यंदा कमी पावसामुळे पिकांवर परिणाम झाला तर डिझेल, वीज आणि बियाणांवर शेतक-यांना अनुदान देणार असल्याची घोषणा शुक्रवारी सरकारने केली.
नवी दिल्ली – यंदा कमी पावसामुळे पिकांवर परिणाम झाला तर डिझेल, वीज आणि बियाणांवर शेतक-यांना अनुदान देणार असल्याची घोषणा शुक्रवारी सरकारने केली.
कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. या वेळी बैठकीदरम्यान उर्जा, जलस्त्रोत, ग्रामीण विकास, अन्न आणि खत मंत्रीही उपस्थित होते.
यंदा देशात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास शेतक-यांना डिझेल, वीज आणि बियाणांवर अनुदान दिले जाईल असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. तसेच दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे ते म्हणाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार यावर्षीही डिझेलवरील १० रुपयांचे अनुदान कायम ठेवणार असल्याची शक्यता आहे. तसेच बियाणांवर विविध योजनांतर्गत ५० रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच सिंचनासाठी शेतक-यांना मोफत वीज दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मान्सून सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. २२ जून रोजी हवामान खात्याने देशभरात सरासरी ९३ टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र त्यानंतर दोन जून रोजी हवामान खात्याने यंदाच्या वर्षी मान्सून सरासरीच्या ८८ होईल असा अंदाज वर्तवला आहे.
आधी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा