वैभव तिडके आणि त्याच्या मित्रांनी नाशवंत पदार्थासाठी सौर वाळवण यंत्राची निर्मिती केली.
नवी दिल्ली- भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीबरोबरच शेतीशी निगडीत अनेक उद्योग देशात सर्वच ठिकाणी केले जातात. मात्र प्रगत तंत्रज्ञानाअभावी देशात शेतमालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. यामध्ये मुख्यत: भाज्या आणि फळे यांचा समावेश असतो. शेतक-यांनी कष्टाने पिकवलेला हा माल खराब झाल्याने तो फेकून देण्याची वेळ येते. ती वेळ शेतक-यांवर येऊ नये, यासाठी एका तरुणाने अनोख्या यंत्राची निर्मिती केली आहे. वैभव तिडके आणि त्याच्या मित्रांनी नाशवंत पदार्थासाठी सौर वाळवण यंत्राची निर्मिती केली.
नाशवंत पदार्थ अतिशय अल्प काळ टिकत असल्याने ते ग्राहकांपर्यंत विशिष्ट कालावधीत पोहोचले नाहीत तर खराब होतात. देशात दरवर्षी २५ कोटी टन मालापैकी २५ ते ३० टक्के शेतमाल हा साठवण्याची सुविधा नसल्याने वाया जातो. सध्या जग जवळ आल्याने अतिशय लहान गावातील वस्तूही सहज सातासमुद्रापार पोहोचतात.
मात्र त्यासाठी या वस्तू किंवा पदार्थ टिकणे अतिशय महत्त्वाचे असते. याच विचाराने फळे आणि पालेभाज्या किमान वर्षभर सुरक्षित ठेवता येतील, या हेतूने वैभव आणि त्याच्या सहका-यांनी या यंत्राची निर्मिती केली आहे. सायन्स फॉर सोसायटी या संस्थेमार्फत त्यांनी आपल्या या यंत्राचा प्रसार केला आणि काही कालावधीत या तंत्रज्ञानाने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या महाराष्ट्रातील १७ गावांमधील २३० महिला हे यंत्र वापरत असल्याचे तिडके याने सांगितले.
हे यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले असून यामध्ये कांदा, मेथी, पालक, आले, आंबे आणि पपई या पालेभाज्या आणि फळे वाळवण्याचे काम करतात. या पदार्थाचा जून ते जानेवारीमध्ये म्हणजेच ताज्या शेतमालाची कमतरता असते तेव्हा महिलांच्या आहारात समावेश करण्यात आला. त्याचा त्यांना किती फायदा झाला हे पाहण्याचे काम सुरू आहे.
I am interested in solar
Please sent your contact number 7721954747