स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल कुणीही भरभरून बोलताना दिसतं पण आपल्याकडच्या ‘सोयीनुसार’ उदयास आलेल्या स्त्री स्वातंत्र्याच्या संकल्पना आता पुन्हा एकदा अभ्यासण्याची गरज आहे. नोकरी करणारी मुलगी ही काळाची गरज आहे, पण तिच्या नोकरीशी जोडलेल्या इतर अनेक गोष्टींचा विचार करण्याची आपण तसदीही घेत नाही.
आजकाल कुठल्याही विवाहोत्सुक तरुणाला किंवा त्याच्या आई-वडिलांना तुम्हाला लग्नासाठी कशी मुलगी हवी असा प्रश्न विचारला की, ‘कशीही असो पण नोकरी करणारी हवी’, असं उत्तर हमखास मिळतं. कोही जणांची तर निव्वळ तेवढीच अट असते. (आपण रूढ आणि सौम्य भाषेत याला ‘अपेक्षा’ असं म्हणतो) अनेक दा तर रंग, रूप, गुण, वर्तणूक, संस्कार अशा अनेक गोष्टींना फोटा दिला जातो आणि केवळ नोकरी या एकाच ‘गुणाला’ प्राधान्य दिलं जातं. चांगली नोकरी असणा-या मुलींना लग्नाच्या ‘बाजारात’ जास्त मागणी असते. आमची सून फलाना फलाना कंपनीत एवढया मोठया पगाराच्या नोकरीवर आहे, हे सांगताना आजकाल सासरकडच्या मंडळींचा ऊर अभिमानाने (की गर्वाने) भरून येत असतो. एकवेळ अशी होती जेव्हा लग्नानंतर नोकरी करण्याची परवानगी मिळावी, मुभा मिळावी म्हणून मुलींना खूप प्रयत्न करावे लागत. पण आपल्या समाजाने लग्नानंतर मुलीने नोकरी करण्याची ‘मुभा’ ते ‘अट’ हा प्रवास कधी साध्य केला ते कळलंच नाही.
मुलीने आत्मनिर्भर असावं, आर्थिकदृष्टया स्वतंत्र असावं, हे शंभर टक्के वादातीत आहे पण म्हणून तिने कुठल्याही परिस्थितीत नोकरी करत राहण्याचं बंधन जाचकच आहे. कोरण घरातल्या कमावत्या पुरुषाकडून त्याने गृहव्यवस्थापनही करावं अशी कुणाचीही अपेक्षा नसते पण बाईकडून मात्र तिने नोकरी करावी, वेळेत घरी यावं, जेवणही करावं, मुलांनाही सांभाळावं, नव-याकडे- सासूसास-यांकडेही बघावं, पाहुणेमंडळींपासून सा-यांची उठबसही करावी, सण-वारही करावेत, घरकामही करावं.. अशा सगळ्याच अपेक्षा अगदी सहजपणे केल्या जातात. पण नव-याप्रमाणेच ती सुद्धा आठ-नऊ तास नोकरी क रून, बस-ट्रेनचे धक्के खात, अनेक व्याधी अंगावर कोढत, उन्हा-पावसात राबतच असते. ती ही माणूसच आहे, ती ही दमते. पण घरची परिस्थिती उत्तम असतानाही तिने नोकरी करतंच राहायला हवी, कोरण अनेकदा तिची नोकरी हा घरच्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकार मध्यम वर्गीय आणि उच्चमध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक आढळतो. कोरण आजच्या वाढत्या महागाईत गरीब घरांमध्ये शक्य असेल तितक्यांनी नोकरी करणं अनिवार्यच झालेलं आहे. खरं तर मध्यम वर्गातही ही बाब लागू होते पण त्यांच्याकडे अनेकदा पर्याय उपलब्ध असतात.
परवा नवव्या महिन्याच्या गर्भवतीला ट्रेनमधून प्रवास करून नोकरीसाठी जाताना पाहिलं आणि न राहवून विचारलं तेव्हा, ‘पर्याय नाहीए गं! ऑफिसमधून पगारी रजा मिळत नव्हती आणि पहिल्या बाळंतपणाचा सगळा खर्च माहेरच्यांनी करायचा आहे, त्यांना थोडा हातभार लागावा म्हणून जमेल तितके दिवस नोकरी करतेय.’, असं ती म्हणाली. बाळ आपल्याला हवं पण त्याच्या जन्मासाठी खर्च उचलणं म्हणजे ‘आपल्यात अशीच पद्धत आहे’ हे बिरूद ऐकवलं जातं. याचाच अर्थ आपल्या ‘सफेद कॉलर’ समाजात आजही इतक्या भंपक आणि तर्कहीन गोष्टींचा प्रथेच्या नावाखाली आपण बिनदिक्कत अवलंब करतच असतो. असो, हा संप्रू्ण स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
आपल्या मूळ मुद्दयाकडे परतताना माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीसोबत नुकताच घडलेला एक किस्सा आठवतो. तिचं लग्न झालं, तेव्हा तिला मोठया कंपनीत उत्तम पगाराची नोक री होती. दुर्दैवाने लग्नानंतर तीनच महिन्यांनी तिला ही नोकरी सोडावी लागली. दुसरी नोकरी शोधून ती मिळेपर्यंत चार-सहा महिन्यांचा कोलावधी गेला. पण ह्या कालावधीत लग्नाच्या वेळी तिला डोक्यावर घेणा-या सासरच्या मंडळींची वागणूक सरडयाच्या रंगाप्रमाणे बदलली. ‘आम्हाला कोयमस्वरूपी नोकरी असणारी दुसरी मुलगी मिळत होती, उगीच घाई केली, तुला नोकरी मिळाली की मी तुझ्याशी पूर्वीसारखी चांगली वागेन’, असे कडवट बोल आडून-आडून ऐकवायला सुरुवात झाली. त्या नवविवाहित तरुणीच्या मनावर ह्याचा काय परिणाम झाला असेल, ह्याचा विचारही करवत नाही. पण हे जर आपल्या पुरोगामी म्हणवणा-या समाजातील प्रातिनिधिक चित्र असेल तर समस्या गंभीर आहे.
मुळात नोकरीची अट असण्यामागची कोरणं कोय, असं लग्नाच्या ‘बाजारात’ उभ्या असलेल्या कोही मुलांना विचारलं असता, कोहींनी साळसूदपणाचा आव आणत, ‘ती तिच्या पायावर उभी राहायला हवी, तिचं व्यक्तिस्वातंत्र्य..’ वगैरे गोष्टींचा ऊहापोह केला तर कोहींनी थोडं मोकळं होत ‘माझ्या कमाईला हात-भार लागावा म्हणून..’, अशी प्रांजळ कबुली दिली.
कोहींनी तर ‘घरी बसून नुसत्या मालिका पाहणं आणि चहाडया करणं.. यापेक्षा घराबाहेर गुंतलेली असणं बरं म्हणून नोकरी करावी’ असं सांगितलं. पण तिच्या ह्या ‘गुंतवणुकी’तून आलेला पैसा गुंतवण्याचे किंवा खर्च करण्याचे अधिकारही अनेकदा तिच्याकडे नसतात. तिच्या आत्मनिर्भरतेच्या नावावर अनेकदा तिच्या कमाईवरच डोळा असल्याचं दिसून येतं. म्हणून तर पगार झाला की तो सुनेने सासूच्या किंवा नव-याच्या हातात आणून ठेवावा असा आजही अनेकांचा आग्रह असतो ज्याला आपण ‘आधुनिक संस्कारां’च्या यादीत सुलभतेने नेऊन ठेवतो.
आपली बदलती जीवनशैली आणि वाढती महागाई पाहता घरात अधिक कमाईची गरज प्रत्येकाला जाणवते आहे. नवरा-बायको दोघंही कमावते असले तरी निभावणं कठीण होत चाललंय, अशा वेळी आपल्या जुन्या समजुती बाजूला ठेवून आपण आपल्याकडच्या स्त्रियांना शिकवलं, नोकरी करण्याची परवानगी दिली पण तिला तिचे छंद जोपासण्याची, सहका-यांसोबत पार्टी किंवा सहलीला जाण्याची मुभा दिली को? तिला वाटेल तेव्हा माहेरी किंवा बाहेर जाण्याची सूट आपण तिला दिली को? तिच्या नोकरी आणि क रिअर संबंधीचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिला खरंच आहे को? म्हणजे स्वातंत्र्य दिल्याचं दाखवायचं पण नाडया मात्र आपल्याच हातात राहतील, याची सोयीने कोळजीही घ्यायची, असा दुटप्पी व्यवहार होताना दिसतो. एका दिवसासाठी को होईना तिला स्वयंपाकघरातून रजा देणारे असे कितीसे नवरे आपल्याला आजूबाजूला दिसतात. समाजातल्या स्त्री-स्वातंत्र्याच्या संकल्पना पुन्हा एकदा पडताळून पाहण्याची आपल्या समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. पण दुर्दैवाने जिथे तिला एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी आपला समाज असमर्थ ठरला आहे, तिथे तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा एवढा विचार कोण आणि कशासाठी करेल?
Wastawdarshi chitran kel ahe. Anekjaninchi hich awastha ahe. upay matra kahi nahi!
अगदी मनातलं लिहिलं आहे तुम्ही
जिच्यावर हि समस्या येऊन थापली तीच समजू शकते पण यावर उपाय काय ?
nice