इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या इजाज शेख ऊर्फ वासीम यानेच यासिन भटकळ याला मुंबईत भाडय़ाने घर घेण्यासाठी बनावट पॅनकार्ड मिळवून दिले होते.
मुंबई – इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या इजाज शेख ऊर्फ वासीम यानेच यासिन भटकळ याला मुंबईत भाडय़ाने घर घेण्यासाठी बनावट पॅनकार्ड मिळवून दिले होते.
त्या पॅनकार्डचा पुरावा देत भटकळ याने मुंबईत भाडय़ाने घर मिळवले आणि विशेष म्हणजे त्याच घरात स्फोटांसाठी बॉम्ब तयार करण्यात आले होते. इजाजला दहशतवादविरोधी पथकाने नुकतीच अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
२०१०मध्ये इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने मुंबईतील ओपेरा हाऊस, दादर व झवेरी बाजार येथे साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या बॉम्बस्फोटांत निष्पापांना जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी इंडियन मुजाहिदीनने मुंबईतील काही भागांची पाहणी केली होती. विशेष म्हणजे बॉम्बस्फोटांसाठी मुंबईतच बॉम्ब तयार करण्यात आले होते.
दहशतवादी संघटनेसमोर आव्हान होते ते बॉम्ब तयार करायचे कुठे? यासिन भटकळ याने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. परंतु बॉम्ब तयार करण्यासाठी इजाजने त्याला जागा मिळवून दिली होती. भाडय़ाचे घर घेण्यासाठी पॅनकार्ड योग्य पुरावा ठरू शकतो, हे जाणून घेत इजाजने भटकळला बनावट पॅनकार्ड उपलब्ध करून दिले.
त्या आधारेच भटकळ याने मुंबईत भाडय़ाचे घर घेतले आणि त्याच घरात बॉम्ब तयार करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले, असे दहशतवादीविरोधी पथकातील वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
मुंबईत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात याचा थांगपत्ता हि मुंबई पोलिसांना लागत नाही, बर समोर राहणारा व्यक्ती कोण आहे आणि तो आम्हा समोर दादागिरीच्या वार्ता करतो याबद्दल जरी तक्रार केली तर पोलिस अधिकारी आपल्यालाच मारहाण, शिवीगाळ आणि उलट चार्ज मारतात, म्हणून सामान्य माणूस गल्लीत, इमारतीत, परिसरात त्याने राडे जरी केले तरी पोलिस चौकीत साधी तक्रार हि करत नाही. जन्मजात मुंबईत राहत असलेल्या व्यक्तीस मारहाण करताना पोलिसांना वाईट वाटत नाही, पण बाहेरील व्यक्तीवर हात उचलताना ते खूप विचार करतात, कारण त्याला उलट बोलले कि तो त्या अधिकाऱ्यास सरळ बोलतो “बाहर मिल नंगा करके मारेगा” मुंबईतील व्यक्ती लगेच सापडली जाते, परंतु बाहेरील व्यक्तीला ते पोलिस अधिकारी कुठे शोधणार. उद्या ज्या व्यक्तीची तक्रार आपण दिली तिने जर चुकीचे कारस्थान केले तर तेच पोलिस अधिकारी आपल्यालाच प्रश्न विचारणार एवढे दिवस झोपलेलात का? समोरील व्यक्ती गुन्हा करतो आणि तुम्ही चौकीस कळवत सुद्धा नाही. हा उलट जबाब देतात. आम्ही पोलिस तरी कुठे कुठे लक्ष देणार असे ताशोरे हि ओढतात. स्थानिक गुंडाच्या मदतीने ह्या व्यक्ती तेथे वास्तव करतात. कित्येक पोलिसांना अशा व्यक्तींकडून चिरी मिरी देण्यात येते, उलट गुन्हा थांबवणाऱ्या व्यक्तीवर उलट केस करीन असे अधिकारी वर्ग बोलतात. रात्रीच्या पाळीतील पोलिस अधिकारीसुद्धा अंगावर कांबरुण घेऊन चौकीतील केबल टेलीविजनचा आनंद घेत आपले कामाचे दिवस भरतात. अत्यंत तातडीचे फोन सुद्धा ते उचलू शकत नाही कारण फोनजवळील अधिकारीच तेथे उपस्थित नसतो. अधिकारी वर्गाजवळ तक्रार निली तरी हा माझ काय वाकड करणार असे उपदेश तक्रारदारास देतात. म्हणून सामान्य माणूसही आम्हीतरी मदत का करायची असे उत्तर देतात. सामान्य माणूस एकदा का पोलिस चौकीत दाखल झाला कि त्याला गुनेह्गार हा शिक्का मारल्या शिवाय मुंबई पोलिस स्वस्थ बसत नाही. जोगेश्वरी पूर्व आणि पश्चिमेस असे किती तरी तडीपार येउन वसले आहेत तरी पोलिस अधिकारी त्यांना हात लावू शकत नाही.