Friday, May 3, 2024
Google search engine
Homeमनोरंजनमल्टिप्लेक्सरिव्ह्यू: थोडे लिहिले थोडे बाकी

रिव्ह्यू: थोडे लिहिले थोडे बाकी

एक हूरहूर, गूढत्व आपल्या मनावर साचून राहताना दिसते. अशाच प्रकारची काही भावना होते ती गजेंद्र अहिरे याच्या ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटातून.

postcard marathi movie 01
पोस्टकार्ड
दिग्दर्शक : गजेंद्र अहिरे
कलाकार : दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर, राधिका आपटे, सुबोध भावे

आपण कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत एखाद्या लहान शहरात गेला असाल तर एक अनुभव तुम्हालाही आला असेल. अशा ठिकाणी पहिले काही दिवस गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा कंटाळा येतो. मग तो घालवायला आपण तिथल्या वाचनालयात जातो. त्या ठिकाणी अनेक जुनी पुस्तकं असतात. गुलाबी नक्षीच्या कागदी पुठ्ठयाच्या कव्हरची ही धुळीनं माखलेली पुस्तकं. त्याला हिरव्या रंगाच्या कॅनव्हासचं बाइंडिंग. या पुस्तकांचा टाइपही जुना. काहींच्या कडा फाटलेल्या, काहींवर एक पिवळसर झाक आलेली. या पुस्तकांमधून आपल्याला कधी कधी एखादा कथासंग्रह हाती लागतो. वरकरणी काहीशा गूढ असलेल्या, विचार करायला लावणा-या, विलक्षण रचनासौंदर्य असलेल्या या कथांशी आपण तादात्म्य पावतो. त्यांच्यातल्या विनोदांनी हसतो, त्यातल्या दु:खांनी डोळे ओले करतो. त्या पुस्तकात आपण अगदी रंगून जातो. तो कथासंग्रह हातावेगळा केल्यावर त्यातल्या कथांची अस्वस्थता कितीतरी वेळ आपल्या मनात राहते. जी. ए. कुलकर्णी वाचत असताना अशाच प्रकारची एक हूरहूर, गूढत्व आपल्या मनावर साचून राहताना दिसते. अशाच प्रकारची काही भावना होते ती गजेंद्र अहिरे याच्या ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटातून.

चित्रपटाची कथा म्हणजे लेखकाचा एक खेळ आहे. एखादा चित्रकार आधी काही रेषा आखत जातो. व पाहता पाहता त्यातून एक विलक्षण असं चित्र निर्माण होते. अशाच प्रकारची काहीशी ही रचना. चित्रपटाच्या नावाप्रमाणे ही कथा आहे पोस्टकार्डची. एक असं माध्यम ज्यात एक व्यक्ती आपल्या भावना दुस-या व्यक्तीला कळवते. ते व्यक्तिगत असतं. मनाच्या खोल गाभा-यातलं असतं. तरीही ते कोणीही वाचू शकेल असं असतं. अशाच प्रकारच्या तीन कथा आपल्यासमोर तिपेडी वेणीप्रमाणे बांधण्यात गजेंद्र यशस्वी झाला आहे. अनेक दिवसांनंतर हा गजेंद्र अहिरेचा खास मनाच्या कुपीतला सिनेमा आहे, असं तो पाहताना सतत जाणवत राहतं.

चित्रपटाला एक कथा नाही. तरीही एक कथा आहे. कथा म्हणाल तर एका पोस्टमनची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या पत्नीची. त्याचं जीवन अगदी सुरळीत सुरू आहे. त्यात कोणतंही वादळ नाही. त्याला असलेल्या पगारात तो सुखानं जीवन जगत आहे. आपल्या कुटुंबात तो सुखी आहे. त्याच्या बायकोला असलेली लोकांची पत्र वाचायची एक वाईट सवय सोडली तर त्यांच्यात काही नाराजीही नाही. हळूहळू आपल्या या पोस्टमनगिरीमुळे त्याच्या आयुष्यात विविध प्रसंग येतात, काही माणसं भेटतात. तो आपलं निरोप पोहोचवायचं काम चोखपणे करत जातो. मात्र तरीही त्याच्या आयुष्यात जी वादळं येतात त्याची ही कथा आहे. ती सलगपणे इथे सांगून चित्रपट या कलेचाच अपमान न केलेला बरा.

गजेंद्रने या वेळी आपली सगळी बुद्धिमत्ता, आपली सगळी सर्जनशीलता वापरल्याचं दिसून येत आहे. ही कथा त्याचीच आहे. त्याने घेतलेल्या विविध माणसांचा व त्याच्या वाचनाचा एक आगळावेगळा संबंध या चित्रपटातून दिसून येतो. एकाच वेळेस तीन वेगवेगळया कथा मांडूनही त्यात एकसंधता ठेवण्याची एक विलक्षण कसरत त्यानं या चित्रपटाच्या माध्यमातून लीलया केलेली आहे, त्यात तो यशस्वी झालेला आहे. त्यानं चित्रपटाचा प्रवाहीपणा जरी चांगला जपला असला तरी काही फ्रेम्सच्या प्रेमात पडल्यामुळे काही काही प्रसंग संथ झालेले आहेत. तेवढी एक गोष्ट सोडली तर चित्रपट आपला परिणाम तर साधतोच, त्याचबरोबर एक उत्तम कलाकृती पाहिल्याचा आनंदही देऊन जातो. त्याने दिलेला हा अनुभव आपल्या मनावर रेंगाळत राहणारा आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडल्याबरोबर विसरून जावा असा हा चित्रपट नाही. या चित्रपटाला एक साहित्यिक postcard marathi movieपरंपराही आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या जीवनात जी.ए.कुलकर्णी यांचं लेखन वाचलेले आहे त्यांना या चित्रपटातून एक वेगळीच अनुभूती मिळते. ज्यांनी वाचलं नसेल त्यांच्यासाठी चित्रपटाच्या भाषेतला हा एक वेगळाच जॉनर आहे. ही काही गूढकथा नाही तरी त्यात गूढत्व आहे. अ‍ॅक्शन नाही पण जीवनातल्या विविध परिस्थितींमध्ये नोंदवलेली एक तीव्र प्रतिक्रिया आहे. या कथांमधली माणसं वेडी नाहीत तरी त्यांचे मनोविकार सुस्पष्ट आहेत. चित्रपटातील विविध पात्रांच्या जीवनातील विविध प्रश्नांकडे पाहात असतानाच त्याचं मनोविश्लेषण करण्याचाही एक प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. जी.ए. यांची कथा चित्रपटात आणणं वेगळं व त्यांच्या जॉनरच्या कथेवर चित्रपट करणं यातला वेगळेपणा अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. तरीही हा चित्रपट एक विशेष अनुभव आहे. ते मनोरंजन नाही तर मनाला अस्वस्थ करून जाणारं काहीतरी आहे, एवढंच या चित्रपटाच्या संदर्भात आपल्याला बोलता येईल.

गजेंद्रनं या कथांचा पोत वापरून एक वेगळया धाटणीचं काम या चित्रपटातून केलं आहे. त्याच्या फ्रेम असोत, विविध दृश्य चित्रित करण्याची त्याची शैली असो की त्याची एकंदरीत कथा सांगण्याची शैली असो, की या चित्रपटातल्या प्रसंगांसाठी त्याने केलेला संगीत व नृत्यांचा वापर असो, प्रत्येक पातळीवर एक दिग्दर्शक म्हणून त्याची छाप पडलेली आपल्याला दिसून आल्याशिवाय राहत नाही. या चित्रपटाच्या छायांकनातही योगेश राजगुरु यांनी अनेक विलक्षण प्रयोग केले आहेत. जगातील काही चित्रपटांतून चित्रीकरणांच्या शैलींवर त्या त्या देशाची छाप दिसून येते. इराण, इराक इथल्या कॅमे-याची पद्धत वेगळी, फ्रान्समधल्या कॅमे-याची पद्धत वेगळी तर अगदी हॉलिवुडमधल्या चित्रपटांची पद्धत वेगळी. या चित्रपटातून सुरेश देशमाने यांनी एक खास भारतीय कॅमे-याच्या फ्रेमची पद्धत विकसित केल्याचं दिसून येतं. त्यांनी वापरलेले लाँग, मीडियम लाँग व क्लोज शॉट यांचा एक अनोखा संगम यात दिसून येतो. त्याचं एक उदाहरण इथे देतो. एका प्रसंगात पोस्टमन बैलगाडीतून दुस-या गाडीत जात असतो. त्यावेळी दुरुन ती गाडी दिसते. ती जवळ आल्यावर पोस्टमन दिसतो, त्यानंतर मीडियम शॉटमध्ये गुलजार हे एक पात्र दिसतं व त्यानंतर लगेच गुलजार या पात्राचा एक क्लोज. अहा.. काय जबरदस्त कॉम्बो या निमित्तानं त्यांनी साधलेला आहे. या चित्रपटात अशाच प्रकारच्या तंत्राच्या अनेक आनंदमय लहरी आपल्याला जाणवतात. तोच आनंद या चित्रपटाच्या संगीतातून व पार्श्वसंगीतातूनही दिसून येतो.

हा चित्रपट अनेक पात्रांच्या मनोविकारांचा चित्रपट आहे. त्यामुळे त्यासाठी सशक्त अभिनेत्यांची एक फौज असणं आवश्यक आहेच. केवळ नावं सांगितली तरी ते पुरेसं होईल असं या लोकांचं आतापर्यंतचं कर्तृत्व आहे. दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर, राधिका आपटे, सुबोध भावे अशा सर्वच कलाकारांनी आपल्याला मिळालेल्या एका एका फ्रेममध्ये आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. कोणाच्याही कामात डाव-उजवं नाही. सगळ्यांचाच अभिनय उजवा असा अनुभव या चित्रपटातून दिसून येतो. हा अनुभव सगळ्यांनीच घ्यावा असा आहे. ज्यांना केवळ मनोरंजनासाठी चित्रपट पाहायचा असतो त्यांनीही कधी तरी अनवट वाटेनं चालण्याचा आनंद घ्यायचाच, अशा विचाराने हा चित्रपट पाहावा. हा अनुभव तुमची अभिरुची समृद्ध करून जाणारा ठरेल.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Cinematography is done by Mr. Yogesh Rajguru and not by Mr. Suresh Deshmane. Thank you for compliments as considering this is work of Suresh sir itself is big compliment for new cinematographer like me. Warm regards

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट