Friday, May 3, 2024
Google search engine
Homeकोलाज‘सत्या’मागील अर्धसत्य

‘सत्या’मागील अर्धसत्य

कोणे एकेकाळी संगणक क्षेत्रातील मक्तेदारी मिरवणा-या ‘मायक्रोसॉफ्ट’ या अतिबलाढय़ कंपनीने आता संकटकालीन बचावाचा मार्ग म्हणून सत्या नडेला या ४६ वर्षीय भारतीय अभियंत्याकडे सूत्रे दिली आहेत. सत्याऐवजी फोर्ड मोटर कंपनीचा सीईओ अ‍ॅलन मुलाली किंवा एरिकस्नचा सीईओ हॅन्स वेस्टरबर्ग यांची तिथे नेमणूक होऊ शकली असती, पण माहिती-तंत्रज्ञानातील प्रावीण्यामुळे सत्याने बाजी मारली. त्याच्या या यशामुळे भारतातील लोकांनी जो जल्लोष केला, तो मन थक्क करणारा होता. कदाचित हल्ली आपल्या लोकांना कोणताही प्रसंग ‘साजरा’, ‘सेलिब्रेट’ करण्याची सवय जडली असावी.. त्यातही सत्याला दरमहा ९-१० कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ पगार म्हणून मिळणार आहे, म्हणून आमच्या मध्यमवर्गीयांना खास आनंद, पण खरा प्रश्न आहे पगारात आनंद मानण्याच्या, आयुष्यात जोखीम किंवा जबाबदारी न घेण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा. सत्याच्या पगाराला भुलणा-या आमच्या मंडळींनी बिल गेट्सच्या कार्यकुशलतेचा आणि जोखीम काम करण्याच्या उद्योजकतेचा हेवा करायला सुरुवात केली पाहिजे..

आपल्या देशात कोणत्या गोष्टीचा आनंद, जल्लोष किंवा शोक कसा साजरा केला जाईल याचा नेम नाही. ऊर्दूत एक छान म्हण आहे, ‘बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना’. आमचेही अगदी तसेच. मध्यंतरी उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे लहान भाऊ प्रमोद यांनी आपल्या मुलीच्या लग्नावर सुमारे साडेपाचशे कोटी रुपये खर्च केल्याच्या बातम्या गाजल्या. त्यानंतर कधी भारतीय लेखकाला बुकर वा तत्सम पुरस्कार मिळो वा सौंदर्यस्पर्धेत एखादी तरुणी विश्वसुंदरी होवो, आम्ही जणू काय जग जिंकले अशा आविर्भावात नाचू लागतो. सध्या ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बनलेल्या सत्या नडेला या ४६ वर्षीय अभियंत्याच्या पगाराच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या आहेत. बहुतांश वृत्तपत्रांनी, दूरदर्शन वाहिन्यांनी तर सत्याच्या यशाच्या बातम्या अशा दिल्या की, त्याच्या आगमनाने जणू ‘सत्य युग’ अवतरणार आहे. मायक्रोसॉफ्ट ही अत्यंत महत्त्वाची कंपनी आहे. जगभरातील संगणकक्रांतीला वेग देणा-या बिल गेट्स यांनी स्थापन केलेली ही कंपनी सध्या फार मोठय़ा स्थित्यंतराला सामोरी जात आहे. ‘अॅपल’ आणि ‘गुगल’ या दोन मोठय़ा कंपन्यांनी नवनव्या संशोधनांच्या माध्यमातून नवीन पिढीचे मन काबीज करण्याचा सपाटा लावला आहे. त्या स्पर्धेत मागे पडलेल्या ‘मायक्रोसॉफ्ट’चे, ज्या कंपनीचे अर्थबळ ४६८० अब्ज रुपये आहे, यश अधिक वाढावे, पर्यायाने बिल गेट्स यांच्या संपत्तीत आणि अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीत भर पडावी, यासाठी सत्या नडेला काम करणार आहे. त्यासाठी त्याला दरमहा नऊ कोटी रुपये पगार, भत्ते आणि अन्य सवलतींतून मिळेल. एका भारतीयाला एवढा चांगला मान जागतिक स्तरावर मिळतोय ही चांगली गोष्ट, पण त्यामुळे तुम्ही-आम्ही हुरळून जायचे कारण काय?

तिकडे सत्या ‘मायक्रोसॉफ्ट’चा सीईओ बनला आणि इकडे भारतात त्याच्या अभिनंदनाचे सत्र सुरू झाले. फेसबुक, व्हाट्सअॅप, टेलिग्राम आणि ट्विटरमुळे हल्ली फुकटात देशप्रेम, धर्मप्रेम, संस्कृतीप्रेम आणि तत्सम प्रेमाची जाहिरात करता येते, मग काय सगळीकडे सत्याच सत्या.. मग या स्पर्धेत मोठे नेते का मागे राहतील? केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम् यांनी दिल्लीतील श्रीराम कॉलेजात भाषण करताना ‘सत्याची नियुक्ती ही भारतीय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्तेचे उत्तम उदाहरण आहे,’ असे आवर्जून सांगितले आणि टाळ्या वसूल केल्या. महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आपला आनंद फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त करताना जागतिक आयटी क्षेत्रातील भारतीयांच्या सामर्थ्यांचा गौरव केला. हे सारे चांगले आहे, पण हा मणिपाल विद्यापीठातून अभियंता झालेला सत्या जर भारतातच राहिला असता, तर त्याला आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर एवढी मजल मारता आली असती का, हा प्रश्न सगळ्यांसाठीच यक्षप्रश्न बनतो.

२००९ च्या नोबेल पुरस्कारांच्या यादीत फक्त एकमेव नाव ‘आपले’ वाटावे असे होते. वेंकटरमण रामकृष्णन यांनी रसायनशास्त्रात संशोधन केल्यामुळे त्यांना जगातील तो सर्वोत्तम पुरस्कार लाभला होता, त्या दिवशी अमेरिकेत राहून अमेरिकन झालेल्या रामकृष्णन यांना काही उत्साही भारतीयांनी फोन केला. एका भारतीयाला नोबेल पुरस्कार मिळाल्याचा आनंद या फोन करणा-या लोकांच्या आवाजातून व्यक्त होत होता, पण त्यामुळे रामकृष्णन यांना आनंद झाला नाही. काहीशा उर्मटपणे त्यांनी उत्तर दिले, ‘आपण सारे माणसे आहोत, आपण कुठल्या देशात जन्मावे हा तर निव्वळ अपघात असतो.’

त्यांच्या त्या वाक्यांनी गोंधळून गेलेल्या देशप्रेमी लोकांनी, मग रामकृष्णन यांच्या उर्मटपणालाही प्रसिद्धी दिली. अर्थात त्यामुळे रामकृष्णन यांना काही फरक पडला नाही. त्यानंतर एका मुलाखतीत तर ते चक्क म्हणाले होते, ‘अहो, हल्ली मला ‘कोणतेही’ लोक ई-मेल पाठवतात, माझा मेलबॉक्स भरून टाकतात.. अर्थात त्यांच्या मेल्स उडवून टाकायला मला तासभरही लागत नाही.’ या नोबेलविजेत्याचा सारा रोख भारतातून येणा-या ई-मेल्सवर होता, हे येथे वेगळे सांगायला नको. एकूणच काय तर नामवंत परदेशस्थ भारतीयांच्या या अरेरावीचे नेहमीच दर्शन घडत असते. अर्थात सगळेच असे असतात असे नाही, पण पाश्चात्त्य संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या या पहिल्या वा दुस-या पिढीतील अनिवासी भारतीयांचे जगणे-वागणे ब-यापैकी बदललेले असते, पण बदलत नाही त्यांची भारतीय मानसिकता. दुस-यांच्या यशाची मनमोकळी स्तुती करणे हे सर्वसामान्य पाश्चात्त्य माणसाचे आवडते काम. आपल्याला अगदी थोडी मदत करणा-याला सहजपणे ‘थँक्स’ म्हणणे हे त्यांच्या अंगवळणी पडलेले असते. अगदी सारे आयुष्य पाश्चात्त्य देशात घालवणा-या भारतीय लोकांमध्ये हे गुण उतरतातच, असे नाही, पण न शिकवता आलेला स्पष्टवक्तेपणा फटकळपणात परिवर्तित होऊन आलेला मात्र हटकून दिसतो. अर्थात सर्वसामान्य माणसाला त्याचे कधीच दर्शन घडत नसते, त्यामुळे तो बिच्चारा या विदेशात जाऊन नाव काढणा-यांच्या कौतुकात रमलेला असतो. ‘पेप्सिको’च्या सीईओपदी बसणा-या इंद्रा नुयी, ‘मास्टर कार्ड’चे सीईओ अजय बंग, ‘डॉईश बँके’चे अंशू जैन, ‘बोईंग’चे डॉ. दिनेश केसकर, ‘सिटी बँके’चे विक्रम पंडित यांच्या कार्यकर्तृत्वाचा आपण सा-यांनी अभिमान बाळगलाच पाहिजे, पण त्याच जोडीला हे सारे बुद्धिवंत बाहेर का गेले, याचाही विचार झाला पाहिजे.

आपल्याकडे ‘ब्रेनड्रेन’ म्हणजेच बुद्धिमान लोक देशाबाहेर जाण्याच्या प्रक्रियेला ऐंशीच्या दशकात सुरुवात झाली. आणीबाणीच्या धक्क्यातून सावरलेला देश ‘नवनिर्माणा’चे विदुषकी पर्याय पाहून हादरला होता. राजनारायण, चरणसिंह, महेंद्र सिंह टिकैत, चंद्रशेखर, मधू लिमये आणि त्यांच्यासारख्या ‘लहरी’ नेत्यांनी सारा राजकीय अवकाश व्यापला होता, त्यामुळे उठणा-या राजकीय तरंगांनी आमची एकूण व्यवस्था अस्वस्थ झाली होती. सी. राजगोपालाचारी यांनी ज्याचे वर्णन ‘लायसन्स आणि परमिट राज’ असे केले होते, तशी लालफितशाही त्या काळात सर्वव्यापी बनली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या अल्पजीवी सरकारने मध्यमवर्गीयांच्या ‘सुराज्या’च्या कल्पना मोडीत काढल्या होत्या. त्यामुळे आणीबाणी तसेच तत्पूर्वीच्या सर्वच जनआंदोलनात सक्रिय सहभागी होणारा मध्यमवर्ग राजकीय प्रक्रियेपासून दूर होण्याची सुरुवात झाली होती. ‘ब्रेनड्रेन’ हे त्याचेच फलित. ज्या रा. स्व. संघ, कम्युनिस्ट वा समाजवादी विचाराच्या लोकांनी आणीबाणीत आंदोलने केली, तुरुंगवास भोगला होता, त्यांची कुशाग्र बुद्धीची मुले-नातवंडे आयआयटी आणि एमबीबीएसच्या पदव्या घेऊन इंग्लंड-अमेरिकेत घुसली आणि तिकडेच विसावली. नाही म्हणायला त्यातील काही मंडळींनी आपल्या देशातील गोरगरिबांची आठवण ठेवली; पण बहुतांश नोकरी करणा-या या मंडळींच्या दानाला आणि समाजसेवेला मर्यादा होत्या, आहेत. इथे पुन्हा, आपली कोणतीही रिस्क, जोखीम न घेण्याची मानसिकताच दिसते. आज इंग्लंड-अमेरिकेत वैद्यकीय, आयटी, संशोधन आदी क्षेत्रांत भारतीय वंशाच्या लोकांचा ब-यापैकी प्रभाव दिसतो; परंतु आमची बहुतांश मंडळी नोकरदार असतात, त्यामुळे त्यांच्या यशालाही मर्यादा पडलेल्या दिसतात. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात ‘डॉटकॉम’चा फुगा फुटला त्या वेळी आपले इंजिनीयर फार तर बेकार बनले, दिवाळखोर झाले नाहीत. आजही इतक्या वर्षानंतर स्थिती बदललेली नाही. म्हणून एनआरआय नोकरदारांचे किती कौतुक केले पाहिजे, हे आपण ठरवायला हवे.

विशेषत: जागतिक शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल होत असताना तर आम्हाला आमच्या सद्य:स्थितीचा विचार केलाच पाहिजे. सध्या जगातील बहुतांश प्रगत देशांनी संगणक क्रांतीचा मन:पूर्वक स्वीकार केलेला आहे. त्याउलट आपल्या देशातील ३७ टक्के प्रौढ लोक अंगठेबहाद्दर असलेले दिसतात. मग संगणकसाक्षरतेची गोष्टच करायला नको. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ही श्रीमंतांची मक्तेदारी बनली आहे. गरिबांची पोरे शाळेत फक्त दुपारच्या जेवणासाठी जातात. ते चांगले दिले की, शिक्षकाची जबाबदारी संपली. मध्यंतरी एका आदिवासी आश्रमशाळेत गेलो होतो. तिथले सारे शिक्षक, मुख्याध्यापक आठवडय़ाचा ‘मेन्यू’ ठरवण्याच्या कामात गढलेले, तर पोरे खेळण्यात, मजा करण्यात गुंग. मुख्याध्यापकांना विचारले ‘सर, आज काय सुट्टी आहे का?’ सर त्वरेने उत्तरले, ‘नाही हो, पोरांना शिकवण्यापेक्षा सध्या चांगले जेवण देण्याचा सरकारी आदेश आहे. पाच-पन्नास पोरे दहावीला नापास झाली तर आम्हाला काही होणार नाही, पण खाण्यात काही आले आणि उलटय़ा-जुलाब झाल्या, तर मुख्याध्यापक थेट तुरुंगात, मध्ये-अध्ये काही नाही. तेच महत्त्वाचे काम करतोय. आठवडय़ाचे भोजन पदार्थ ठरवतो, पुढील आठवडय़ात आमदारसाहेब ‘व्हिजिट’ देण्याची शक्यता आहे.’ असे बोलून मुख्याद्यापक पुन्हा आपल्या कामाकडे वळले.

जी अवस्था आमच्या प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाची, तीच गत आहे उच्चशिक्षणाची. आज भलेही आम्ही भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून स्वत:ची पाठ थोपटत असू. जगातील सर्वात ‘तरुण देश’ म्हणून आम्हाला आमच्या तारुण्याचा अभिमान वाटत असेल; पण जगातील पहिल्या दोनशे दर्जेदार विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नाही. ही वस्तुस्थिती मन अस्वस्थ करणारी आहे. त्या पार्श्वभूमीवर आमच्या पदवीधर तरुणांचा जगातील उत्तम विद्यापीठात शिकणा-या इंग्लिश, अमेरिकन वा चिनी तरुणांसमोर कसा टिकाव लागणार? यासंदर्भात सध्या कोणताही राजकीय नेता उपाय सुचवताना दिसत नाही. सत्या नडेलाच्या झगमगीत यशाने ज्यांचे डोळे दिपले आहेत, त्यांनी ही वस्तुस्थिती नजरेआड करू नये. आमच्या उच्चशिक्षणासमोर उभ्या असलेल्या या धोक्याचा आपण वेळीच वेध घेणे गरजेचे आहे, कारण त्यावरच आमच्या भावी पिढय़ांचे पर्यायाने देशाचे भवितव्य अवलंबून असेल.

बदलत्या काळाने आता ‘ब्रेनड्रेन’च्या प्रमाणातही घट होत आहे. गेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘आऊटसोर्सिग’ हा महत्त्वाचा मुद्दा होताच, शिवाय भारतीय नोकरदारांना देण्यात येणारा ‘व्हिसा’ हासुद्धा चर्चेचा विषय होता. विशेषत: २००८ च्या जागतिक मंदीमुळे बदललेल्या अमेरिकन सरकारने दहशतवादाचा बागुलबुवा पुढे करून आपली व्हिसाविषयक धोरणे कडक केली होती. इंग्लंड सरकारने तर त्यावर कडी केली. त्यांनी तर व्हिसासाठी भली मोठी अनामत रक्कमच आकारायला सुरुवात केली होती. परिणामी उच्चशिक्षण घेतल्यानंतर मायदेशी येणा-यांच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेतील व्यावसायिक अस्थिरतेला कंटाळून बरेच चाळिशी-पन्नाशीतील बुद्धिमान भारतात परतले. ही ‘रिव्हर्स ब्रेनड्रेन’ची प्रक्रिया आमच्या देशातील कोण्या विद्यापीठाला अभ्यासण्याची बुद्धी झाली नाही, पण अमेरिकेतील हार्वर्ड लॉ स्कूलने या मायदेशी परतलेल्यांच्या मुलाखती घेतल्या आणि दोन महिन्यांपूर्वी सखोल अहवालही प्रसिद्ध केला. नोक-या देणा-या ‘केली सव्र्हिसेस’ नामक संस्थेने दिलेली माहिती तर या बदलत्या स्थितीची निदर्शक आहे. त्यांच्या मते २०१५ पर्यंत कॅनडा, युरोपीय महासंघ, इंग्लंड आणि अमेरिकेतील अंदाजे तीन लाख अनिवासी भारतीय मायदेशी येतील. हार्वर्ड लॉ स्कूलच्या अहवालात तर भारतात परतणा-या डॉक्टर्स, इंजिनीयर्स आणि संशोधकांना परदेशातील नोक-यांपेक्षा चांगल्या संधी मिळतात, असे म्हटले आहे. त्या अहवालातील एक गोष्ट फार आशादायी आहे, ती म्हणजे त्यांनी ज्या लोकांच्या मुलाखती घेतल्या, त्यातील ८६ टक्के लोकांना भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरच सोन्याचे दिवस येतील, अशी आशा आहे. विशेष म्हणजे, या बुद्धिवंतांपैकी ५३ टक्के लोकांनी भारतात स्वतंत्र उद्योग-धंदा काढण्याचा मनोदय व्यक्त केला. ८९ टक्के लोकांना भारतात चांगली नोकरी मिळाल्यामुळे परत यावेसे वाटले तर ६१ टक्के तरुणांना अमेरिकेपेक्षा चांगली नोकरी व पगार मिळाला आहे. एकूणच काय तर, सगळी स्थिती चांगल्या दिशेने बदलत आहे. कौतुकच करायचे तर या मायदेशी परतणा-या तरुण-तरुणींचे केले पाहिजे. ‘गार्डियन’मध्ये याच विषयावर सडेतोड लेख लिहिणारे अरुण गुप्ता म्हणतात, ‘अरे कौतुक करायचे तर थेट अन्यायाविरोधात लिहिणा-या अरुंधती रॉय यांचे करा. सिएटलमध्ये, अगदी ‘मायक्रोसॉफ्ट’च्या मुख्यालयाजवळच्या न्यू सिटी कौन्सिलच्या सदस्य बनलेल्या क्षमा सावंत यांचे करा.

न्यूयॉर्कमधील हजारो टॅक्सीचालकांची युनियन बांधणा-या भैरवी देसाई किंवा कॅनडात इमिग्रेशनच्या विषयावर लढा देणा-या हर्षा वालिया यांचे कौतुक करा, कारण त्यांचा लढा हा जागतिक आदर्श आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी आहे.’ होय, दरमहा नऊ कोटी रुपये पगार मिळविणार म्हणून सत्या नडेला याचा आम्ही का अभिमान बाळगावा?आमच्याकडे त्यापेक्षा जास्त पैसे कमावण्याची क्षमता असूनही देशसेवेत रमणारे नंदन निलेकणी आहेत. दानशूरतेत अन्य सगळ्यांना मागे टाकणारे अझीम प्रेमजी आहेत, म्हणून आम्ही जर आमच्या पुढील पिढय़ांसमोर हे चांगले आदर्श ठेवले तर स्वकेंद्रित मध्यमवर्गीय जाणिवा जोपासणा-या ‘सत्या’मागील अर्धसत्यही लोकांना कळतील. त्यामधून पूर्णसत्य स्वीकारून त्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आज आपला देश सगळ्या विचित्र गोष्टींसाठी जगभरात ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात आमचा देश म्हणजे नाग, वाघ, भिकारी आणि जटाधारींचा इंडिया म्हणून जगभरात प्रसिद्ध होता. त्यानंतरही थोडय़ा फार फरकाने ही ‘इमेज’ तशीच राहिली. आजही ती प्रतिमा बदलण्यासाठी चांगले प्रयत्न होत नाहीत, त्यामुळे भारतातील गर्भपात, टीबी, मलेरियासारखे रोग, महिलांवरील अत्याचार, दारिद्रय़, बेकारी या सगळ्या भयंकर गोष्टी तिकडच्या प्रसारमाध्यमांमध्ये दिसतात. त्यात आमचा अपमान करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मध्यंतरी एक इंग्रजी सिनेमा पाहिला होता, टिपिकल हॉलिवुडचा युद्धपट होता तो. त्या सिनेमात अगदी शेवटच्या टप्प्यात थरारक प्रसंग सुरू असताना अडचणीत सापडलेला अमेरिकन सैनिक आपल्या मुख्यालयाला फोन करतो. त्याचा फोन थेट भारतातील कॉलसेंटरवर येतो. तिथे बसलेला भारतीय तरुण, नाकात बोट घालत अत्यंत बेजबाबदारपणे तो फोन घेताना दिसतो. त्याला अमेरिकन सैनिकाचे बोलणेच कळत नाही. त्यामुळे चिडलेला तो सैनिक जोरदार शिवी हासडून फोन आपटतो आणि चित्रपट अधिक वेगाने पुढे सरकू लागतो.. आजही तो सीन डोळ्यासमोर आला की, सर्वसामान्य अमेरिकन माणसाची भारतीय लोकांबद्दलची भावना किती तीव्र आहे हे प्रकर्षाने जाणवते. आपण ही वस्तुस्थिती विसरता कामा नये. म्हणूनच सत्या नडेला वा तत्सम भारतीयांच्या नोकरीतील ‘यशाने’ ‘नोकरदार मानसिकता’ असणा-या लोकांना आनंद होत असेल तर होऊ द्या. पण आमच्या नवीन पिढीने तरी या पगारदारी महत्त्वाकांक्षांना व्यावसायिकतेचे आणि कल्पकतेचे पंख दिले पाहिजेत. त्यामधूनच नवीन भारत निर्माण होईल.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. Maheshji, what you have written is 100% true. i have recently relocated to China after 10 years of stay in the country only for my “mother” and “mother land”. but few instances and expereinces in Pune left me wiht no option but to start thinking of moving out. suffocation, helplessness and being at the mercy are the three things i or any one hate, but today we have a system in place that makes you only a “helpless” Indian. one thing – where is the solution ??? and who will find it ??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट