्यान, पुढयातल्या को-या कागदावर मी उगाचच ढसाळांच बेडवरचं एक चित्र रेखाटतो. ८-१० सेकंदात ते एक साधं लाइन स्केच असतं. सुरेश ते पाहून अवाक् होतात. त्यांना नवल वाटतं. पण मी ते एक साधं खरडलेलं चित्र असतं. हुबेहूब ढसाळ नसतात. पण कोरे कागद मला नेहमीच अस्वस्थ करतात. असो तर मग सुरेश ढसाळांना म्हणतात. बघा यांनी काय काढलंय.. मग ते चित्र ढसाळांना देतात. ढसाळ ते पाहत म्हणतात, ‘तू माझा चेहरा याहीपेक्षा चांगला काढू शकला असतास.’ त्याचवेळी बाहेरच्या त्या दोन नर्स आत येतात. काही तरी शोधायला. मी मिस्कीलपणे ढसाळांना म्हणतो, ‘खरं तर यातल्या या एका नर्सच चित्र काढायला हवं.’ ढसाळ म्हणतात, ‘तू काढू शकतोस.’ ते त्या एका नर्सला नावाने हाक मारत म्हणतात, ‘ये आर्टिस्ट हैं. तुझं चित्र काढणार आहे.’ तिचे डोळे मोठ्ठे होतात. दोघीही चटकन बाहेर पळ काढतात. ढसाळ आता माझी चौकशी करतात. म्हणतात, तुला काही इथं त्रास होत नाही ना? मी म्हणतो, ‘त्रास कसला?’ मग गंभीर होत म्हणतात, ‘माणसाचं शरीर फार महत्त्वाचं आहे रे बाबा. त्याची काळजी घ्यायला हवी. हॉस्पिटलात बेडवर पडल्यावर आपल्याला शरीराचं महत्त्व कळलं. खरं तर आपल्याला काहीच दिसत नाही. आपण नुसते अंगावर कपडे चढवतो. या नर्स माझं २-२ तास स्पंजिंग करतात. किती बॅक्टेरिया जंतू असतात आपल्या शरीरावर. इथे सगळं वाईट आहे बाबा..’ मध्येच बोलता बोलता कुणाचा तरी विषय निघतो. ते गृहस्थ नुकतेच ढसाळांना भेटून गेलेले असतात. मी सुद्धा त्यांना ओळखत असतो. मी म्हणतो फार विद्वान माणूस आहे तो.. ढसाळ म्हणतात, ‘मी त्याच्यापेक्षा विद्वान आहे. तुमच्याकडे नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. ते सगळं गुगलसारखं आहे. प्रचंड अभ्यास लागतो. खूप वाचन लागतं.’ मग मी म्हणतो, ‘आपण महान आहात.’ असो. मी आता त्यांचा निरोप घेतो. जाता जाता ते म्हणतात, ‘तू तुझं अक्षर सुधार हं..’ मी हसतो. ‘ठीक आहे’ म्हणतो. पुन्हा चक्कर मारेन म्हणतो. सुरेश मला गेटपर्यंत सोडायला येतात. पण तो मास्क मात्र चुकून माझ्या पॅन्टीच्या खिशातच राहतो.

१५ जानेवारी सकाळी सात वाजता माझ्या मोबाइलवर एसएमएस येतो. ढसाळ गेले! ..पाठोपाठ त्यांचा जुना ड्रायव्हर सलीमचा फोन येतो. पाचच मिनिटांत तो बॉम्बे हॉस्पिटलजवळ पोहोचणार असतो. ‘ढसाळ गेले’ यावर विश्वासच बसत नाही. खरंच ते गेले का? मीच मला पुन्हा पुन्हा विचारत बसतो. ढसाळांच्या शेवटच्या भेटीतला तो मास्क अजूनही माझ्याकडे आहे. माझ्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये पण तो ड्रॉवर उघडण्याची हिंमत माझ्यात आज तरी नाहीय!

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट