याकूब मेमनने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायमूर्तीचे एकमत न झाल्याने ही याचिका वरिष्ठ खंडपीठाकडे सोपवण्यात आली आहे.
नवी दिल्ली – १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायमूर्तीचे एकमत न झाल्याने ही याचिका वरिष्ठ खंडपीठाकडे सोपवण्यात आली आहे.
याकूबने ३० जुलै रोजी दिल्या जाणा-या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतची याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती ए.आर.दवे आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्यात मतभेद झाल्याने ही सुनावणी वरिष्ठ खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय भारताचे सरन्यायाधीश उद्या घेणार आहेत.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती दवे यांनी याकूबची याचिका फेटाळून लावली तर न्यायमूर्ती कुरियन यांनी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही न्यायमूर्तींमध्ये एकमत न झाल्याने ही याचिका वरिष्ठ खंडपीठाकडे सोपवण्यात आली आहे.
नशीब भारताचे, मागच्या सरकारने काहीही गाजावाजा न करता कसब आणि अफजल गुरूला फाशी दिले. नाहीतर त्यानाही वाचविण्यासाठी सलमान, शत्रुघ्न, महेश भट्ट, नसरुद्दिन शाह सारखे नट, जेठमलानी सारखे, प्रशांत भूषण सारखे विद्वान पुढे सरसावले असते.