मुंबईमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात पहिल्यांदाच एटीएममधून पाणी मिळणार आहे.
मुंबई- मुंबईमध्ये दूषित पाण्याची समस्या असलेल्या मानखुर्द भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. एका स्वयंसेवी संस्थेने सुरू केलेल्या अभिनव उपक्रमामुळे मानखुर्दकरांना शुद्ध पाणी मिळणार आहे. हे शुद्ध पाणी त्यांना अतिशय किफायतशीर म्हणजे एक रुपया प्रतिलिटर दराने मिळणार आहे.
मुंबईमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात पहिल्यांदाच एटीएममधून पाणी मिळणार आहे. नागरिकांना दररोज १००० लिटर पाणी उपलब्ध करून देण्याची या एटीएमची क्षमता आहे. दोन स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन ही सेवा सुरू केली आहे.
मानखुर्दमध्ये दूषित पाण्याची समस्या असल्याने या भागात ही सेवा सुरू केली असल्याची माहिती या स्वयंसेवी संस्थांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. पाणी देणा-या या एटीएममधून पाणी मिळवण्यासाठी प्रीपेड कार्डचा वापर करावा लागणार आहे.
Sabse FAST NEWS- Khushal