भाजपा जाहीरनाम्यात पान क्र. १९वर ‘सामान्य नागरिकांची टोलजाचातून मुक्ती,’ असे आश्वासन भाजपाने दिले होते.
मुंबई- ‘टोल ही संकल्पना आहे. टोलमुक्तीचे कोणतेही आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिलेले नाही,’ असं सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्क खोटं बोलत आहेत. भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणूक २०१४ साठी जे ‘दृष्टीपत्र’ तयार केलेले आहे ते ३० पानांचे आहे. त्या दृष्टीपत्रामध्ये ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ’ अशा शिर्षकासह भारतीय जनता पार्टीने समृद्ध महाराष्ट्राचे हमी देणारे हे पत्र आहे, असे सांगून एकूण १७ विषयांवर मतदाराला विविध वचने दिली आहेत. त्या वचनांमध्ये पान ९वर एलबीटी रद्द करणार, असे अकराव्या क्रमांकावर सांगितले आहे. (एलबीटी रद्द करण्याची काहीही हालचाल नाही.) तसेच त्याच पानात ऊर्जा शिर्षकाखाली चौदाव्या क्रमांकावर भ्रष्टाचाराला प्रतिबंध करून एक वर्षात राज्य लोडशेडिंगमुक्त करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री जे सांगतात की टोलधोरणाबद्दल आम्ही जाहीरनाम्यात काहीही सांगितलेले नाही. टोलमुक्ती संकल्पना आहे. तर याच दृष्टीपत्रामध्ये पायाभूत सुविधा विकास या शिर्षकाखाली क्रमांक पाचवर ‘टोल धोरणात आमूलाग्र बदल. सामान्य नागरिकांची टोलच्या जाचातून मुक्ती,’ असे आश्वासन भाजपाने लेखी दिलेले आहे. टोलच्या जाचातून मुक्ती होण्याऐवजी विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून खारघर येथे नव्याने टोलनाका बसवण्यात आलेला आहे. हा टोलनाका वाशीच्या टोलनाक्यानंतर अवघा तेरा किलोमीटरवर आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा त्या पुरोगामी आघाडीच्या सरकारने दोन टोलमधले अंतर किमान ४० किलोमीटर असेल, असे आश्वासन दिले होते. खारघरच्या टोलनाक्याला सर्व पक्षांनी विरोध केला होता, एवढेच नव्हे तर त्यावेळचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे खारघर टोलनाक्याची आता जिथे उभारणी आहे, तिथे जाऊन त्यांनी हा ‘टोलनाका सुरू करू देणार नाही,’ असे जाहीर केले होते. त्यांच्यासोबत रायगड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील हेही होते.
पनवेल विधानसभा मतदारसंघातील त्या निवडणुकीतील उमेदवार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी दि. २३ सप्टेंबर २०१४ रोजी आलेले श्री. नितीन गडकरी यांनी जाहीर केले की, ‘टोल का खेल मैने शुरू किया, मै ही खत्म करूंगा’.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रशांत ठाकूर यांच्याच प्रचारासाठी दि. १० ऑक्टोबर २०१४ रोजी बाठिया हायस्कूलच्या मैदानावर नवीन पनवेल येथे आले होते. त्या सभेत भाषण करतानाही श्री. फडणवीस यांनी खारघर टोलनाक्याचा विषय उपस्थित करून टोलमुक्ती देऊ असे जाहीर केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता सांगत आहेत की, टोलच्या जाचातून मक्ती ही संकल्पना आहे. आणि भाजपाने तसे कोणतेही आश्वासन जाहीरनाम्यात दिलेले नाही.
प्रत्यक्षात भाजपाने या जाचातून लोकांना मुक्ती देण्याचे जाहीर आश्वासन दिलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री चक्क खोटे बोलत आहेत असे सर्रासपणे मानले जात आहे.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ह्यांच्या सर्व भाष्यानाथ L B T and TOLL Cancelled करण्याच्ये आश्वासन दिल्ये होते
शिवसेनेचे महापौर ह्यांनी सांगितले मुंबईला TOLL ची गरज नाही . भाजप आणि शिवसेनच्या सरकार मध्ये जर TOLL Cancelled होणार नसेल तर हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला फसवत आहेत . सताधारी पक्ष आता त्रितीय पन्था सारखा नाक्या नाक्या वर उभाराहून भिक मागत आहे . R S S वाल्यांना भिक मागितलेली चालते का ? किवा हे खंडणी गोळा करण्याचा कायदेशीर मार्ग शोधला आहे .