वसई-विरार शहराची तहान लवकरच भागवू, अशी आश्वासने मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत देणा-या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अद्याप पाण्याचे नियोजन करता आलेले नाही.
विरार- वसई-विरार शहराची तहान लवकरच भागवू, अशी आश्वासने मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत देणा-या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अद्याप पाण्याचे नियोजन करता आलेले नाही. परिणामी वसई-विरार शहरात मार्च-एप्रिलमध्येच पाणीटंचाई जाणवू लागली असून, यात जास्त झळ नालासोपारा-विजयनगर प्रभाग क्रमांक-४२ला बसली आहे. या भागाला आवश्यक तो पाणीपुरवठा लवकरात लवकर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वसई-विरार काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख विश्वास सावंत यांनी दिला आहे.
मागील निवडणुकांत वसई-विरारच्या पाणीप्रश्नाने उचल खाल्ली होती. याच मुद्दय़ावर विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडून नाकीनऊ आणले; मात्र पुढील वर्षीपर्यंत शहराला आवश्यक तो पाणीपुरवठा उपलब्ध करून देऊ, असे सांगत सत्ताधा-यांनी या निवडणुकांत मते पदरात पाडून घेतली. त्यानंतर मात्र त्यांना या आश्वासनांचा विसर पडला. परिणामी या वर्षीही शहरात तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ अनधिकृत बांधकामे असलेल्या भागाला बसत असून, महापालिका मुद्दामहून या भागांत पाणीपुरवठा करत नसल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. नालासोपारा प्रभाग क्रमांक-४२मध्ये तब्बल ९६ इमारती असून, या इमारतींसाठी असलेल्या ४६ नळजोडण्या महापालिकेने चक्क कापून टाकली असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे या इमारतींतील नागरिकांना पाणी मिळेनासे झाले आहे.
तर काही भागांत एक दिवसाआड पाणी येत असून, केवळ १५ मिनिटेच हा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे येथील नागरिकांना पाण्याच्या टँकरसाठी सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. पाणीटंचाईमुळे येथील टँकरमाफियांचेही उखळ पांढरे झाले आहे, मात्र त्यांच्यावरही महापालिकेला अंकुश ठेवता आलेला नाही. या टँकरमाफियांना येथील सत्ताधारी आणि महापालिका अधिका-यांचाच आशीर्वाद असल्याची चर्चा नागरिकांत आहे.
दरम्यान, महापालिका जर ३० दिवसांची पाणीपट्टी आणि घरपट्टी आकारणार असेल, तर पाणीपुरवठा केवळ १५ दिवस का? असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. याबाबत महापालिकेकडे पत्रव्यवहार केलेला असतानाही, महापालिका दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे काँग्रेस उपजिल्हाप्रमुख विश्वास सावंत यांनी म्हटले आहे.
पाणीनियोजनाअभावी इमारती ओस!
महापालिकेच्या आशीर्वादाने नालासोपारा, विरार आणि वसई भागात कित्येक इमारती उभ्या राहिल्या आहेत. इतकी भरमसाट बांधकामे होत असताना या इमारतींत पाण्याचे नियोजन नसल्याने ग्राहक घर घेण्यास धजावत नसल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याचे नियोजन नसताना महापालिकेने या इमारती बांधायला परवानगी तरी का द्यावी, असा प्रश्नही सावंत यांनी केला आहे.
मुंबई अंडरवर्ल्ड आता बांधकाम विभागासाठी आपला काळापैसा वापरत आहे. हा नक्की काळापैसा नाही, यात सदनिका घेणाऱ्या घर मालकाचे पैसेच वापरण्यात येतात. याचे उदाहरण तुम्ही एखादी सदनिका घेण्यास जाता त्यावेळेस तुम्हाला बिल्डर रु.२० लाखाची सदनिका दाखवतो आणि हि सदनिका आत्ताच घ्या नाहीतर २ दिवसाने रु.२२ ते रु २४ लाखापर्यंत हि सदनिका आम्ही दुसऱ्या गिऱ्हाइकास विकणार आहे. घाईगडबडीमुळे घरमालक कसलाच विचार न करता पैसा जमवण्यास प्रयत्न करतो. रु. २० लाखाची सदनिका आहे पण मुळ कागदपत्रात आम्ही ती सदनिका रु. १४ ते रु. १५ लाख दर्शवतो याने तुमचे “Stamp Duty, Registration Charges” कमी भरावे लागतील, रु. १४ ते रु.१५ लाखावर “Stamp Duty, Registration Charges” किती असणार? जेणेकरून सुशिक्षित व्यक्ती ती मुळकिंमत करारनाम्यावर दाखवू शकत नाही. जर रू.१४ ते रु.१५ लाखावर”Stamp Duty, Registration Charges” भरू शकतात, तर उर्वरित रु.५ लाखावर “Stamp Duty,Registration Charges”असा किती असणार? जेमतेम घरमालकाकडे रु. १४ ते रु. १५ लाख असतात ते तो भरतो परंतु बिल्डर त्याची किंमत रु.१० लाख दर्शवितो. पूर्ण रक्कम भरूनहि घरमालक रु. ५ लाख लोन काढून बसतो. आता उर्वरित पैसा जातो कुठे? तर महापालिकेच्या मोठमोठ्या अधिकाऱ्याकडे. घरमालक आपली मुळची जागा सोडण्यास हि मुंबई अंडरवर्ल्डचीच माणसे कारणीभूत असतात. ज्यांना मुंबईच्या भाषेत चिंधीचोर हे नाव पडले आहेत. एखाद्याला राहती जागा सोडण्याकरिता स्थानिक पोलिसचौकीपासून सेटिंग लावायची,उगीच आपल्या बायकांच्या खोट्यातक्रारी त्या व्यक्तीवर टाकत राहायच्या आणि लवकरात लवकर लांबच्या ठिकाणी सदनिका घेण्यास मजबूर करायचे. ती व्यक्ती काय करते? कुठे घर घेते? याचा पूर्ण तपास करायचा यात थोडा हिस्सा मुंबई पोलिसांचा,थोडा त्रास देणाऱ्या व्यक्तीचा आणि उर्वरित रक्कम जी आयकर विभागातील अधिकाऱ्यांना कधीच दिसत नाही, मग “फिर साहब आब भी थोडा लो और मामला यही रफा दफ़ा कर दो” पालिकेच्या हद्दीत जागा येत असूनही पालिका त्यांना परवानगी देते कशी? पाण्याची सोय नसताना पालिकेने प्रत्येक इमारतीस OC दिले कसे? याचा तपास सीबीआयमार्फत करण्यात आला पाहिजे.महापालिकेच्या आशीर्वादाने नालासोपारा,विरार आणि वसई भागात कित्येक इमारती उभ्या राहिल्या आहेत. इतकी भरमसाट बांधकामे होत असताना या इमारतींत पाण्याचे नियोजन नसल्याने ग्राहक घर घेण्यास धजावत नसल्याची माहिती समोर आली आहे. ग्राहक घर घेण्यास धजावत नाही याचे मुळ कारण जसे राहते घर सोडण्यास एखाद्या व्यक्तीस मुंबई पोलिसांच्या सहाय्याने राहत्या जागेपासून ते तो व्यक्ती जिथे काम किंवा धंदा व्यवसाय करतो तिथपर्यंत खूप त्रास द्यायचा. आधीच जागा घेतली आहे मग साहेबाना त्यावर बळजबरी करून साहेबांचीही कामे त्याच्या मार्फत करून घ्यायची, लांबच्या पल्ल्यावर सदनिका घेऊन त्याला शारीरिक त्रास द्यायचा आणि कामाच्या ठिकाणी साहेबांमार्फत मानसिक त्रास देणे. अश्याने ती व्यक्ती पुन्हा ती सदनिका विकण्यास तयार होते आणि बिल्डरांचे, त्रास देणाऱ्या व्यक्तींचे खिसे आपोआप प्रती महिना भारत राहतात. मुंबईत अशा प्रकारचे कित्येक चिंधी चोर “भाई” या नावाने संबोधिले जातात. “अपनेसे नडा तो जान से मार दुंगा” मुंबईतील अडाणी व्यक्तीजवळ हि काम धंदा न करता इतका पैसा कसा येतो? फक्त रु. १५,०००/- पगार घेणारा व्यक्ती ४ ते ५ वर्षात रु. ४० ते रु ५० लाखाची मालमत्ता कशी घेतो? याचे सर्व उदाहरण वर दर्शविलेल्या प्रक्रिये प्रमाणे. अशा प्रकारा मुळे सुशिक्षित व्यक्तीही आत्महत्या करण्यास प्रोत्साहित होता, ज्या व्यक्तींनी त्रास दिला तीच व्यक्ती “इसने Suicide क्यू किया काम पर तो कोई तखलीफ नही थी, काम का हि टेन्शन था ना, उसे तो कोई भी तखलीफ नही देता था, पण जो व्यक्ती वरील प्रमाणे पैसे कमावतो तोच व्यक्ती आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीबद्दल असे उदाहरण देतो कि लगता है गलत काम करता होगा, इसलिये इतना बडा घर लिया. याला एक प्रकारे “मर्डर” म्हणतात. साप भी मर गया और लाठी भी नही तुटी. पाणी पुरवठा नसून हि राहती जागा सोडून ती व्यक्ती नालासोपारा, वसई, विरार येथे घर घेते याचे मुळ कारण कोणते? मुंबईत अशा प्रकारे त्रास देणाऱ्या व्यक्तींचा ग्रुप फार मोठ्या प्रमाणात तैनात आहे. कधीच स्थानिक पोलिस चौकिने विभागातील व्यक्तींच्या काम धंद्याचा शोध घेतला नाही. यामुळे वाढत आले बेकायदेशीर बांधकाम आणि मुंबई व महाराष्ट्राचा सत्यानाश. तीच बाहेरून आलेली व्यक्ती स्थानिक मुंबईकरास मुंबई में रहेकर क्या किया? अशा भाषेत विचारते याचे कारण त्यांना मिळत आलेला हा असा काळा पैसा.