छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हते, यावर आता थेट कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसांनीच आता त्यावर भाष्य केल्यामुळे सुरू झालेल्या चर्चेला पूर्णविराम मिळेल की नाही माहीत नाही, मात्र संभाजी राजे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळय़ात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजी महाराज हे केवळ गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हते, असे विधान केले होते. त्यावर सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून खूप मोठय़ा चर्चेला उधाण आलेले आहे. अशा वेळी थेट संभाजी राजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली याला विशेष महत्त्व आहे. विशेष म्हणजे गो-ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज लोकमानसात रुजविण्यासाठी ज्या विचाराच्या संघटना प्रयत्न करतात, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समावेश आहे आणि संघाच्या इशा-यावर चालणा-या भाजप सरकारच्या शिफारशीवरून संभाजी राजे राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेत पोहोचलेले आहेत, असे असताना त्यांनी व्यक्त केलेल्या या विधानाला विशेष महत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस म्हणून संभाजी राजे यांनी नेहमी आपली वेगळी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात २६ मेळावे घेण्यात आले, त्यातील अनेक मेळाव्यांना संभाजी राजे यांनी हजेरी लावली. इतकेच नव्हे तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईसाठी आपण कायम आघाडीवर राहू, अशी भूमिका त्यांनी उघडपणे घेतलेली आहे.
राजघराण्यात १९७१ मध्ये जन्मलेले संभाजी राजे यांना महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांबाबतही आस्था असून त्यांच्या संवर्धनासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतो. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. अलीकडेच त्यांचा मराठा चेहरा लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांना राष्ट्रपतींच्या कोटय़ातून राज्यसभेत खासदार म्हणून पाठविले आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या विधानाला विशेष महत्त्व आहे.
कोकाटे ,शरद पवार,युवराज यांना हे इतिहासाचे नवीन शोध इतक्या वर्षांन नंतर कसे लागले ?
हाच एके संशोदनाचा विषय आहे …….. !!!
कोकाटे यांचे दुकान तर फक्त ब्राह्मण द्वेषावर चालते ते बाकी काही बोलतच नाही.
समाजाला भडकवण्याचे काम मात्र नक्की करतात ते.
त्याची पुस्तके वाचून एखादी जातीय दंगल किंवा वाईट घटना झाली तर त्याना आरोपी करायला विसरू नका साहेब.