जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलाविले होते.
मुंबई- जीएसटी विधेयक मंजूर करण्यासाठी २९ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलाविले होते. त्या अधिवेशनातील चर्चेत भाग घेताना माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांनी या विधेयकानंतर महागाई वाढू शकते, अशी शंका उपस्थित केली होती.
जीएसटीला पाठिंबा देत असताना काँग्रेसने त्याची मर्यादा १८ टक्केच असावी, अशी मागणी केली होती. ती मान्य केली जाईल का? यावर नारायण राणे यांनी विधान परिषदेत शंका व्यक्त केली होती.
आज केंद्र सरकारने २८ टक्के जीएसटी लागू केल्यामुळे ती शंका खरी ठरली आहे. त्यावेळी नारायण राणे म्हणाले होते की, ‘‘हे विधेयक मंजूर झाले तर महागाई वाढण्याची शक्यता आहे. तशी महागाई वाढू द्यायची नसेल तर जीएसटी लागू झाल्यानंतर तो १८ टक्केच असावा, अशी काँग्रेसची मागणी केली आहे.
मात्र तसा जीएसटी ठेवला जाईल याची शाश्वती काय?’’ आता जीएसटीची मर्यादा २८ टक्क्यांवर नेऊन ठेवल्यामुळे महागाईचा भडका उडणार, ही नारायण राणे यांनी व्यक्त केलेली शंका खरी ठरताना दिसत आहे.
जीएसटी कराची आकारणी हि प्रत्येक विभागात वेगवेगळ्या टक्क्यांनी आकारण्यात आली आहे 28 टक्के जीएसटी
कर हि कर,फ्रिज आणि ज्या चैनीच्या वस्तू त्यावर 28 टक्के आहे धान्यावर जीएसटी कर लावण्यात आला नाही
किराण्यावर 5 टक्के आहे संपूर्ण जीएसटी कर हा 28 टक्के झाला आहे हे सांगणे जरा चुकीचे वाटते