पठाणकोट हवाई तळावर सुरक्षेमध्ये चूक झाली आहे, अशी कबुली संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी जाहीरपणे दिलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, पठाणकोट हवाई तळावर हल्ला होणार, याची माहिती गुप्तचर विभागाला अगोदर होती. पठाणकोट हवाई तळावरील हल्ला हा तितकाच गंभीर आहे आणि म्हणून या हल्ल्याची जबाबदारी संरक्षणमंत्री पर्रिकर आणि गृहमंत्री राजनाथ सिंह या दोघांवरच आहे. या दोघांचे राजीनामे घेतल्याशिवाय विरोधकांनी स्वस्थ बसता कामा नये. देशाशी मजाक सुरू आहे आणि सरकारच्या बहुमतामुळे आता आपण काहीही केले, कसेही वागले तरी चालेल, अशा अत्यंत बेजबाबदार पद्धतीने पर्रिकर वागत आहेत.
पठाणकोट हवाई तळावर सुरक्षेमध्ये चूक झाली आहे, अशी कबुली संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी जाहीरपणे दिलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, पठाणकोट हवाई तळावर हल्ला होणार, याची माहिती गुप्तचर विभागाला अगोदर होती. संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी दिलेली कबुली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना असलेली हल्ल्याची माहिती ही दोन्ही निवेदने अत्यंत गंभीर आहेत आणि केवळ पहिल्या पानावरच्या बातम्या एवढय़ापुरतेच त्या निवेदनांकडे पाहता कामा नये. देशाच्या सुरक्षिततेशी हे दोन्ही प्रश्न जोडले गेले आहेत. संरक्षणमंत्री असो किंवा केंद्रीय गृहमंत्री असोत यांनी त्यांची जबाबदारी नीटपणे पार पाडलेली नाही. उलट दोघांच्या निवेदनात इतक्या गंभीर विषयात चूक झाल्याची मान्यता दिली जाते तेव्हा त्याची कोणती शिक्षा संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री स्वीकारणार आहेत, याचेही उत्तर मिळाले पाहिजे. केवळ साळसूदपणाचा आव आणून झालेल्या चुकीची कबुली दिली जात असेल तर हा विषय अशा कबुलीचा स्वीकार करून संपवून टाकावा, इतका हलका नाही. कारण या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराचे सात जवान शहीद झालेले आहेत. त्या सात जवानांच्या जीवाचे मोल ‘चूक झाली’ एवढय़ा एका शब्दाने भरून निघणार नाही. त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्याची मेहरबानी पर्रिकर दाखवत आहेत आणि आपण फार मोठी शेकी मिरवली, असा भास व्यक्त करत आहेत. ज्यांच्या घरातला लढवय्या जवान गेला, त्यांच्या कुटुंबीयातल्या एकाला नोकरी दिल्याने झालेल्या पापाचे प्रायश्चित घेतले, असा त्याचा अर्थ अजिबात होणार नाही. मनोहर पर्रिकर यांना ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांना संरक्षणमंत्री करून देशाच्या उरावर बसवले आणि गोव्याच्या या माजी मुख्यमंत्र्याला संरक्षण मंत्रालय म्हणजे गोव्यातले पर्यटनस्थळच वाटले की काय? जर आवाका नव्हता, तर त्यांनी हे पद स्वीकारायला नको होते. ११६२ साली चीनच्या हल्ल्यानंतर त्यावेळचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना राजीनामा द्यावा लागला होता. पठाणकोट हवाई तळावरील हल्ला हा तितकाच गंभीर आहे आणि म्हणून या हल्ल्याची जबाबदारी संरक्षणमंत्री पर्रिकर आणि गृहमंत्री राजनाथ सिंह या दोघांवरच आहे. या दोघांचे राजीनामे घेतल्याशिवाय विरोधकांनी स्वस्थ बसता कामा नये. देशाशी मजाक सुरू आहे आणि सरकारच्या बहुमतामुळे आता आपण काहीही केले, कसेही वागले तरी चालेल, अशा अत्यंत बेजबाबदार पद्धतीने पर्रिकर वागत आहेत.
पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे नेमके कोण होते? केवळ ते दहशतवादी संघटनेचे सदस्य होते की, ते पाकिस्तानीच होते. ज्या हल्लेखोर दहशतवाद्यांना आमच्या जवानांनी मोठय़ा हिमतीने ठार केले ते सगळे दहशतवादी पाकिस्तानीच होते, याचे पुरावे मिळाल्याचे पर्रिकर सांगतात. मग जर ते पाकिस्तानी होते तर मग ते आले कुठून? आले पाकिस्तानातून. जर पाकिस्तानातून आले तर भारतीय सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांनी सीमेवरून प्रवेश केला. म्हणजेच ती सुरक्षा व्यवस्थाही पूर्णपणे भेदून त्यांनी हवाई तळ गाठला. हा हवाई तळ नेमका कुठे आहे, याचे नकाशे त्यांच्याजवळ?सापडले. याचा अर्थ असा की, एका दिवसात काही त्यांनी ही तयारी केलेली नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ हे अत्यंत चालू आहेत. श्रीलंकेच्या दौ-यावर असताना ते भारताच्या पंतप्रधानांना फोन करतात आणि त्यांना सांगतात की, पठाणकोट हवाई तळावर जो हल्ला झाला, त्या प्रकरणात आम्ही सर्व सहकार्य तुम्हाला करू. गंमत अशी की, हल्ला केला कोणी? पाकिस्तानातल्याच सैनिकांनी. त्यांना दहशतवादी म्हणा किंवा आणखी काही म्हणा. पाकिस्तानमधूनच ते भारतात आले आणि आता शरीफ सांगतात की, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. गंमत अशी की, हल्ला त्यांनीच करायचा आणि सहकार्य देण्याची तयारीही त्यांनीच दाखवायची. तशी तयारी असल्याचे आपल्या पंतप्रधानांना कळल्यावर पंतप्रधानही हुरळून जात आहेत. शरीफचे राजकारण ना मोदींना कळले, ना संरक्षण व्यवस्थेला पडलेली भोके पर्रिकरांना कळली. ना मोदींना ते सांभाळता येत ना पर्रिकरांना संरक्षण मंत्रीपद सांभाळता येत. राजनाथ सिंह यांनी तर गुन्हेगारी स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे. हल्ला होणार हे माहीत असताना त्याचा बंदोबस्त केला जात नसेल तर या अपराधाला क्षमा नाही. काँग्रेस पक्षाने या दोघांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि ती अत्यंत वास्तव आहे. जर मनमोहन सिंग सरकारच्या काळात हवाई तळावर असा हल्ला झाला असता आणि त्याची माहिती सरकारला होती, हे उघड झाले असते, संरक्षण मंत्रालयाला भोके पडलेली आहेत, हे उघड झाले असते तर भाजपाचे हे मुखंड संसदेत धिंगाणा करायला कसे पुढे आले असते? त्या सुषमा स्वराज, त्या उमा भारती या काय थयथयाट करीत होत्या, हे देश विसरलेला नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांनी केवढा थयथयाट केला होता आणि आता यांच्याच मंत्रिमंडळातील सगळय़ा चो-या सापडत आहेत?आणि हे मूग गिळून बसले आहेत तेव्हा सुशीलकुमार शिंदे आणि सुरजवाला यांनी राजीनाम्याची जी मागणी केली, ती अंत्यत योग्य आहे. काँग्रेस पक्षाने या मुद्यावर आंदोलन केले पाहिजे.
mandovi juaari nadit maase pakdit baslo hoto tech bare hote,kuthoon hya नमोनि mala saurakshan mantri banvile,mi kai karoo ??