राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू असलेल्या गस्ती दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथील तिठयावर आणि खेड तालुक्यातून एक लाख किमतीचा काळा गूळ जप्त केला आहे.
रत्नागिरी- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरून होणा-या विनापरवाना मद्याच्या वाहतुकीला प्रतिबंध बसावा, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू असलेल्या गस्ती दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील पाली येथील तिठयावर आणि खेड तालुक्यातून एक लाख किमतीचा काळा गूळ जप्त केला आहे. महामार्गावरून देशी दारू निर्मितीसाठी या गुळाची विनापरवाना वाहतूक सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत तीन जणांना अटक केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील पाली बसस्थानकाशेजारील कोल्हापूर येथून येणा-या तिठयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गस्त घालण्यात येत असताना महामार्गावरील गाडयांची कसून तपासणी केली जात होती. या वेळी कोल्हापूरकडून येणारी पांढ-या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप तपासणीसाठी थांबवण्यात आली. या गाडीच्या चालकाकडे विचारणा केली असता त्याने विसंगत उत्तर दिल्याने गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत दहा किलोच्या काळया गुळाच्या शंभर ढेपा आढळून आल्या. या विनापरवाना वाहनातून गुळाची विनापरवाना वाहतूक सुरू असल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी बाळू जाधव (२४), युवराज दिनकर शिंदे (३५) दोघेही राहणार कोल्हापूर या दोघांना अटक केली.
या दोघांनीही गाडीतील काळा गूळ हातभट्टीच्या दारू निर्मितीसाठी नेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. या दोघांकडे अधिक चौकशी केली असता अशाच प्रकारचा गूळ खेड तालुक्यातील खोपी गावात रेडीज नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दोघांनी दिली. राज्य उत्पादन शुल्कचे पोलिस खोपी गावात काळा गूळ विकलेल्या मोहन शंकर रेडीज (५८) यांच्या घरी पोहोचले. त्यांच्या घराशेजारील महिन्द्रा बोलेरो गाडीतून दहा किलो वजनाच्या काळ्या गुळाच्या २५० ढेपा जप्त केल्या.
अरे मेल्यानू ! दारू कसली बनवता ?? तिळाची चिक्की ,तिळाचे लाडू ,शेंगदाण्याचे लाडू,चिक्की,khobryachi
चिक्की,काजूची चिक्की,असला गोड धोड तयार करूचा सोडून , माय ** !दारू बनवतत !