Friday, May 3, 2024
Google search engine
Homeटॉप स्टोरीना अर्थ, ना संकल्प

ना अर्थ, ना संकल्प

विकासाच्या स्वप्नरंजनाने अपेक्षा वाढवलेल्या मोदी सरकारने करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा अपवाद सोडल्यास, उर्वरित अर्थसंकल्पामध्ये निराशाच केली. 

Arun Jaitley नवी दिल्ली- विकासाच्या स्वप्नरंजनाने अपेक्षा वाढवलेल्या मोदी सरकारने करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याचा अपवाद सोडल्यास, उर्वरित अर्थसंकल्पामध्ये निराशाच केली. वित्तीय तूट, महागाई नियंत्रण यांसारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव असलेला पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेत सादर केला. गुंतवणूकदारांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण करण्यात हा अर्थसंकल्प अपयशी ठरला असून शेअर बाजारात त्यांचे पडसाद उमटले. दिशाहीन अर्थसंकल्पामुळे दिवसभरात बाजाराने ८०० अंकांचा चढउतार अनुभवला.

वैयक्तिक करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५०,००० रुपयांनी वाढवून नोकरदार वर्गाला किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २,५०,००० रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आले असून ज्येष्ठांसाठी ही मर्यादा ३,००,००० करण्यात आली आहे. तसेच गृह कर्जावरील व्याजदरावर २,००,००० पर्यंत कर वजावट मिळणार आहे. किरकोळ गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तिकर ‘कलम ८०सी’मधील कर सवलत आणि पीपीएफमधील कर सवलत १,५०,००० पर्यंत वाढवण्याची घोषणा जेटली यांनी केली. तसेच कारखाना उत्पादन, सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी या क्षेत्रातील उत्पादन शुल्कात कपात केली. तर विमा आणि संरक्षण क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

सिगारेट, सिगार, पान मसाल्यावरील उत्पादन शुल्क ७२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले तर शीतपेयांवरील उत्पादन शुल्कातही ५ टक्के वाढ करण्यात आली. दरम्यान १९ इंचांपेक्षा कमी स्क्रीन असलेल्या एलसीडी, एलइडी, स्थानिक लॅपटॉप, टॅबलेट, सौरऊर्जेतील उपकरणे आणि पादत्राणांवरील उत्पादन शुल्कात कपात केली. सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळय़ासाठी २०० कोटींची तरतूद करताना महिलांसाठी मात्र केवळ १०० कोटींचा निधी उपलब्ध केल्याने महिलांवर अन्याय करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात एम्स आणि आयआयएम

पुण्यातील एफटीआयआय या संस्थेला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर पुण्यामध्ये जैवतंत्रज्ञान क्लस्टर सुरू करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोअरचे मुख्यालय पुण्यात स्थापण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली. एम्सच्या धर्तीवर नागपूरसह देशात चार ठिकाणी रुग्णालये उभारली जाणार आहेत. याशिवाय विदर्भाच्या रूपाने राज्याला प्रथमच आयआयएमही मिळणार आहे. झोपडपट्टी विकासासाठी विशेष योजनेची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली असून त्याचा मुंबईला फायदा होईल. बंदरांच्या विकासासाठी ११,००० कोटींची तरतूद असून याचा राज्यातील बंदरांना फायदा होईल.

गेल्या दोन वर्षापासून ५ टक्क्यांखाली रेंगाळणारा विकासदर आणि वाढती महागाई यामुळे स्थिती आव्हानात्मक झाली आहे. पुढील तीन ते चार वर्षात ८ टक्के विकासदर गाठण्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात सुरुवात करण्यात आली आहे. – अरुण जेटली, अर्थमंत्री

दिशाहीन अर्थसंकल्प असून यामुळे विकासाचा वेग मंदावेल. – राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस

केंद्रातील नवीन सरकारने सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पातून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. सत्तेत आल्यावर क्रांतिकारक निर्णय घेऊन एक प्रकारे आर्थिक शिस्त आणू असा दावा केला जात होता. हा दावाही किती पोकळ होता हे या अर्थसंकल्पातून समोर आले आहे.- पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

सर्वासाठी आरोग्य

देशातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकारने प्राधान्यक्रम दिला आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत औषध आणि निदान सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी १५ नवीन ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. ही संशोधन केंद्रे स्थानिक आरोग्यविषयकसंशोधन करतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. क्षयरोग निवारणासाठी सरकारने विशेष योजना आखली आहे. या रुग्णांना तात्काळ निदानासाठी चांगली निदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच नवी दिल्लीत ‘एम्स’ आणि चेन्नईत संशोधन संस्था सुरू करण्यात येणार आहेत. तसेच दंत महाविद्यालयात दंतविषयक उच्च शिक्षण आणि संशोधन करणा-या संस्था स्थापन करण्यात येणार आहेत.

नोकरशहांच्या प्रशिक्षणासाठी २०५ कोटी

देशातील नोकरशाही अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने यंदा भरीव तरतूद केली आहे. नोकरशहांच्या प्रशिक्षणासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात २०५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ सेक्रेटरीएट ट्रेनिंग अ‍ॅँड व्यवस्थापन आणि लालबहाद्दूर शास्त्री नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ अ‍ॅडमिनीस्ट्रेशनचा खर्च भागवण्यात येणार आहे. या दोन्ही संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणारे फाऊंडेशन खर्च, रिफ्रेशर कोर्स, विविध प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. केंद्रीय माहिती आयोग आणि पब्लिक इंटरप्राइजेस सिलेक्शन बोर्डासाठी या अर्थसंकल्पात ३०.३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

डिजिटल इंडिया योजना

देशात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी ‘डिजिटल इंडिया’ ही योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण स्तरापर्यंत ब्रॉडबँडचे जाळे नेण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी कारभारात अधिक पारदर्शकता येऊ शकेल. सॉफ्टवेअर उत्पादनाला चालना देण्यासाठी खास लक्ष देण्यात येणार आहे. सरकारतर्फे ‘राष्ट्रीय ग्रामीण इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी मिशन’ प्रस्तावित केले आहे. सरकारी सेवांसाठी ‘ई-क्रांती’ योजना हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सरकारतर्फे ५०० कोटी रुपयांची योजना आखली आहे. तसेच ६०० सामुदायिक रेडियो सुरू करण्यात येतील. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

स्थानिक कंपन्यांना ‘पोलादी’ सुरक्षा

पोलाद क्षेत्रातील स्थानिक उद्योगांचे हित जपण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात पोलादावरील आयातशुल्क ५ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. चीन आणि इतर देशांमधील पोलादाची आयात वाढल्याने स्थानिक उद्योगांची अवस्था बिकट झाली आहे. ज्यामुळे स्थानिक कंपन्यांना तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. चीन आणि ब्राझिल यांसारख्या देशांमध्ये भारताच्या तुलनेत जास्त आयातशुल्क आहे. आयातशुल्क वाढवल्याने स्थानिक पोलादाची मागणी वाढेल, असे सरकारने म्हटले आहे.

मनरेगासाठी ३३,३६४ कोटी

यूपीए सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मनरेगासाठी सरकारने ३३,३६४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू ठेवण्याचे सरकारने ठरवले आहे. या योजनेअंतर्गत केले जाणारे काम उत्पादक, मालमत्ता निर्माण करणारे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. तसेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी सरकारने १४,३८९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण चरितार्थ मिशनअंतर्गत १०० जिल्ह्यातील महिला बचत गटांना ४ टक्के व्याजाने कर्ज देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील दारिद्रय हटवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

ईशान्य भारतासाठी ५३,७०६ कोटी

ईशान्य भारतातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने ५३७०६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या भागात रेल्वे व रस्ते वाहतूक सुधारताना सेंद्रीय शेतीला प्राधान्य देण्यात येणार आहे. या भागासाठी खास २४ तास चालणारी वाहिनी सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मणिपूरमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. या भागातील रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी सरकारने अतिरिक्त हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या भागातील रस्ते बांधणीसाठी ३७,८८० कोटी रुपये ठेवले आहेत.

गृहखात्यासाठी ६५,७४५ कोटींची तरतूद

चालू आर्थिक वर्षासाठी गृहखात्यासाठी ११ टक्के जादा तरतूद करण्यात आली आहे. या खात्याला अर्थसंकल्पातून ६५,७४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून यात मोठया शहरांमधील महिला सुरक्षा, दिल्लीत समस्या व्यवस्थापन केंद्र आणि संसदीय बलासाठी मोठया प्रमाणावर खर्चाची तरतूद आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर समस्या व्यवस्थापन केंद्रांसाठी निर्भया फंडातून तरतूद केली जाणार आहे. याबरोबरच सर्वात मोठया संसदीय बलांमध्ये सीआरपीएफसाठी १२,१६९.५१ कोटी, तर सीमा सुरक्षा बलासाठी ११,२४२.०२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबरोबरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल ४,७२९.२२ कोटी, आसाम रायफल्स ३,५८५.५७ कोटी, आयटीबीपी ४,७२९.२२ कोटी, एसएसबीसाठी ३,०६७.७९ कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

क्रीडा क्षेत्रासाठी १७६९ कोटींची तरतूद

यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी असलेल्या तरतुदीमध्ये ५६२ कोटी रुपयांची भरीव वाढ करून ती १७६९ कोटी रुपये करण्यात आली आहे. वाढीव ५६२ कोटी रुपयांपैकी २०० कोटी रुपये जम्मू आणि काश्मीरमधील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांसाठी राखीव ठेवले आहेत. या वर्षी होणा-या क्रीडा स्पर्धासाठी ९८१ कोटी रुपयांची तरतूद आहे. जम्मू-काश्मीरमधील क्रीडा सुविधा वाढवण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्याबरोबरच ईशान्येकडील राज्ये व सिक्कीममध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी १९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्लासगोमध्ये होणा-या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व इंचिऑन आशियायी स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या खेळाडूंच्या तयारीसाठी १०० कोटी रुपयांची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.

अंतराळ क्षेत्रासाठी ६००० कोटी

अंतराळ क्षेत्राला मोठी चालना देणारी तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. इस्त्रोसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ६००० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्पी तरतुदीत तब्बल ५० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. २०१३-१४ मध्ये अंतराळ विभागासाठी सुरुवातीला ५६१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यात सुधारणा करून ती ४००० कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आली.

नव्या अर्थसंकल्पात ३५४३.६३ कोटी रुपयांची तरतूद अंतराळ तंत्रज्ञानासाठी करण्यात आली असून इन्सॅट प्रकल्पासाठी १४१२.९८ कोटी रुपये वेगळे ठेवण्यात आले आहेत. २०१४-१५ या वर्षात अनेक महत्त्वाचे अंतराळ कार्यक्रम राबवण्याची योजना असून त्यामध्ये भारताच्या भावी अवजड उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या क्षमतेच्या चाचणी मोहिमांचा समावेश आहे.


नवीन ऊर्जा प्रकल्पांसाठी कोळसा पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वागतार्ह पाऊल उचलण्यात आले आहेत. – रतुल पुरी, अध्यक्ष, हिंदुस्थान पॉवर प्रोजेक्ट्स 


प्रसारण उद्योगासाठी अर्थसंकल्पात कोणत्याच महत्त्वाच्या घोषणा नाहीत. – संदीप गुप्ता, सीएफओ, बी४यू चॅनेल



बचत आणि वैयक्तिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे.- सी. जे. जॉर्ज, व्यवस्थापकीय संचालक, जिओजित बीएनपी परिबा



पायाभूत, ऊर्जा, बांधकाम आणि अनुदान या क्षेत्रांबरोबरच वैयक्तिक करासंबंधी दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. – विनोद नायर, रिसर्च प्रमुख, जिओजित बीएनपी परिबा



विकासाला गती आणि लोकप्रिय घोषणा यांचा समतोल राखणारा अर्थसंकल्प असून आर्थिक सुधारणांच्या दिशेने सावध पाऊल यात टाकण्यात आले आहे. -कपिल वाधवान, अध्यक्ष, डीएचएफएल



शीतपेयांवर लावण्यात आलेल्या अतिरिक्त उत्पादन शुल्कामुळे या क्षेत्राला मंदीला सामोरे जावे लागेल. शिवाय या शुल्कवाढीनंतर भाववाढ करावी लागणार आहे. – इंडियन ब्रेव्हरेज असोसिएशन (आयबीए)



सोने आयातीवरील शुल्क कपातीबाबत निर्णय घेण्यात न आल्याने निराशा झाली आहे. – सौरभ गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स



अर्थव्यवस्थेला उच्च विकासपथावर आणण्यासाठी योग्य पावले उचलली आहेत. भविष्यात यातून जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाला दीर्घकाळात फायदा होईल. – ईशू दातवानी, संस्थापक, अनमोल ज्वेलर्स



आधुनिक शिक्षण पद्धतीवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक कर्जाबाबत सोपी नियमावली आणण्याचे संकेत देण्यात आले आहेत. – नीरज सक्सेना, सीईओ, आवांसे एज्युकेशन लोन्स



नव्या संकल्पना मांडणारा तसेच सामाजिक व औद्योगिक क्षेत्राला समतोल असा अर्थसंकल्प आहे.- अरुण सिंग, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ, डन अँड ब्रॅडस्ट्रीट इंडिया

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अर्थ संकल्प सादर होताना लकनी काडनारो अडाणी ,ह्या मेल्याक काय कळता.विकासाचो दर आणि गती.त्याचाय बरोबर.तेच्या वाद्राचो विकास ज्या गतीन झालो,त्यामानान हि गती शून्याच.बरा ह्या संकल्पात ह्या मायझयांच्या हाताक काय लगाक नाय.देवाक सोडलेले बोकड खानारे हे.तेंच्या बरोबर आमचे आरंभ शूर मराठे होय म्हाराजा करुक हात जोडून तयार.कमपौंडरची लायकी नाय आणी मेले मेडिकल कोलेज काडतत.माकडाच्या हातात दिला कोलीत आनी माकड सुटलो गाव जाळीत. ह्यो माकड ज्याज्या घरावर्सून गेलो त्या सगळ्या घराच वाशे फिरले.आता तो स्वताच्या घरार उडीये मारता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट