पठाणकोट हवाई तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सात जवान शहीद झाले. लेफ्टनंट कर्नल पदावरील एका अधिका-यालाही प्राण गमवावे लागलेले आहेत. २० जवान जखमी आहेत आणि हा पूर्वनियोजित हल्ला या देशाच्या संरक्षण मंत्रालयाचे आणि गृहमंत्रालयाचे तसेच पंतप्रधान कार्यालयाचे पूर्ण धिंडवडे काढणारा आहे.
पठाणकोट हवाई तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत सात जवान शहीद झाले. लेफ्टनंट कर्नल पदावरील एका अधिका-यालाही प्राण गमवावे लागलेले आहेत. २० जवान जखमी आहेत आणि हा पूर्वनियोजित हल्ला या देशाच्या संरक्षण मंत्रालयाचे आणि गृहमंत्रालयाचे तसेच पंतप्रधान कार्यालयाचे पूर्ण धिंडवडे काढणारा आहे.
सगळयात आक्षेपार्ह गोष्ट अशी आहे की, संरक्षण मंत्रालयाला आणि गृहमंत्रालयाला असा हल्ला होणार आहे, याची कल्पना असल्याची कबुली गृहमंत्र्यांनी दिलेली आहे. केवळ या एक आणि एकाच कारणासाठी संरक्षणमंत्री किंवा केंद्रीय गृहमंत्री यापैकी एकालाही त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांची नैतिकताही शिल्लक राहिलेली नाही.
देशावर होणा-या हल्ल्यात कोणीही राजकारण करू नये आणि असू नये; पण तिथे सरकार कोणत्या पक्षाचे आहे यापेक्षासुद्धा मुख्य प्रश्न असा निर्माण झाला आहे की, पठाणकोट हवाई तळावर हल्ला होणार आहे, याची माहिती असताना त्या विरोधात कारवाई करण्याची भूमिका संरक्षण मंत्रालयाने का घेतली नाही? गृहमंत्रालयाला हल्ल्याची माहिती मिळालेली असताना इतक्या भीषण हल्ल्याची पूर्व कल्पना आल्यावर गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त जबाबदारीतून या हल्ल्याची रचना मोडून काढणे का शक्य झाले नाही? जर पूर्व कल्पना होती, तर त्याचा अर्थ असा की, हा हल्ला अचानक झालेला नाही. तो कट मोडून काढता आला असता, उधळून लावता आला असता; पण गुप्त यंत्रणा, गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यामध्ये कुठलाही सुसंवाद दिसत नाही.
परिणामी दहशतवाद्यांनी आपला डाव साधला आणि सात जवान शहीद झालेले आहेत. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत. बंगलोरचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचा मृत्यू तर अत्यंत दुर्दैवी आहे. दहशतवाद्यांनी फेकलेले बॉम्ब निकामी करण्याच्या पथकात ते आघाडीवर होते आणि स्वत: पुढाकार घेऊन बॉम्ब निकामी करत असताना बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला.
बंगलोरला त्यांचे पार्थिव आणले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी जो हंबरडा फोडला, त्या कुटुंबाच्या सांत्वनाला कोणतेही शब्द अपुरे आहेत.?केवळ आणि केवळ?गाफीलपणामुळे पठाणकोट हवाई तळावरील हा हल्ला झालेला आहे. तो पूर्वनियोजित होता आणि अजूनही हल्ल्याची शक्यता आहे. शेवटचा दहशतवादी मारला जाईपर्यंत हे ऑपरेशन सुरू राहणार आहे.?मात्र लढणारे जवान दहशतवाद्यांचा खातमा करतील, याबद्दल देशाला खात्री आहे. प्रश्न जवानांचा नसून राजकीय नेत्यांच्या अपयशाचा आहे.
पठाणकोट हवाई तळावरील हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीशी जोडला गेला आहे.?नवाब शरीफ यांच्या ? वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा द्यायला मोदी पाकिस्तानात गेले. लाल गालीचे घालून देशाच्या पंतप्रधानांचे स्वागत झाले. त्यामुळे मोदी हुरळले. प्रसारमाध्यमेही हुरळली आणि मोदींच्या अचानक भेटीचे खूप मोठे कौतुक सुरू?झाले. मोदींचे ‘धक्कातंत्र’ अशी त्याची जाहिरात झाली.
नवाब शरीफ मोदींना गळाभेट देत आहेत, कडकडून मिठी मारत आहेत, अशी दृश्ये दिवसभर दाखवली गेली. मोदी भारताकडे निघाले तेव्हा विमानतळावर निरोप देण्यासाठी नवाब शरीफ स्वत: उपस्थित राहिले. या सगळया बातम्या मोदींना आंतरराष्ट्रीय नेतृत्व देण्यासाठी मुद्दाम पसरवल्या गेल्या. मोदींनाही आता या देशात, या देशाच्या राजकारणात रस राहिलेला नाही. त्यांना त्यांची प्रतिमा ‘आंतरराष्ट्रीय नेता’ अशी बनवायची आहे. त्यामुळे अठरा-एकोणीस महिन्यांत ४६ देशांचे दौरे करून मोदी आंतरराष्ट्रीय होऊ पाहत आहेत.
शरीफ यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला जाण्याकरिता मोदींचा दौरा पूर्वनियोजित न ठेवता ऐनवेळी जायचे आणि धक्कातंत्र वापरले, असे दाखवायचे हेही अगोदरच ठरलेले होते. आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय विमानतळावर कोणत्याही विमानाला असे अचानक उतरता येत नाही. त्यात पंतप्रधानांचे विमान म्हणजे काही गंमत नव्हे. मोदींचे विमान उतरण्यापूर्वी तीन तास लाहोर विमानतळावर एकही विमान उतरू देण्यात आले नव्हते.
याचा अर्थच असा की, नवाब शरीफ यांच्या कार्यालयापासून मोदींच्या कार्यालयापर्यंत हा दौरा पूर्वनियोजित होता.?या दौ-यात मोदींनी नवाब शरीफांना घट्ट मिठी मारली तरी शरीफ ‘शरीफ’ नाहीत, हे त्यांना माहीत असायला हवे. पाकिस्तान सरकारच्या संमतीशिवाय भारतावर दहशतवाद्यांचे हल्ले होत असतील, असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कोणत्याही देशात जे काही घडत असते त्याची माहिती आणि मान्यता असल्याखेरीज अशा कारवाया घडत नाहीत.
१९६२ साली पंडित नेहरू यांना चीनबद्दल एक भरवसा होता.?‘िहदी-चिनी भाई भाई’ आणि पंचशील या तत्त्वाचा उद्घोष नेहरूंनी अतिशय मनस्वीपणे केला; पण त्यावेळचे चीनचे पंतप्रधान चाऊ एन लॉय यांच्या भारतभेटीनंतर लगेच ते त्यांच्या मायदेशात परत जात असतानाच इकडे हल्ला सुरू झाला. जे १९६२ साली घडले, तेच ५३ वर्षानंतर पुन्हा घडत आहे.
मोदींनी कितीही वेळा हस्तांदोलन केले तरी आता अशी शंका येऊ शकते की, मोदींना अशा हल्ल्याची कल्पना असतानाही मोदी पाकिस्तानच्या भूमीवर उतरलेच कसे? मोदींना याचा खुलासा करावा लागेल.?देशाची माफी मागावी लागेल. एवढा मोठा हल्ला पठाणकोट हवाई तळावर झाल्यानंतर देशाचा पंतप्रधान एका शब्दाने बोलत नाही. त्याच्या पाकिस्तान भेटीबद्दल त्यांना पश्चाताप होत नाही. हे कशाचे लक्षण आहे? निवडणुकीमधली मोदींची भाषणे आठवली तर त्यांची भाषा ‘ईट का जवाब पत्थर आणि गोळीला गोळी’ अशी होती.
आता पाकिस्तानात जाऊन त्यांनी हस्तांदोलन केल्यावर पाकिस्तानच्या मान्यतेने हा हल्ला होतो आणि पंतप्रधान निषेधाचा शब्द काढत नाहीत आणि पाकिस्तानविरोधात तडकून बोलत नाहीत, हा देशाशी विश्वासघात आहे. पाकिस्तानच्या मोदींच्या दौ-याचा संबंध पठाणकोट हल्ल्याशी लावला जाणार आणि तो लावला गेलाही पाहिजे. जी गोष्ट गृहमंत्रालयाला समजते, ती पंतप्रधान कार्यालयालाही समजणारच. यातून दोन प्रश्न निर्माण होतात. त्यातला पहिला प्रश्न असा की, जर पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याची पूर्वकल्पना गृहमंत्रालयाला होती, म्हणजे पंतप्रधान कार्यालयाला होती तर त्यांनी आधी काय उपाययोजना केली आणि केली नसेल तर का केली नाही? आता गृहमंत्रालय मोदींना वाचवण्यासाठी असे म्हणू शकेल की, पंतप्रधान कार्यालयालाही ही कल्पना दिली नव्हती.
गृहमंत्रालयाचे हे उत्तर असेल तर गृहमंत्री म्हणून राजनाथ सिंह एक क्षणही त्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाहीत, असाच त्याचा अर्थ आहे. एकूणच संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यालयाची पूर्ण नाचक्की पठाणकोट हल्ल्यात झालेली आहे; पण हा हल्ला कोणा एका व्यक्तीच्या नाचक्कीचा विषय नसून संपूर्ण भारताची नाचक्की या निमित्ताने झाली आहे.
ज्या दहशतवादी संघटना भारताच्या विरोधात टपलेल्या आहेत.?त्यात ‘इसिस’ असेल किंवा ‘तालिबान’ असेल किंवा अन्य कोणी असतील. त्या संघटनांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शेवटी गृहखात्यावर आहे आणि यात गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतरही दहशतवाद्यांची खुमखुमी कमी झालेली नाही. इथून पुढे दहशतवादी अनेक मार्गाने भारतावर अधिक प्रखर हल्ला चढवण्याची शक्यता आहे. अशा हल्ल्याच्या वेळी सगळा देश एक होईल, यात काही शंका नाही.
पक्षीय आणि राजकीय मतभेदही अशावेळी राहणार नाहीत; पण देशाच्या पंतप्रधानांनी स्वत:ला आंतरराष्ट्रीय नायक बनवण्याच्या स्पर्धेत भारतीय स्वातंत्र्याचा आणि अस्मितेचा बळी देणे मान्य केले असेल तर ते मात्र महाभयानक कृत्य ठरेल आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यातून सुटता येणार नाही.
देशात त्यांच्याविरुद्ध संताप निर्माण झालेला आहे आणि याची उत्तरे त्यांना द्यावीच लागतील. छातीचा कोट करून आमचा जवान लढायला तयार आहे;?पण पठाणकोटचा हल्ला होणार हे माहीत असताना सरकारने तो हाणून पाडण्यासाठी कारवाई का केली नाही? या प्रश्नाचे उत्तर देश मागतो आहे आणि ते उत्तर पंतप्रधानांनाच द्यायचे आहे.
कारगिल मध्ये घुसखोरी होत आहे.याची माहिती मिळून सुधा गृह मंत्रालयाने काही केले नाही. ५०० जवान शहीद झाले. ३००० जखमी झाले. १०००० कोटी रुपयांची शस्त्रास्त खरेदी करण्यात आली. पिस्तुलाच्या धाकाने विमान अपहरण करणार्यांना विमान अफगाणीस्थानात घेवून जाण्या साठी गृह मंत्रालयांनी मदत केली त्या मुले दह्शद वादी अतिरेक्यांना सोडावे लागले. सरकार भाजपचे होते.नकली मोदींचे खरे काम चालू झाले आहे.भारत देशात आर्थिक अराजकता निर्माण करणे.आणि विदेशी भांडवल दारांच्या ताब्यात भारत देशाची अर्थ व्यवस्था देणे. आमचे नेते शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळ खंडातून बाहेर येण्यास तयार नाहीत.