मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू, अशी धमकी देणारे आमदार बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुंबई- मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब टाकू, अशी धमकी देणारे आमदार बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.
आम्ही १२ जूनला राज्यभर आंदोलन करणार आहोत. तरीही शासनाने मागण्या मान्य नाही केल्या तर १३ जून रोजी रेल्वे, महामार्ग रोखले जातील. प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या घराचादेखील भाजीपाला पुरवठा बंद करण्यात येईल. तरीही सरकार बधले नाही तर विमाने रोखण्यात येतील. या तीव्र आंदोलनानंतरही शेतक-यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भगत सिंहांनी ज्या पद्धतीने संसदेवर बॉम्ब हल्ला केला होता. तसा मुख्यमंत्र्यांच्या घरावरच बॉम्ब टाकू, अशी जाहीर धमकी नाशिक येथे झालेल्या बैठकीदरम्यान विदर्भातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली.
बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट बच्चू कडू यांना दहशतवादीच घोषित करण्याची मागणी केली आहे. अमरावती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बच्चू कडूंना अटक करण्याची मागणीही करण्यात आली.
बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, बॉम्ब फेकणार याचा अर्थ खरोखर बॉम्ब फेकणार असे नाही. तर हा शेतक-यांबाबतचा आक्रोश आहे. बॉम्ब फेकलाच तर त्याने कोणालाही इजा होणार नाही, तो फक्त आवाज करणारा सुतळी बॉम्ब असेल, असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिले आहे.
[EPSB]
दोन दिवसांत मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा १२ जूनपासून निर्णायक लढा देण्यात येईल, असा इशारा शेतक-यांच्या सुकाणू समितीच्या वतीने गुरुवारी देण्यात आला.
[/EPSB]
बच्चू कडू एक सच्चा शेतकरी मित्र आहे. त्यांचे शाब्दिक बाण नेहमीच बोचरे असतात. त्याचा योग्य अर्थ काढावा .ध चा मा रु नये.अर्थात सत्ताधार्यांना हे शक्य नाही.