आमिर खानने देशातील वाढत्या असहिष्णूतेवर मतप्रदर्शन केल्यानंतर त्यावरुन संपूर्ण देशामध्ये सुरु झालेल्या वादावर बोलताना केंद्रीय मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी आमिर खानवर अप्रत्यक्ष टीका केली.
नवी दिल्ली – बॉलिवुड अभिनेता आमिर खानने देशातील वाढत्या असहिष्णूतेवर मतप्रदर्शन केल्यानंतर त्यावरुन संपूर्ण देशामध्ये सुरु झालेल्या वादावर बोलताना केंद्रीय मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी आमिर खानवर अप्रत्यक्ष टीका केली.
काही लोक दुस-यांची दिशाभूल करतात तर, काहींची दिशाभूल होते. कोण कुठल्या वर्गात येतो यावर मला बोलयचे नाही. काही जण चुकीच्या गोष्टींचा प्रचार करतात तर, काही जण चुकीच्या प्रचाराला बळी पडतात.
माझ्या मते देशातील आताची परिस्थिती ही जगातील अन्य देशांपेक्षा चांगली आहे. भारतात मोठया प्रमाणावर सहिष्णूता आहे. भारताचे नागरीक सहिष्णू आहेत. आमचे सरकार आल्यानंतर जातीय हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. नक्षलवाद्यांकडून होणा-या निष्पाप नागरीकांच्या हत्या कमी झाल्या आहेत असे नायडू म्हणाले.
दादरी हत्याकांडाचा संदर्भ देताना ते म्हणाले कि, हा राज्याशी संबंधित विषय आहे. ते केंद्राला दोष देत आहेत. नरेंद्र मोदी यांचा जागतिक नेते म्हणून झालेला उदय त्यांना पचवता आलेला नाही. मोदींना बदनाम करण्याच्या नादात ते देशाचीही बदनामी करत आहेत असे नायडू म्हणाले.
दक्षिण कोरियातील भारतीय समाजापुढे केलेल्या भाषणात मोदी म्हणतात “एक काळ असा होता की लोकांना वाटायचे कि मागच्या जन्मी काय पाप केले होते कुणास ठाऊक कि ज्यामुळे भारतात जन्म घ्यावा लागला ? हा काय देश आहे ? हे काय लोक आहेत ? चला सोडून जाऊ कुठे तरी ……. ” यात मोदींची देशभक्ती दिसते आणि आमिर खान त्याच्या बायकोचे विचार मांडतो तेव्हा त्याची गद्दारी दिसते . खासा न्याय आहे .