सुवर्णमंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी शीख समाजाच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
अमृतसर – सुवर्णमंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी शीख समाजाच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये १२ जण जखमी झाले आहेत.
सुवर्णमंदिर परिसरात लष्कराने केलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला तीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली.
शिरोमणी गुरुव्दारा प्रबंधक समितीचे स्वयंसेवक आणि जहालमतवादी शिख कार्यकर्ते परस्परांना भिडले. अखाल तख्त इमारतीच्या बाहेर ही हाणामारी झाली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते तलवार आणि काठया घेऊन परस्परांवर चालून गेले. सुवर्णमंदिराच्या आत दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते खुलेआम तलवार उपसून परस्परांच्या पाठिमागे पळताना दिसत होते.
शिरोमणी गुरुव्दारा प्रबंधक समितीच्या स्वयंसेवकांनी जहालमतवादी शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांना खलिस्तान समर्थनाच्या घोषणा देण्यापासून रोखले तसेच तलवारी आणि अन्य पारंपारिक शस्त्रास्त्रे बाहेर काढायला विरोध केल्यानंतर या हाणामारीला सुरुवात झाली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये मरण पावलेल्या नागरीकांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर ही हाणामारी झाली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही मारहाण करण्यात आली, कॅमेरे फोडण्यात आले. अजूनही सुवर्णमंदिर परिसरात तणावाची स्थिती आहे.
शीख अतिरेक्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई करणे भारत सरकारला भाग पडले.अतिरेक्यांनी जवळ जवळ पंजाब भारतापासून तोडण्याचा कट पाकिस्तानच्या मदतीने पूर्णत्वास आणला होता.जर त्या वेळी लष्करी कारवाई केली नसती तर आज पंजाबच्या ऐवजी पाकिस्तानच्या इशार्या प्रमाणे भारतास छळणारे अजून एक खलिस्तान नावाचे राष्ट्र निर्माण झाले असते.परंतु आजतागायत तेथील उरल्यासुरल्या अतिरेक्यांना घाबरून बादल सरकार अतिरेक्यांच्या देशद्रोही कृत्यांना विरोध तर करत नाहीच पण पाठिंबाच देत आहे.जर्नेलसिंघ्चे व अन्य अतिरेक्यांचे सुवर्ण मंदिरात स्मारक केले,अतिरेक्यांना शहीद म्हटले,भारतीय सेनेवर व अधिकाऱ्यांवर घृणास्पद आरोप केले.अतिरेक्यांच्या नातेवैकांचा सत्कार केला.सैनिक कारवाईत भाग घेतलेल्या लष्करी अधिकाऱ्यांवर अगदी परदेशात पण हल्ले केले. प्रकाश सिंघ बादल ह्यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त अकाली दल अतिरेक्यांपुढे नांगी टाकून बसले आहे.अशा सरकारला भा.ज.प.चा पाठींबा आहे.हि अत्यंत लज्जास्पद व संताप आणणारी गोष्ट आहे.अशाने परत पंजाबमध्ये अतिरेकी डोके वर काढतील.